शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

नोटीस मिळताच विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा भरूनही इंडिया इन्शुरन्स कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत ...

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा भरूनही इंडिया इन्शुरन्स कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत जिल्हा ग्राहक मंचची नोटीस जातात विमा कंपनीने बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा केले.

तीर्थपुरी येथील शेतकरी विठ्ठल वाजे यांनी फळबागेच्या विम्यापोटी मोसंबी एक हेक्टरसाठी ३८०० रुपये, तर ६० गुंठे केळीसाठी ३९६० रुपये भरले होते, तर गणेश वाजे यांनी ९७ गुंठे मोसंबीचा ३ हजार ७३४ रुपये व ६० गुंठे केळीचा ३९६० रुपये असा दोन्ही शेतकऱ्यांनी २२ ऑक्टोबर २०१८ रोजी इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा भरला होता. तो मंजूरही करण्यात आला. काही शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले; परंतु या दोन्ही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळालेच नाहीत. विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी व कंपनीकडे लेखी तक्रारी केल्या, तरीही कंपनीकडून टाळाटाळ होत होती. त्यानंतर दोन्ही शेतकऱ्यांनी अ‍ॅड. प्रदीप जाधव, अ‍ॅड. मयूर ढवळे यांच्या मार्फत ग्राहक मंचात तक्रार केली होती. त्यावेळी कंपनीने पहिली नोटीस घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी दुसरी नोटीस पाठविण्यात आली. दुसऱ्या नोटिसीची तामील होताच कंपनीचे धाबे दणाणले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्यात आली.

...अखेर मिळाला न्याय

इंडिया इन्शुरन्स कंपनीला नोटीस मिळताच कंपनीने तीर्थपुरी येथील शेतकरी विठ्ठल वाजे यांच्या खात्यावर मोसंबीचे एक हेक्टरचे २५ हजार ८०० व व ६० गुंठे केळीचे ३९ हजार ६००, असे ६५ हजार ४०० रुपये जमा केले, तर गणेश वाजे यांच्या ९७ गुंठे मोसंबीचे २५ हजार २६ रुपये, तर ६० गुंठे केळीचे ३९ हजार ६००, असे एकूण ६४ हजार ६२६ रुपये बँक खात्यात जमा केले.