शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे संथ गतीने वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST

मंठा : तालुक्यातील शेतक-यांना खरीप हंगामातील नुकसान भरपाई म्हणून दुसºया टप्प्यात २८ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. असे असले ...

मंठा : तालुक्यातील शेतक-यांना खरीप हंगामातील नुकसान भरपाई म्हणून दुसºया टप्प्यात २८ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. असे असले तरी यापूर्वी तालुक्याला मिळालेल्या पहिल्या टप्प्यातील केवळ ५० टक्के रकमेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वाटप करण्यात आलेले आहे.

गतवर्षी तालुक्यात जून महिन्याच्या प्रारंभी दमदार पावसाने हजेरी लावली होती. या संधीचा फायदा घेत शेतकºयांनी वेळेवर पेरण्या पूर्ण केल्या होत्या. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि बियाणे कंपन्यांनी शेतकºयांना बोगस बियाण्यांचा पुरवठा केल्यामुळे असंख्य शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. असे असतानाच जुलै महिन्यात तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी झाली. यात जमिनी खरडून गेल्या. यावेळी अंभोडा कदम आणि पाटोदा या दोन गावांमधील शेती नुकसानीचे आणि पिकांचे शासन स्तरावरून पंचनामे करण्यात आले. यानंतर ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात मूग तोडणीला येताच संततधार पाऊस सुरू राहिला. दरम्यान शेंगातच मुगाला कोंब फुटले. शेतकºयांनी मूग आणि उडीद पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी करताच महसूल प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे करण्यात आले. याची मुदत मिळण्यापूर्वीच पुन्हा अतिवृष्टी, वादळी वारा आणि मुसळधार पाऊस झाला. यात हाती आलेली सोयाबीन, कापसासह तूर, भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले. शासनाने पुन्हा नुकसानग्रस्त पिकांचे सरसगट पंचनामे केले. यानंतर पहिल्या टप्प्यातील २८ कोटी ७७ लाख रूपयांचे अनुदान नोव्हेंबर महिन्यात तालुक्यासाठी मिळाले. परंतु, हे अनुदान वाटप करण्यासाठी अजून जिल्हा मध्यवर्ती बँकेला दीड महिना लागणार आहे. यातच दुसºया टप्प्यातील प्राप्त झालेले २८ कोटी रूपयांचे अनुदान बँकेकडून कधी वाटप होणार? असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे.

चौकट

पहिल्या टप्प्यातील दुष्काळी अनुदान यापूर्वी बँकांकडून वाटप करण्यात आले आहे. आता दुस-या टप्यातील २८ कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून नुकतेच प्राप्त झाले असून, ते लवकरच शेतकºयांच्या खात्यावर जमा केले जाईल. परंतु, एखाद्या बँकेने विनाकारण शेतक-यांना त्रास देण्यासाठी पैसे जमा करण्यास दिरंगाई केल्यास शेतकºयांनी तहसील प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन तहसीलदार सुमन मोरे यांनी केले आहे.

कोट

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भोंगळ कारभार वाढला आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे पैसे अद्याप सर्व शेतकºयांना मिळालेले नाही. बँक व्यवस्थापक त्यांच्या मर्जीतील लोकांनाच सध्या पैसे देत आहे. अद्याप ५० टक्के सामान्य शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. आता दुसºया टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले असून, याचे वाटप कधी होणार हे सांगणे सध्या कठीण आहे. यापुढे जिल्हा बँक व्यवस्थापणाने बँक कर्मचाºयांच्या शनिवार व रविवारच्या सुट्ट्या रद्द करून अनुदानाचे वाटप करावे.

प्रल्हाद बोराडे, संचालक, कृउबा समिती, मंठा.

शेतकºयांचे पहिल्या टप्यातील दुष्काळी अनुदान वाटप करण्यासाठी १७ फेब्रुवारी पर्यंत बँक व्यवस्थापनाने नियोजन केलेले आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदान वाटप झाल्यानंतर दुस-या टप्यातील अनुदान वाटप केले जाईल. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाकडून बालासाहेब वाघमारे यांनी दिली.