शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

संजय उवाच्..ने जालना पालिकेतील संक्रांत टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

व्यापारी आणि उद्योगांचे शहर म्हणून ओळख असलेल्या जालना शहराची अवस्था ही नव्याने विशद करण्याची गरज नाही. ठेविले अनंत तैसेची ...

व्यापारी आणि उद्योगांचे शहर म्हणून ओळख असलेल्या जालना शहराची अवस्था ही नव्याने विशद करण्याची गरज नाही. ठेविले अनंत तैसेची राहावे या अभंगाप्रमाणे जालनेकर मुकाट्याने आपला आलेला दिवस काढत असतो. पालिकेत सत्ता कोणाचीही असो, त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा कोणीच पूर्ण करू शकत नाहीत. परंतु गेल्या पाच वर्षांचा विचार करता आमदार आणि नगराध्यक्ष या दोन्ही पदांवर पती-पत्नी असे हा दुर्मीळ राजकीय योगायोग म्हणावा लगेल. पुन्हा त्यांचा पक्ष सत्तेतही सहभागी हे आणखी चांगले. असे असले तरी आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा प्रत्यय या द्वयींना आला आहे. मंजूर झालेला निधी अन्यत्र वळविल्याने मध्यंतरी गोरंट्याल यांच्यातील कैलास जागा झाला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धोका ओळखून लगेचच यात मध्यस्ती केली. निधी देण्याचे मान्य केले. परंतु नंतर हा निधी मिळाला की नाही हे अद्याप गोरंट्याल यांनी नमूद केले नाही.

त्यातच आता २०१६ नंतर पुन्हा एकदा पालिकेचा आखाडा रंगणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्यावेळी भाजप, शिवसेनेत कसे कुरघोडीचे राजकारण रंगले होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या दोन्ही पक्षांनी ऐनवेळी आपले उमेदवार मागे घेऊन ज्येष्ठ नेत्या शकुंतला कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत संगीता गोरंट्याल यांनी एकहाती विजय मिळवून पालिकेत काँग्रेसचा झेंडा कायम ठेवला. तसेच काँग्रेसचेच सर्वांत जास्त नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून हाेती. ती आता रद्द होऊन पुन्हा नगरसेवकांमधून होणार आहे. तसेच एका वॉर्डातून आता एकच नगरसेवक राहणार असल्याने या निवडणुकीला मोठे महत्त्व आले आहे. त्यातच शहरावर वर्चस्व शिवसेनेचे की काँग्रेसचे हेही दिसून येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपही एकला चलोरे..च्या भूमिकेत राहणार असून, यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आतापासून लक्ष घातले आहे. तसेच शहराध्यक्ष राजेश राऊत यांचाही येथे कस लागणार आहे. शहरात राष्ट्रवादी पक्षाची फारशी ताकद नाही. त्यातच पालकमंत्री टोपे यांचा हा मतदारसंघही नाही, त्यामुळे टोपे हे शहरात पाहिजे तेवढे लक्ष घालत नसल्याचे गेल्या दहा वर्षांपासून सर्वश्रूत आहे.