शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संजय उवाच्..ने जालना पालिकेतील संक्रांत टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

व्यापारी आणि उद्योगांचे शहर म्हणून ओळख असलेल्या जालना शहराची अवस्था ही नव्याने विशद करण्याची गरज नाही. ठेविले अनंत तैसेची ...

व्यापारी आणि उद्योगांचे शहर म्हणून ओळख असलेल्या जालना शहराची अवस्था ही नव्याने विशद करण्याची गरज नाही. ठेविले अनंत तैसेची राहावे या अभंगाप्रमाणे जालनेकर मुकाट्याने आपला आलेला दिवस काढत असतो. पालिकेत सत्ता कोणाचीही असो, त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा कोणीच पूर्ण करू शकत नाहीत. परंतु गेल्या पाच वर्षांचा विचार करता आमदार आणि नगराध्यक्ष या दोन्ही पदांवर पती-पत्नी असे हा दुर्मीळ राजकीय योगायोग म्हणावा लगेल. पुन्हा त्यांचा पक्ष सत्तेतही सहभागी हे आणखी चांगले. असे असले तरी आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा प्रत्यय या द्वयींना आला आहे. मंजूर झालेला निधी अन्यत्र वळविल्याने मध्यंतरी गोरंट्याल यांच्यातील कैलास जागा झाला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धोका ओळखून लगेचच यात मध्यस्ती केली. निधी देण्याचे मान्य केले. परंतु नंतर हा निधी मिळाला की नाही हे अद्याप गोरंट्याल यांनी नमूद केले नाही.

त्यातच आता २०१६ नंतर पुन्हा एकदा पालिकेचा आखाडा रंगणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्यावेळी भाजप, शिवसेनेत कसे कुरघोडीचे राजकारण रंगले होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या दोन्ही पक्षांनी ऐनवेळी आपले उमेदवार मागे घेऊन ज्येष्ठ नेत्या शकुंतला कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत संगीता गोरंट्याल यांनी एकहाती विजय मिळवून पालिकेत काँग्रेसचा झेंडा कायम ठेवला. तसेच काँग्रेसचेच सर्वांत जास्त नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून हाेती. ती आता रद्द होऊन पुन्हा नगरसेवकांमधून होणार आहे. तसेच एका वॉर्डातून आता एकच नगरसेवक राहणार असल्याने या निवडणुकीला मोठे महत्त्व आले आहे. त्यातच शहरावर वर्चस्व शिवसेनेचे की काँग्रेसचे हेही दिसून येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपही एकला चलोरे..च्या भूमिकेत राहणार असून, यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आतापासून लक्ष घातले आहे. तसेच शहराध्यक्ष राजेश राऊत यांचाही येथे कस लागणार आहे. शहरात राष्ट्रवादी पक्षाची फारशी ताकद नाही. त्यातच पालकमंत्री टोपे यांचा हा मतदारसंघही नाही, त्यामुळे टोपे हे शहरात पाहिजे तेवढे लक्ष घालत नसल्याचे गेल्या दहा वर्षांपासून सर्वश्रूत आहे.