शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

संजय उवाच्..ने जालना पालिकेतील संक्रांत टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

व्यापारी आणि उद्योगांचे शहर म्हणून ओळख असलेल्या जालना शहराची अवस्था ही नव्याने विशद करण्याची गरज नाही. ठेविले अनंत तैसेची ...

व्यापारी आणि उद्योगांचे शहर म्हणून ओळख असलेल्या जालना शहराची अवस्था ही नव्याने विशद करण्याची गरज नाही. ठेविले अनंत तैसेची राहावे या अभंगाप्रमाणे जालनेकर मुकाट्याने आपला आलेला दिवस काढत असतो. पालिकेत सत्ता कोणाचीही असो, त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा कोणीच पूर्ण करू शकत नाहीत. परंतु गेल्या पाच वर्षांचा विचार करता आमदार आणि नगराध्यक्ष या दोन्ही पदांवर पती-पत्नी असे हा दुर्मीळ राजकीय योगायोग म्हणावा लगेल. पुन्हा त्यांचा पक्ष सत्तेतही सहभागी हे आणखी चांगले. असे असले तरी आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा प्रत्यय या द्वयींना आला आहे. मंजूर झालेला निधी अन्यत्र वळविल्याने मध्यंतरी गोरंट्याल यांच्यातील कैलास जागा झाला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धोका ओळखून लगेचच यात मध्यस्ती केली. निधी देण्याचे मान्य केले. परंतु नंतर हा निधी मिळाला की नाही हे अद्याप गोरंट्याल यांनी नमूद केले नाही.

त्यातच आता २०१६ नंतर पुन्हा एकदा पालिकेचा आखाडा रंगणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्यावेळी भाजप, शिवसेनेत कसे कुरघोडीचे राजकारण रंगले होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या दोन्ही पक्षांनी ऐनवेळी आपले उमेदवार मागे घेऊन ज्येष्ठ नेत्या शकुंतला कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत संगीता गोरंट्याल यांनी एकहाती विजय मिळवून पालिकेत काँग्रेसचा झेंडा कायम ठेवला. तसेच काँग्रेसचेच सर्वांत जास्त नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून हाेती. ती आता रद्द होऊन पुन्हा नगरसेवकांमधून होणार आहे. तसेच एका वॉर्डातून आता एकच नगरसेवक राहणार असल्याने या निवडणुकीला मोठे महत्त्व आले आहे. त्यातच शहरावर वर्चस्व शिवसेनेचे की काँग्रेसचे हेही दिसून येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपही एकला चलोरे..च्या भूमिकेत राहणार असून, यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आतापासून लक्ष घातले आहे. तसेच शहराध्यक्ष राजेश राऊत यांचाही येथे कस लागणार आहे. शहरात राष्ट्रवादी पक्षाची फारशी ताकद नाही. त्यातच पालकमंत्री टोपे यांचा हा मतदारसंघही नाही, त्यामुळे टोपे हे शहरात पाहिजे तेवढे लक्ष घालत नसल्याचे गेल्या दहा वर्षांपासून सर्वश्रूत आहे.