शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

घनसावंगी तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. ...

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

घनसावंगी तालुक्यात यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनीही लवकरच पेरणी उरकली होती. घनसावंगी तालुक्यात यंदा ८२ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील सातही मंडलांत पडलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद रांजणी मंडलात झाली असून, या मंडलात ८९३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. घनसावंगी मंडल दुसऱ्या क्रमांकावर असून, घनसावंगी मंडलात ८७५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अंतरवाली मंडलात ८१०.८ मि.मी., राणी उंचेगाव मंडलात ७५१.०५ मि.मी., तीर्थपुरी मंडलात ७३९.०५ मि.मी., कुंभार पिंपळगाव मंडलात ७६०.६ मि.मी., तर जांबसमर्थ मंडलात ७२२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

घनसावंगी तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक ६३८.४० मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, ही अपेक्षित सरासरी यंदा सप्टेंबरच्या सुरुवातीलाच ओलांडली असून, आतापर्यंत तालुक्यात सरासरी ७९३.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या वेळेपर्यंत ६१० मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

अतिवृष्टीमुळे बाणेगाव शिवारातील शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे, तर मंगरूळ येथील २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकाला फटका बसला आहे. शिवाय गंगाकाठच्या उसाचेही मोठे नुकसान झाले आहे. घनसावंगी शहरासह, बहीरगड, बोलेगाव, भद्रेगाव, रामगव्हाण, तणवाडी, राहेरा, देवहिवहरा, एकलेहरा, तीर्थपुरी, बोडक्या, खडका, मांदळा, म. चिंचोली, कु. पिंपळगाव, सिंदखेड, जांबसमर्थ, राजाटाकळी, घोन्सी, पारडगाव, आवलगाव, राजेगाव, रांजणी, राणी उंचेगाव, गुरपिंपरी, बोलेगाव, मंगुजळगावसह दुधना तीरावरील गावांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, सर्वच पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचनामे करण्याची मागणी

तलाव क्षेत्रातील पिके पूर्णतः पाण्यात बुडाली असून, पाच हजार हेक्टरवरील कापसाचे व चार हजार हेक्टर क्षेत्रावरील मुगाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीनच्या पिकालाही याचा फटका बसला आहे. शिवाय तुरीचे पीक पाण्याखाली बुडाल्याने उभे पीक जागीच सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.