शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

पावणे सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

जालना : जिल्ह्यात सीसीआयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आठ केंद्रांवर आजवर तब्बल पावणे सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात ...

जालना : जिल्ह्यात सीसीआयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आठ केंद्रांवर आजवर तब्बल पावणे सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांनी हा कापूस विकला आहे.

गतवर्षी कोरोनामुळे सीसीआयमार्फत सुरू करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्र बंद पडले होते. परराज्यातील अनेक मजूर गावी निघून गेल्याने कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यास मोठा विलंब झाला होता. यंदा मात्र, सीसीआयच्या वतीने जिल्ह्यात वेळेवर कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. यामध्ये जालना येथील केंद्रावर ४००५ शेतकऱ्यांचा एक लाख २ हजार ४३८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. बदनापूर येथील केंद्रावर १६५७ शेतकऱ्यांचा ५४ हजार ३३५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. परतूर येथील केंद्रावर ३७०५ शेतकऱ्यांचा ९४ हजार ४५९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. मंठा येथील केंद्रावर २१६५ शेतकऱ्यांचा ५२ हजार ७३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. भोकरदन येथील केंद्रावर २५४० शेतकऱ्यांचा ८६ हजार ६६३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. राजूर येथील केंद्रावर ११५५ शेतकऱ्यांचा ३९ हजार ३३६ क्विंटल, कुंभार पिंपळगाव येथील केंद्रावर २३४५ शेतकऱ्यांचा ६२ हजार ७६ क्विंटल तर शहागड येथील केंद्रावर ३४८० शेतकऱ्यांचा ८४ हजार ६८७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

खाजगी व्यापाऱ्यांकडे २२ हजार क्विंटल

जिल्ह्यातील खाजगी व्यापाऱ्यांनी २२ हजार ५९ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. यात परतूरमध्ये ३८०० क्विंटल, मंठ्यात ८ हजार ५५० क्विंटल, भोकरदनमध्ये ४ हजार ५०९ क्विंटल, कुंभार पिंपळगाव येथे ३१०० क्विंटल, तर शहागड येथील व्यापाऱ्यांनी २१०० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.

केंद्रावर वाहनांच्या रांगा

सध्या सर्वच सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या बाहेर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कापूस खरेदीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना दोन- तीन दिवस केंद्रावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे कापूस खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.