शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

वेदनेला दिलेला संवेदनशील प्रतिसाद म्हणजे कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

जालना : सभोवतालचे समृद्ध अनुभव पचवतांना, संवेदनशील आंतरमनाने वेदनेला दिलेला प्रतिसाद म्हणजे कविता, असे मत वक्ते व कवी डाॅ.दिगंबर ...

जालना : सभोवतालचे समृद्ध अनुभव पचवतांना, संवेदनशील आंतरमनाने वेदनेला दिलेला प्रतिसाद म्हणजे कविता, असे मत वक्ते व कवी डाॅ.दिगंबर दाते यांनी व्यक्त केले.

जालना येथील मुद्रा साहित्य सेवा संस्थेच्या वतीने आयोजित ‘निर्मितीच्या शब्दकळा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समीक्षक डाॅ.रावसाहेब ढवळे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश देहडकर, संयोजक कवी कैलास भाले, प्रा.पंढरीनाथ सारके यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाविद्यालयीन जीवनापासून जसा जगलो व जे जे भोगलं, ते ते अनुभवाशी प्रामाणिक राहून कवितेतून मांडत गेलो. कवीने स्वतःशी व आलेल्या अनुभूतीशी ईमान राखत आपल्या कवितेचा पोत समृद्ध केला पाहिजे. आत्मसन्मानाशी तडजोड न करणारी कविताच अमर होत असते, म्हणूनच कविता कधीच उथळ असू नये. आजच्या आधुनिक व्यवस्थेला सामोरे जाताना संवेदनशीलता हरवत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. डाॅ.दाते यांनी आपल्या मशाल, क्रांती या कवितेसह अभंग व गझल सादर केली. प्रास्ताविक कवी सुनील लोणकर यांनी केले. सूत्रसंचालन कवी सुहास पोतदार यांनी केले. कार्यक्रमास मनीष पाटील, शांतीलाल बनसोडे, लक्ष्मीकांत दाभाडकर, विठ्ठल वरपे, रामा सुपारकर, मिलिंद घोरपडे व इतरांची उपस्थिती होती.

फोटो