शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ : सलग दुसऱ्या वर्षी अडीच लाखांचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

कोरोनामुळे एकही पालखी जाणार नाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने वारकऱ्यांना पंढरपुरात न येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातून ...

कोरोनामुळे एकही पालखी जाणार नाही

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने वारकऱ्यांना पंढरपुरात न येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातून एसटीने एकही पालखी जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातून दरवर्षी जातात ६० ते ७० पालख्या

आषाढी यात्रेनिमित्त दरवर्षी जालना जिल्ह्यातून हजारो वारकरी पंढरपूरला जातात. जिल्ह्यातून जवळपास ६० ते ७० पालख्या जातात; परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातल्याने वारीला जात येत नाही. यंदाही शासनाने निर्बंध लादल्याने वारकरी नाराज झाले आहेत.

अनेक वर्षांपासून मी पंढरपूरच्या वारीला जातो; परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरपूरला जाता येत नाही. यंदा जाण्याची अपेक्षा होती; परंतु पुन्हा शासनाने निर्बंध लादले आहेत. गावाकडे मन रमत नाही.

प्रल्हाद भुतेकर, वारकरी

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून वारी बंद आहे. यंदा कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे; परंतु तरी शासनाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे गावाकडे मन रमत नाही.

राम सोळुंके, वारकरी

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरची वारी बंद आहे. वारीसाठी दरवर्षी १२० बस धावतात. त्यातून महामंडळाला जवळपास अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यंदा ते मिळणार नाही.

प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, जालना