शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पुस्तकांशिवाय भरली ऑनलाइन शाळा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

जालना : कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. नव्या शैक्षणिक वर्षातही पुस्तकांविनाच ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. काही ...

जालना : कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. नव्या शैक्षणिक वर्षातही पुस्तकांविनाच ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. काही मुलांनी शाळेतून मिळालेल्या जुन्या पुस्तकांवर ज्ञानार्जन सुरू केले आहे.

कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण मुलांना दिले जात आहे. दुसरीकडे शासनाने कोरोनामुक्त गावांमधील शाळा सुरू करण्याच्या हलचाली सुरू केल्या आहेत. परंतु, सर्वशिक्षा अभियानांतर्गत मुलांना शासनाकडून देण्यात येणारी नवीन पाठ्यपुस्तके अद्यापही मिळालेली नाही. प्रतिवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवसांपासून पुस्तकांचे वाटप सुरू केले जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शासनाकडून पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. शाळांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही मुलांनी जुनी पुस्तके शाळेत जमा केली आहेत. या पुस्तकांवरच काही मुलांनी अभ्यासक्रम सुरू केला आहे. परंतु, जिल्ह्यातील असंख्य मुलं आजही नवीन शैक्षणिक वर्षातील पुस्तकांपासून वंचित आहेत. जिल्ह्याला जवळपास १३ लाखांहून अधिक पुस्तकं लागणार आहेत. त्याची मागणीही शिक्षण विभागाने शासनाकडे नोंदविली आहे.

४० टक्के मुलांनीच केली पुस्तके परत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून पुस्तके मिळण्यास विलंब होत आहे.

शासनाकडून पुस्तके मिळण्यास उशीर होणार असल्याने मुलांनी शाळेत जुनी पुस्तके जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार जवळपास ४० टक्के मुलांनी जुनी पुस्तके शाळेत जमा केली आहेत. नव्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांना ही पुस्तके वाटप करण्यात आली आहेत.

पुस्तके नाहीत, अभ्यास कसा करणार?

आम्हाला शिक्षकांकडून ऑनलाइन मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, पुस्तकं नसल्याने अभ्यास करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्हाला अभ्यासासाठी नवीन पुस्तके शासनाने द्यावीत.

- आयान शेख

ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे. शिक्षकांकडून शिकविण्यास सुरुवातही करण्यात आली आहे. परंतु, नवीन पुस्तकं मिळालेली नाहीत. पुस्तकांसाठी शिक्षकांकडे विचारणा करीत आहोत.

- आदित्य रोडी

शासनाकडे मागणी केली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मुलांसाठी लागणाऱ्या पुस्तकांची नोंदणी शासनाकडे केली आहे. पुस्तके प्राप्त होताच गरजूंना वाटप केली जातील. - कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी