शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

पंधरा सावकारांना परवाना नूतनीकरणाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

जालना शहरात जवळपास ६२ सावकर असून, अन्य तालुक्यातही सावकार आहेत. या सावकरांचा खरा लाभार्थी हा ग्रामीण भागातील गरीब मजूरवर्ग ...

जालना शहरात जवळपास ६२ सावकर असून, अन्य तालुक्यातही सावकार आहेत. या सावकरांचा खरा लाभार्थी हा ग्रामीण भागातील गरीब मजूरवर्ग आहे. ज्यांच्याकडे शेती आहे; परंतु ती कोरडवाहू आहे. विशेष करून पेरणीच्या वेळी खासगी सावकारांकडून पैसे घेऊन पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. शेतकऱ्यांनी सावकाराची पायरी चढू नये म्हणून सरकारने पीककर्ज हे अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले आहे; परंतु काही शेतकऱ्यांकडे जुनी थकबाकी असल्याने त्यांना नवीन पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे इच्छा नसतानाही गरिबांना सावकाराची पायरी चढावी लागते. या आधीदेखील काही मोजक्या सावकारांनी तारण ठेवून दिलेली रक्कम परत केल्यावरही त्यांच्या शेतीवर कब्जा करून ती स्वत:च्या नावावर करून घेण्याचे प्रकार घडले होते; परंतु जवळपास १६ पेक्षा अधिक सावकारांविरुद्ध अशा तक्रारी आल्यावर त्याची सुनावणीसह त्यांच्या घराची झडती घेऊन कागपत्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पैसे भरल्याचे सिद्ध झाल्यावर संबंधित शेतकऱ्याला त्याच्या जमिनी परत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

चौकट

असे आहेत सावकारांचे दर

खासगी सावकरांचे दर शासनाने निश्चित करून दिले आहेत. त्यात नऊ टक्क्यांमध्ये शेतीसाठी कर्ज देताना काही तरी तारण ठेवले जाते. १२ टक्क्यांसाठी शेतीकर्ज हे विनातारण दिले जाते. १५ टक्क्यासाठी बिगर शेतीसाठी सोने, चांदी अथवा शेतजमीन तारण ठेवून कर्ज दिले जाते. तर १८ टक्के दराने कर्ज देताना बिगर शेती आणि कुठलीच वस्तू अथवा जमीन ही तारण न ठेवताही सावकार कर्ज देऊ शकतात.