शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

न्यायसत्ता चिरकाल टिकते- प्रदीप देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान जालना : राजसत्ता येतात आणि जातात, मात्र न्यायसत्ता चिरकाल टिकत असते. माणूस केंद्रिभूत ...

जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान

जालना : राजसत्ता येतात आणि जातात, मात्र न्यायसत्ता चिरकाल टिकत असते. माणूस केंद्रिभूत असलेल्या भारतीय संविधानाने ‘अस्मिता’ दिली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख यांनी केले.

जुना जालना शनिमंदिर परिसरातील संत भगवान बाबा मंगल कार्यालयात आयोजित जाणीव अस्मितेची साहित्य परिषद जालना शाखेतर्फे ‘समता दिन’ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर होते. यावेळी समारंभाचे उद्घाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राख, साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी राम गायकवाड, विधिज्ञ बी. एम. साळवे, गीतकार डॉ. विनायक पवार, कवी डॉ. सुहास सदावर्ते, रक्षित गायकवाड यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, आजची परिस्थिती पाहता जात, धर्म, पंथ या चौकटीतून बाहेर जात माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विधिज्ञ बी. एम. साळवे, विधिज्ञ प्रदीप देशमुख, गीतकार डॉ. विनायक पवार, कवी डॉ. सुहास सदावर्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल आणि पुस्तक भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमात गीतकार विनायक पवार यांनी ‘आजोबा’ ही कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. विधिज्ञ साळवे यांनी पाच दशकांच्या आपल्या प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला. डॉ. सदावर्ते यांनी आपल्या भाषणातून सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी राम गायकवाड यांनी पुरस्कार निवडीची भूमिका विशद केली. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय डॉ. विजयकुमार कुमठेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. शशिकांत पाटील यांनी केले. हर्षदा कोठूरकर यांनी आभार मानले.

कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कविसंमेलन कवी डॉ. प्रभाकर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी डॉ. बी. जी. श्रीरामे, प्रा. अशोक खेडकर, उषा बोर्डे, रेखा गतखणे, मनीष पाटील यांनी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. जालना शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्याच्या बाबतीत आपण अशा कार्यक्रमांना प्राधान्य देत असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.