शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायसत्ता चिरकाल टिकते- प्रदीप देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान जालना : राजसत्ता येतात आणि जातात, मात्र न्यायसत्ता चिरकाल टिकत असते. माणूस केंद्रिभूत ...

जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान

जालना : राजसत्ता येतात आणि जातात, मात्र न्यायसत्ता चिरकाल टिकत असते. माणूस केंद्रिभूत असलेल्या भारतीय संविधानाने ‘अस्मिता’ दिली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख यांनी केले.

जुना जालना शनिमंदिर परिसरातील संत भगवान बाबा मंगल कार्यालयात आयोजित जाणीव अस्मितेची साहित्य परिषद जालना शाखेतर्फे ‘समता दिन’ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर होते. यावेळी समारंभाचे उद्घाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राख, साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी राम गायकवाड, विधिज्ञ बी. एम. साळवे, गीतकार डॉ. विनायक पवार, कवी डॉ. सुहास सदावर्ते, रक्षित गायकवाड यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, आजची परिस्थिती पाहता जात, धर्म, पंथ या चौकटीतून बाहेर जात माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विधिज्ञ बी. एम. साळवे, विधिज्ञ प्रदीप देशमुख, गीतकार डॉ. विनायक पवार, कवी डॉ. सुहास सदावर्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल आणि पुस्तक भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमात गीतकार विनायक पवार यांनी ‘आजोबा’ ही कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. विधिज्ञ साळवे यांनी पाच दशकांच्या आपल्या प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला. डॉ. सदावर्ते यांनी आपल्या भाषणातून सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी राम गायकवाड यांनी पुरस्कार निवडीची भूमिका विशद केली. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय डॉ. विजयकुमार कुमठेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. शशिकांत पाटील यांनी केले. हर्षदा कोठूरकर यांनी आभार मानले.

कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कविसंमेलन कवी डॉ. प्रभाकर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी डॉ. बी. जी. श्रीरामे, प्रा. अशोक खेडकर, उषा बोर्डे, रेखा गतखणे, मनीष पाटील यांनी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. जालना शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्याच्या बाबतीत आपण अशा कार्यक्रमांना प्राधान्य देत असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.