शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

न्यायसत्ता चिरकाल टिकते- प्रदीप देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान जालना : राजसत्ता येतात आणि जातात, मात्र न्यायसत्ता चिरकाल टिकत असते. माणूस केंद्रिभूत ...

जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान

जालना : राजसत्ता येतात आणि जातात, मात्र न्यायसत्ता चिरकाल टिकत असते. माणूस केंद्रिभूत असलेल्या भारतीय संविधानाने ‘अस्मिता’ दिली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख यांनी केले.

जुना जालना शनिमंदिर परिसरातील संत भगवान बाबा मंगल कार्यालयात आयोजित जाणीव अस्मितेची साहित्य परिषद जालना शाखेतर्फे ‘समता दिन’ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर होते. यावेळी समारंभाचे उद्घाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राख, साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी राम गायकवाड, विधिज्ञ बी. एम. साळवे, गीतकार डॉ. विनायक पवार, कवी डॉ. सुहास सदावर्ते, रक्षित गायकवाड यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, आजची परिस्थिती पाहता जात, धर्म, पंथ या चौकटीतून बाहेर जात माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विधिज्ञ बी. एम. साळवे, विधिज्ञ प्रदीप देशमुख, गीतकार डॉ. विनायक पवार, कवी डॉ. सुहास सदावर्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल आणि पुस्तक भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमात गीतकार विनायक पवार यांनी ‘आजोबा’ ही कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. विधिज्ञ साळवे यांनी पाच दशकांच्या आपल्या प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला. डॉ. सदावर्ते यांनी आपल्या भाषणातून सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी राम गायकवाड यांनी पुरस्कार निवडीची भूमिका विशद केली. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय डॉ. विजयकुमार कुमठेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. शशिकांत पाटील यांनी केले. हर्षदा कोठूरकर यांनी आभार मानले.

कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कविसंमेलन कवी डॉ. प्रभाकर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी डॉ. बी. जी. श्रीरामे, प्रा. अशोक खेडकर, उषा बोर्डे, रेखा गतखणे, मनीष पाटील यांनी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. जालना शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्याच्या बाबतीत आपण अशा कार्यक्रमांना प्राधान्य देत असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.