शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

किराणा मालाचे दर स्थिर : खाद्यतेलाचा मात्र पुन्हा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

जालना : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बाजारात ग्राहकी नाही. सर्वच किराणा व धान्य मालाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, भाव ...

जालना : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बाजारात ग्राहकी नाही. सर्वच किराणा व धान्य मालाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, भाव स्थिर आहेत. खाद्यतेलांच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. डाळींच्या स्टाॅक लिमिट नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणार असल्याचे कळते.

खाद्यतेलांच्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने त्यावरील आयात शुल्क कमी केले होते. त्यामुळे मागील आठवड्यात सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरांत क्विंटलमागे एक हजार रुपयांची मंदी आली होती. मात्र, ही मंदी जास्त काळ टिकली नाही. खाद्यतेल पुन्हा क्विंटलमागे एक हजार रुपयांनी महागले. सध्या पामतेलाचे दर १३२००, सरकी तेल १४३००, सूर्यफूल तेल १६५००, सोयाबीन तेल १५००० आणि करडी तेलाचे दर २१२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. डाळींवर असलेली स्टॉक लिमिट नियमांनुसार पाळली जावी, असा सरकारचा आग्रह असून, या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमांतर्गत सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्या असलेल्या डाळींच्या साठ्याची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास डाळीचा साठा सरकारला माहीत होईल आणि डाळींच्या किमतींवर नियंत्रण ठेवणे सरकारला सोपे होईल. केंद्र सरकारच्या स्टॉक लिमिट नियमामधून हरभरा वगळला असल्याची अफवा बाजारपेठेत जोरात आहे. त्यामुळे वायदा बाजारात हरभऱ्याच्या दरात १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार होत आहे. हरभऱ्याच्या बाबतीत अद्याप असा कुठलाही निर्णय झाला नसून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. देशात २८ प्रकारच्या डाळींचा व्यापार होतो. काही डाळी समर्थन मूल्यांच्या नियमांच्या कक्षात येत नाहीत. काबुली चणा, मटर, राजमा, लोंबिया आणि मोट आदी डाळींना स्टॉक लिमिटच्या कक्षात ठेवू नये, अशी विनंती व्यापाऱ्यांनी सरकारकडे केली आहे. सध्या हरभरा डाळीचे दर ५६०० ते ५८००, तूर डाळ ८५०० ते ९५००, मूग डाळ ८००० ते ९०००, मसूर डाळ ७००० ते ७५०० आणि उडीद डाळीचे भाव ८००० ते ९८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

आषाढीनिमित्त उपवासांच्या पदार्थांना मागणी

येत्या मंगळवारी आषाढी एकादशी असून, त्या निमित्ताने उपवासाच्या पदार्थांना मागणी चांगली राहील, असे व्यापाऱ्यांना वाटते. सध्या शेंगदाण्याचे भाव ८००० ते ९५००, साबूदाणा ४५०० ते ५२००, भगर ६००० ते ९००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. पेंड खजुराचे भाव ५० ते ८०० रुपये प्रतिकिलो असे आहेत.