शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत असलेला संभ्रम दूर करावा- मेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST

आ. मेटे शनिवारी दुपारी जालना येथे आले होते. शहरातील हॉटेल शिवनेरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. ...

आ. मेटे शनिवारी दुपारी जालना येथे आले होते. शहरातील हॉटेल शिवनेरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. मेटे म्हणाले की, २५ जानेवारीपासून एसईबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे. ती किती दिवस चालेल हे माहीत नाही. असे असतानाही राज्य सरकारने कधी नव्हे, तेवढी नोकरभरती करण्याची घाई सुरू केली आहे. नोकर भरतीमध्ये मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा पर्याय आहे. या आरक्षणाचा मराठा समाजातील मुला-मुलींनी लाभ घ्यावा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न केला. परंतु, हे सरकार निर्णयच घेत नव्हते. उच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर आता कुठे सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत निर्णय घेतला आहे. यावर काही लोकांनी शंका उपस्थित केली आहे. हे आरक्षण घेतल्यावर काही परिणाम होऊ शकतो. परंतु, असे अजिबात नाही. मराठा समाजाला एसईबीसीचे आरक्षण मिळाले तर ईडब्ल्यूएसचे आरक्षण बंद होणार आहे. सरकारने २३ डिसेंबर रोजी काढलेल्या जीआरमध्ये सुधारणा करून लोकांमध्ये असलेली शंका दूर करावी, असेही ते म्हणाले. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत ओबीसी मंत्र्यांकडून व संघटनांकडून होणारे आरोप हे बालिशपणाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारने मराठा समाजाचा खेळखंडोबा लावला

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा खेळ खंडोबा लावला आहे. अशोक चव्हाण यांच्याकडे हे सदर प्रकरण आल्यानंतर मराठा समाजाबद्दल एकही पॉझिटिव्ह गोष्ट झालेली नाही. राज्य सरकार व अशोक चव्हाण हे आरक्षणाबद्दल काळजी घेत नाहीत. त्यामुळे मराठा समाजावर ही वेळ आली असल्याचा आरोपही आ.मेटे यांनी केला.