शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत असलेला संभ्रम दूर करावा- मेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST

आ. मेटे शनिवारी दुपारी जालना येथे आले होते. शहरातील हॉटेल शिवनेरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. ...

आ. मेटे शनिवारी दुपारी जालना येथे आले होते. शहरातील हॉटेल शिवनेरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. मेटे म्हणाले की, २५ जानेवारीपासून एसईबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे. ती किती दिवस चालेल हे माहीत नाही. असे असतानाही राज्य सरकारने कधी नव्हे, तेवढी नोकरभरती करण्याची घाई सुरू केली आहे. नोकर भरतीमध्ये मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा पर्याय आहे. या आरक्षणाचा मराठा समाजातील मुला-मुलींनी लाभ घ्यावा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न केला. परंतु, हे सरकार निर्णयच घेत नव्हते. उच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर आता कुठे सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत निर्णय घेतला आहे. यावर काही लोकांनी शंका उपस्थित केली आहे. हे आरक्षण घेतल्यावर काही परिणाम होऊ शकतो. परंतु, असे अजिबात नाही. मराठा समाजाला एसईबीसीचे आरक्षण मिळाले तर ईडब्ल्यूएसचे आरक्षण बंद होणार आहे. सरकारने २३ डिसेंबर रोजी काढलेल्या जीआरमध्ये सुधारणा करून लोकांमध्ये असलेली शंका दूर करावी, असेही ते म्हणाले. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत ओबीसी मंत्र्यांकडून व संघटनांकडून होणारे आरोप हे बालिशपणाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारने मराठा समाजाचा खेळखंडोबा लावला

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा खेळ खंडोबा लावला आहे. अशोक चव्हाण यांच्याकडे हे सदर प्रकरण आल्यानंतर मराठा समाजाबद्दल एकही पॉझिटिव्ह गोष्ट झालेली नाही. राज्य सरकार व अशोक चव्हाण हे आरक्षणाबद्दल काळजी घेत नाहीत. त्यामुळे मराठा समाजावर ही वेळ आली असल्याचा आरोपही आ.मेटे यांनी केला.