शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

रोगराईमुळे राजूर परिसरातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूरसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह धुके दाटून येत आहे. त्यामुळे या भागातील रबी ...

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूरसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह धुके दाटून येत आहे. त्यामुळे या भागातील रबी हंगामातील फुलोऱ्यात असलेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असून, पिकांना मोठा फटका बसत आहे. खरिपापाठोपाठ रबी हंगामही वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यावर्षी पावसाळ्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांची वाट लागली. कपाशी, मका, सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. राजूर परिसरात यावर्षी रब्बीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके तजेलदार असताना अचानक गेल्या आठ दिवसांपासून ढग दाटून येत असून, धुके पडत असल्याने फुलोऱ्यातील पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या गव्हाला थंडीची गरज असताना धुके पडत आहेत. त्यामुळे पिके वाया जाण्याची भीती बळावली आहे. तसेच दूषित वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला असून, आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. यावर्षी आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. परंतु, तो गळून पडत असल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरात गेल्या दोन वर्षांपासून फळबाग लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. धुक्यामुळे द्राक्ष बागाही धोक्यात असून, धुक्यामुळे फुलोऱ्यात असलेली ज्वारी काळी पडत आहे. रब्बीची पिके ऐन भरात असताना दूषित वातावरणामुळे ती वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.