शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

विमा कंपनीकडून मदत मिळणार की नाही, शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

भोकरदन : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी नुकसान भरपाईपोटी खरिपात पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर करून कोटी रुपयांचा विमा उतरून ...

भोकरदन : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी नुकसान भरपाईपोटी खरिपात पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर करून कोटी रुपयांचा विमा उतरून घेतला आहे. अतिवृष्टीत खरिप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे महसूलकडून पिकांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. शासनानेदेखील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात १९ कोटी ११ लाख ८३ हजार रुपयांची मदत दिली आहे. ती रक्कम अदा करण्यास बँकांकडून सुरुवात करण्यात आली असली तरी झालेल्या नुकसानाचा पीक विमा मिळणार की नाही, या संभ्रमात शेतकरी आहेत.

सततची नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे पडणारा दुष्काळ लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळात मदत करता यावी म्हणून २०१६-२०२७ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना अमलात आणली. शेतकऱ्यांचादेखील कल विमा भरण्याकडे दिवसेंदिवस वाढत गेला. यात भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. २०१९-२०२० मध्ये खरिपात १५७ गावातील शेतकऱ्यांनी रिलायन्स कंपनीकडे उसनवारी करून पिकांचा विमा उतरविला. यात सोयाबीन, कपाशी, मका, तूर, मूग, उडीद अशा खरीप पिकांवर संरक्षण कवच म्हणून पीकविमा उतरविला; मात्र सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ न सोडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. यात खरीप पिकांचे एक लाख हेक्टरच्यावर क्षेत्र बाधित झाले. शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रशासनानेदेखील पंचनामे करून सदर प्रस्ताव शासन दरबारी प्रस्तावित केला असता, शेतमालाची आणेवारी ५० टक्केच्या आत आली. त्यानुसार दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाची मदत जाहीर करून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग केली; परंतु विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळते की नाही, या संभ्रमात शेतकरी आहेत.

खरिपात शेतातील विविध पिकांवर मोठी तजवीज करून पाच हजार रुपयांचा पीकविमा उतरविला होता; मात्र अतिवृष्टीच्या पावसात सगळेच धुवून निघाले. यासाठी पीकविमा मंजूर होणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित विभागाकडे मागणीदेखील केली आहे. नुसती उडवाउडवीचे उत्तरे ऐकायला मिळत आहेत. याकडे शासनानेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे.

अरुण देशमुख, शेतकरी, भोकरदन.