शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अखेर ते उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

जालना : अंबड येथे उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांची तब्येत बिघडल्याने त्यांना जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात भरती करण्यात ...

जालना : अंबड येथे उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांची तब्येत बिघडल्याने त्यांना जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. शुक्रवारी पालकमंत्री राजेश टोपे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि कुटुंबीयांना १० लाख रुपये देण्यात येतील, असे राज्य सरकारने जाहीर केले होते; परंतु आजपर्यंत या कुटुंबीयांना सरकारकडून नोकरी किंवा आर्थिक मदत मिळाली नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनाेज जरांगे यांच्यासह शहिदांच्या कुटुंबातील सदस्यांनी सोमवारपासून अंबड येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पडत्या पावसातही हे उपोषण सुरूच होते. दरम्यान, मनोज जरांगे, बाळकृष्ण लेवडे, हरीओम येवले, सुनील शेळके, माणिक जगताप, संतोष गुजर आदी उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अंबड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मनोज जरांगे व बाळकृष्ण लेवडे यांना जालना येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. परंतु, जरांगे व लेवडे यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास नकार दिला होता. दरम्यान, शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी टोपे म्हणाले, क्रांती मोर्चा आंदोलनाच्या वेळेस ४२ आंदोलकांनी बलिदान दिले. या बलिदान देणाऱ्या आंदोलकांसाठी तत्कालीन शासनाने काही रक्कम व त्यांच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही त्या आश्वासनाबद्दल कटिबद्ध आहोत. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. पद्मजा सराफ, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, सपोनि. निरीक्षक महेश टाक, नगरसेवक ढोबळे, मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक परळी अमित घाडगे, शिवराय जोगदंड, हनुमंत पाटील, योगेश गांगर्डे, परमेश्वर काळे, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.