शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

विश्वासघातकी लोकांसोबत काम करायचे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:33 IST

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितली आणि ५६ वर मुख्यमंत्री झाले. ५४ वर उपमुख्यमंत्री झाले आणि ...

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितली आणि ५६ वर मुख्यमंत्री झाले. ५४ वर उपमुख्यमंत्री झाले आणि ४४ वर महसूलमंत्री झाले. अशा विश्वासघातकी लोकांसोबत भाजप आता काम करणार नाही. जे पक्ष प्रामाणिकपणे सोबत राहतील त्यांना घेऊन आगामी निवडणुका लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जालना येथे व्यक्त केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शनिवारी जालना येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, भाजप पक्ष स्वबळावर मजबूत झाला आहे. ज्यांनी निवडणुकीत मोदींच्या नावे मते मागितली त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे आगामी काळात जे पक्ष प्रामाणिकपणे सोबत राहतील त्यांना सोबत घेऊन नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजप पदाधिकाऱ्यांचे काम चांगले सुरू आहे. नगरसेवकांनी जनतेची कामे करावीत. केलेल्या कामांचा हिशोब जनतेला द्यावा. कामांचा अहवाल जनतेसमोर सादर करावा, असे सांगत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले. या वेळी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, राहुल लोणीकर, भास्कर दानवे, राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे, सतीश जाधव, बाबासाहेब कोलते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.