शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

बुरशीनाशकाची आळवणी करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

भोकरदन : भोकरदन परिसरातील शेतकऱ्यांच्या मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान थांबविण्यासाठी मिरचीवर बुरशीनाशकाची आळवणी करावी, असे ...

भोकरदन : भोकरदन परिसरातील शेतकऱ्यांच्या मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान थांबविण्यासाठी मिरचीवर बुरशीनाशकाची आळवणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी केले आहे.

भोकरदन, पेरजापूर, तळेकरवाडी शिवारातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील बहरलेल्या मिरची पिकाला बुरशी लागून उबळ लागली व पूर्ण पीक आठ दिवसांत वाळले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी मिरचीचे पीक उपटून टाकत आहेत. मात्र, ज्या पिकाला उबळची नेमकी लागण झाली आहे, अशा पिकाला बुरशीनाशकांची आळवणी केली तर पीक सुधारते आहे, असे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी सांगितले. या वेळी मंडळ कृषी अधिकारी स्वाती कांगणे, मंडळ कृषी अधिकारी पाटील, कृषी साहाय्यक कल्पना आरक यांनी शेतात जाऊन संबंधित शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी बारकुबा तळेकर, कृष्णा हिवरकर, कैलास सुसर, आप्पाराव देशमुख, राजू तळेकर, संतोष जाधव, समाधान तळेकर, संतोष तळेकर हे शेतकरी उपस्थित होते.