शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

६१ वर्षात १४ वर्षे महिलांनी भूषविले सरपंचपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST

गणेश पंडित केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा ग्रामपंचायतीच्या ६१ वर्षाच्या इतिहासात चार महिलांना १४ वर्षे सरपंचपदी काम करण्याची संधी ...

गणेश पंडित

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा ग्रामपंचायतीच्या ६१ वर्षाच्या इतिहासात चार महिलांना १४ वर्षे सरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली. मात्र, अनेक महिलांच्या कार्यकाळात त्यांच्या घरातील पुरूषांनी किंवा सत्ताधारी गटातील प्रमुखाने पडद्यामागून सूत्रे हलविली. त्यामुळे गावातील महिलांविषयक प्रश्न कायम राहिले. ते प्रश्न ना पुरूष सरपंचांना सोडविता आले ना महिला सरपंचांच्या काळात सुटले!

आज अनेक क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने कामे करीत आहेत. त्यात राजकीय क्षेत्रही मागे राहिलेले नाही. शासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य, सरपंचपदाचे महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण काढण्यात येत आहे. त्यामुळे आपसूकच महिलांना ग्रामपंचायतीचा म्हणजे गावाचा कारभार हाकून गावाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आपले योगदान देण्याचा मार्ग खुला झाला. केदारखेडा ग्रामपंचायतीच्या ६१ वर्षाच्या कालावधीतील चार महिलांच्या हाती १४ वर्षे सरपंचपद राहिले. गत पंचवार्षिक निवडणुकीत सात महिला सदस्य निवडून आल्या होत्या. त्यातील इंदुमती मुरकुटे यांनी नोव्हेंबर २०१५ ते नोव्हेंबर २०२० असे पाच वर्षे सरपंच म्हणून काम पाहिले. तर त्यापूर्वी कै. जाईबाई हिंमतराव तांबडे यांनी जानेवारी १९६६ ते डिसेंबर १९६६ असे एक वर्ष, कै. शांताबाई मधुकर तांबडे यांनी सप्टेंबर १९९५ ते सप्टेंबर २००० असे पाच वर्षे, येणूबाई विष्णू कांबळे यांनी सप्टेंबर २००२ ते नोव्हेंबर २००५ तीन वर्षे सरपंच म्हणून ग्रामपंचायतीचे कामकाज पाहिले.

महिलांना सरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली असली तरी त्यांना गावाच्या विकासासाठी त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविता आलेल्या नाहीत. कधी पती, कधी मुलगा तर कधी सत्तेतील पदाधिकारी कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याने त्यांच्या कामकाजावर त्याचा परिणामा झाला. विशेषत: या महिलांना काम करताना गावातील महिलांसाठी सोयी-सुविधांनीयुक्त सार्वजनिक शौचालय उभे करता आले नाही. जे शौचालय आहे तेथे सोयी-सुविधांचा अभाव आहे. गत वर्षी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आल्याने पाण्याची सोय झाली. मात्र, त्या योजनेपूर्वी पाण्यासाठी महिलांची अहोरात्र होणारी धावपळ वेगळीच होती. शिवाय महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनाही गावात प्रभावीपणे राबविण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यापूर्वी झाले आहे. तेच दुर्लक्ष महिला सरपंच असतानाही केवळ पुरूषांच्या हस्तक्षेपामुळे झाल्याचे दिसून येत आहे. आजही महिलांशी निगडीत अनेक प्रश्न आहेत. महिलांच्या समस्या खऱ्या अर्थाने महिला सरपंच प्राधान्याने सोडवू शकतात. त्याही त्यांच्या संकल्पनेतून विकास कामे करता आली तर, अन्यथा पुरूषांचा कामकाजात हस्तक्षेप झाला तर त्यांना केवळ सहीपुरताच सरपंचपदाचा मान राहणार आहे आणि महिलांशी निगडीत प्रश्नही कायम राहणार आहेत.

१२४७ महिला मतदार

केदारखेडा गावात १२४७ महिला मतदार आहेत. यात प्रभाग एकमध्ये ३३७, प्रभाग दोनमध्ये ३६५, प्रभाग तीनमध्ये ३१८, प्रभाग चारमध्ये २२७ महिला मतदार आहेत. यात निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या महिलांपैकी ६ महिलांची ग्रामपंचायत सदस्यपदी वर्णी लागणार आहे. तर ५ पुरूष सदस्य राहणार आहेत.

ग्रामीण भागात जुन्या संकल्पना कायम

महिला सरपंच चांगले काम करू शकतात. मात्र, पुरूषांच्या हस्तक्षेपामुळे महिलांची पदे ही केवळ नावाला उरली आहेत. कामकाज करताना कधी घरातील पुरूषांचा तर कधी सत्तेतील सहकाऱ्यांचा हस्तक्षेप होतो. आजही ग्रामीण भागात महिलांची चूल आणि मूल ही संकल्पना कायम आहे. मुलगी शिकली आणि प्रगती झाली ही बाब खरी आहे. मात्र, राजकारणात ते सूत्र लागू होत नाही.

इंदुमती मुरकुटे

माजी सरपंच, केदारखेडा