शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात १०३ टक्के पाऊस, प्रकल्पांमध्ये ४० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST

जालना : जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीपेक्षा अधिक ६२३.१० मिमी म्हणजे तब्बल १०३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाने वार्षिक सरासरी ...

जालना : जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीपेक्षा अधिक ६२३.१० मिमी म्हणजे तब्बल १०३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांमध्ये केवळ ४१.१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे तर तब्बल २४ प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाचे आगमन झाले आहे; परंतु, मध्यंतरी पावसाने जिल्हाभरात मोठा खंड दिला होता. त्यात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात दोन प्रकल्पांत २५ टक्क्यांच्यामध्ये, चार प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये, सात प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्क्यांच्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे तर १३ प्रकल्पांची पाणीपातळी ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये आहे. लघु प्रकल्पांची स्थिती पाहता २४ प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा आहे. २२ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांच्या मध्ये, १० प्रकल्पांमध्ये २६ ते ९० टक्क्यांच्या मध्ये तर सात प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. १४ प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांच्या वर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती

जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा हा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. कल्याण मध्यम प्रकल्पात ४६.२४ टक्के पाणीसाठा झाला आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ३४.३० टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात १.९९ टक्के, धामना प्रकलपात ३०.७९ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ८.१६ टक्के तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ४३.७१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

१५ पैकी तीन बंधाऱ्यांत पाणी

जिल्ह्यात १५ कोल्हापुरी बंधारे आहेत. त्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील बंधारा तुडूंब भरला आहे. तर करडगाव, दहेगाव येथील बंधाऱ्यांमध्ये पाण्याची आवक झाली आहे. उर्वरित कोल्हापुरी बंधारेही पावसाअभावी कमी पाणी पातळीत आहेत.

पिकांना दिलासा, काही ठिकाणी नुकसान

पंधरा ते वीस दिवसांनंतर सलग पाच ते सहा दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सुकून जाणाऱ्या पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, याच कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.