शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
2
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
3
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
4
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
5
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
6
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
7
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
8
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
9
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
10
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
11
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
12
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
13
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
16
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
17
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
18
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
19
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
20
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात १०३ टक्के पाऊस, प्रकल्पांमध्ये ४० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST

जालना : जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीपेक्षा अधिक ६२३.१० मिमी म्हणजे तब्बल १०३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाने वार्षिक सरासरी ...

जालना : जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीपेक्षा अधिक ६२३.१० मिमी म्हणजे तब्बल १०३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांमध्ये केवळ ४१.१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे तर तब्बल २४ प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाचे आगमन झाले आहे; परंतु, मध्यंतरी पावसाने जिल्हाभरात मोठा खंड दिला होता. त्यात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात दोन प्रकल्पांत २५ टक्क्यांच्यामध्ये, चार प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये, सात प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्क्यांच्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे तर १३ प्रकल्पांची पाणीपातळी ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये आहे. लघु प्रकल्पांची स्थिती पाहता २४ प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा आहे. २२ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांच्या मध्ये, १० प्रकल्पांमध्ये २६ ते ९० टक्क्यांच्या मध्ये तर सात प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. १४ प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांच्या वर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती

जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा हा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. कल्याण मध्यम प्रकल्पात ४६.२४ टक्के पाणीसाठा झाला आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ३४.३० टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात १.९९ टक्के, धामना प्रकलपात ३०.७९ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ८.१६ टक्के तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ४३.७१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

१५ पैकी तीन बंधाऱ्यांत पाणी

जिल्ह्यात १५ कोल्हापुरी बंधारे आहेत. त्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील बंधारा तुडूंब भरला आहे. तर करडगाव, दहेगाव येथील बंधाऱ्यांमध्ये पाण्याची आवक झाली आहे. उर्वरित कोल्हापुरी बंधारेही पावसाअभावी कमी पाणी पातळीत आहेत.

पिकांना दिलासा, काही ठिकाणी नुकसान

पंधरा ते वीस दिवसांनंतर सलग पाच ते सहा दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सुकून जाणाऱ्या पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, याच कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.