शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
3
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
4
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
5
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
6
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
7
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
8
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
9
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
10
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
11
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
12
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
13
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
14
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
15
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
16
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
17
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
18
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
19
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
20
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, भारतीय अधिका-यांवर हेरगिरीचे आरोप

By admin | Updated: November 3, 2016 15:05 IST

पाकिस्तान रडीचा डाव खेळत असून भारतीय उच्चायुक्तालयातील अधिका-यांवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद / नवी दिल्ली, दि. 3 - पाकिस्तानी हेराची पोलखोल करुन त्याला पुन्हा मायदेशी पाठवल्यानंतर पाकिस्तानने उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली असून भारतीय उच्चायुक्तालयातील अधिका-यांवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत आहे. आठ भारतीय अधिका-यांवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून त्यांची नावेही उघड केली आहेत. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. 
 
भारताने अगोदरच अधिका-यांना मायदेशी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायुक्तालयातील मोहम्मद अख्तर या अधिका-याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सुटका केली होती. त्यानंतर भारताने मोहम्मद अख्तर याच्यासहित सहा अधिका-यांना तातडीने भारत सोडून जायला सांगितले होते.  
 
 
पाकिस्तानने सुरुवातीला फक्त दोन अधिका-यांवर आरोप केले होते, मात्र बुधवार संध्याकाळपर्यंत आकडा आठवर पोहोचला. हे अधिकारी रॉ किंवा गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताप्रमाणे राजेश कुमार अग्निहोत्री, बलबीर सिंग, अनुराग सिंग, अमरदीप सिंग भट्टी, धर्मेंद्र, विजय कुमार वर्मा, माधवन नंदा कुमार, जयाबालन सेंथिल अशी अधिका-यांची नावे आहेत. मात्र परराष्ट्र खात्याने या नावांना दुजोरा दिलेला नाही.
 
(हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकास अटक)
 
भारतीय अधिकारी हेरेगिरी करत होते, तसंच चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरमध्ये अडथळा आणण्याचा आणि देशात भीती, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमधून केला जात आहे. पाकिस्तानमध्ये खबरींचं जाळं पसरवून, पाकिस्तानविरोधात पुरावे गोळा केले जात होते असाही दावा करण्यात आला आहे. 
 
दरम्यान भारताने तंबी दिल्यानंतर मायदेशी परतलेले पाकिस्तानी अधिकारी मायदेशी पोहोचले आहेत. भारताने केलेल्या कारवाईविरोधात राग म्हणून पाकिस्तान जशास तसं उत्तर देण्यासाठी ही कारवाई करत असल्याचं भारताने म्हटलं आहे.