शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

औषधांनाही न जुमानणाऱ्या मलेरियाच्या भारताला धोका

By admin | Updated: February 21, 2015 03:41 IST

औषधांना न जुमानणारे मलेरियाचे परोपजीवी म्यानमार-भारत सीमेवर आढळल्यामुळे भारताला धोका निर्माण झाला आहे.

नवीन अभ्यास : म्यानमारच्या सीमेवरुन परोपजीवींचा प्रसार; आजाराच्या निर्मूलनात अडथळेलंडन : औषधांना न जुमानणारे मलेरियाचे परोपजीवी म्यानमार-भारत सीमेवर आढळल्यामुळे भारताला धोका निर्माण झाला आहे. या परोपजीवींमुळे मलेरियाविरोधी उपचार निरुपयोगी ठरून लक्षावधी लोकांचे जीवित संकटात आले असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.भारतात औषधांना प्रतिकार करणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवींची वाढ ही मलेरियाचे जगातून नियंत्रण व निर्मूलन करण्याच्या कामात गंभीर स्वरूपाचा अडथळा निर्माण करणारी असल्याचे संशोधकांनी म्हटले. औषधांना न जुमानणारे परोपजीवी आशियातून आफ्रिका उपखंडात पसरले किंवा आफ्रिकेत नव्याने निर्माण झाले (असे यापूर्वी अनेक वेळा घडले आहे) तर लक्षावधी लोकांचे जीवित धोक्यात येऊ शकते,असे हे शास्त्रज्ञ म्हणत आहेत.म्यानमारमध्ये मलेरियावरील उपचारांच्या ५५ केंद्रांवरील परोपजीवींचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. काही विशिष्ट भागातील केल्च जीनचे (के-१३) नमुने घेऊन तेथील जीवनपद्धतीत काही बदल झाला आहे का याचा तपास संशोधक करणार आहेत. केल्च जीन हे औषधांना प्रतिकार करणारे म्हणून ओळखले जातात. भारतीय सीमेपासून २५ किलोमीटरवरील होमालीन, सगार्इंग भागात औषधाला प्रतिकार करणारे परोपजीवी असल्याला संशोधकांच्या तुकडीने दुजोरा दिला आहे. वुर्मवूड या झुडुपापासून निघणाऱ्या मलेरियाविरोधी औषधासाठी म्यानमार आघाडीवर असल्याचे समजले जाते व जगात मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठीही म्यानमारची महत्त्वाची भूमिका समजली जाते, असे थायलंडमधील माहिडोल-आॅक्सफर्ड ट्रॉपिकल मेडिसीन रिसर्च केंद्राचे व आॅक्स्फर्ड युनिव्हर्सिटीतील या विषयावरील वरिष्ठ अभ्यासक डॉ. चार्लस् वुड्रो यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)संशोधकांनी ९४० डीएएनएचा केला अभ्याससीमेवरील भागात सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे हे चांगले समजले म्हणजे नेमके काय उपाय राबवायचे यासाठी आपल्याला तयार राहता येईल,असे डॉ. वुड्रो म्हणाले. संशोधकांच्या तुकडीने म्यानमारमधून तसेच म्यानमारच्या सीमेवरील थायलंड व बांगलादेशातून २०१३ व २०१४ मध्ये मलेरियाची बाधा झालेल्या ९४० नमुन्यांच्या डीएनएचे सिक्वेन्सेस गोळा केले आहेत.दक्षिण-पूर्व आशियातच मलेरियाचा धोका का निर्माण झाला तर तेथे मलेरियाला नैसर्गिकरीत्या तोंड देण्याची पातळी खूप खाली आहे. सीमेवरील भागात मलेरियाला तोंड देण्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. वुड्रो म्हणाले. आज तरी मलेरियाचा फैलाव भारतात होण्याची मोठी भीती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.