शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

औषधांनाही न जुमानणाऱ्या मलेरियाच्या भारताला धोका

By admin | Updated: February 21, 2015 03:41 IST

औषधांना न जुमानणारे मलेरियाचे परोपजीवी म्यानमार-भारत सीमेवर आढळल्यामुळे भारताला धोका निर्माण झाला आहे.

नवीन अभ्यास : म्यानमारच्या सीमेवरुन परोपजीवींचा प्रसार; आजाराच्या निर्मूलनात अडथळेलंडन : औषधांना न जुमानणारे मलेरियाचे परोपजीवी म्यानमार-भारत सीमेवर आढळल्यामुळे भारताला धोका निर्माण झाला आहे. या परोपजीवींमुळे मलेरियाविरोधी उपचार निरुपयोगी ठरून लक्षावधी लोकांचे जीवित संकटात आले असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.भारतात औषधांना प्रतिकार करणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवींची वाढ ही मलेरियाचे जगातून नियंत्रण व निर्मूलन करण्याच्या कामात गंभीर स्वरूपाचा अडथळा निर्माण करणारी असल्याचे संशोधकांनी म्हटले. औषधांना न जुमानणारे परोपजीवी आशियातून आफ्रिका उपखंडात पसरले किंवा आफ्रिकेत नव्याने निर्माण झाले (असे यापूर्वी अनेक वेळा घडले आहे) तर लक्षावधी लोकांचे जीवित धोक्यात येऊ शकते,असे हे शास्त्रज्ञ म्हणत आहेत.म्यानमारमध्ये मलेरियावरील उपचारांच्या ५५ केंद्रांवरील परोपजीवींचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. काही विशिष्ट भागातील केल्च जीनचे (के-१३) नमुने घेऊन तेथील जीवनपद्धतीत काही बदल झाला आहे का याचा तपास संशोधक करणार आहेत. केल्च जीन हे औषधांना प्रतिकार करणारे म्हणून ओळखले जातात. भारतीय सीमेपासून २५ किलोमीटरवरील होमालीन, सगार्इंग भागात औषधाला प्रतिकार करणारे परोपजीवी असल्याला संशोधकांच्या तुकडीने दुजोरा दिला आहे. वुर्मवूड या झुडुपापासून निघणाऱ्या मलेरियाविरोधी औषधासाठी म्यानमार आघाडीवर असल्याचे समजले जाते व जगात मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठीही म्यानमारची महत्त्वाची भूमिका समजली जाते, असे थायलंडमधील माहिडोल-आॅक्सफर्ड ट्रॉपिकल मेडिसीन रिसर्च केंद्राचे व आॅक्स्फर्ड युनिव्हर्सिटीतील या विषयावरील वरिष्ठ अभ्यासक डॉ. चार्लस् वुड्रो यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)संशोधकांनी ९४० डीएएनएचा केला अभ्याससीमेवरील भागात सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे हे चांगले समजले म्हणजे नेमके काय उपाय राबवायचे यासाठी आपल्याला तयार राहता येईल,असे डॉ. वुड्रो म्हणाले. संशोधकांच्या तुकडीने म्यानमारमधून तसेच म्यानमारच्या सीमेवरील थायलंड व बांगलादेशातून २०१३ व २०१४ मध्ये मलेरियाची बाधा झालेल्या ९४० नमुन्यांच्या डीएनएचे सिक्वेन्सेस गोळा केले आहेत.दक्षिण-पूर्व आशियातच मलेरियाचा धोका का निर्माण झाला तर तेथे मलेरियाला नैसर्गिकरीत्या तोंड देण्याची पातळी खूप खाली आहे. सीमेवरील भागात मलेरियाला तोंड देण्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. वुड्रो म्हणाले. आज तरी मलेरियाचा फैलाव भारतात होण्याची मोठी भीती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.