शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

औषधांनाही न जुमानणाऱ्या मलेरियाच्या भारताला धोका

By admin | Updated: February 21, 2015 03:41 IST

औषधांना न जुमानणारे मलेरियाचे परोपजीवी म्यानमार-भारत सीमेवर आढळल्यामुळे भारताला धोका निर्माण झाला आहे.

नवीन अभ्यास : म्यानमारच्या सीमेवरुन परोपजीवींचा प्रसार; आजाराच्या निर्मूलनात अडथळेलंडन : औषधांना न जुमानणारे मलेरियाचे परोपजीवी म्यानमार-भारत सीमेवर आढळल्यामुळे भारताला धोका निर्माण झाला आहे. या परोपजीवींमुळे मलेरियाविरोधी उपचार निरुपयोगी ठरून लक्षावधी लोकांचे जीवित संकटात आले असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.भारतात औषधांना प्रतिकार करणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवींची वाढ ही मलेरियाचे जगातून नियंत्रण व निर्मूलन करण्याच्या कामात गंभीर स्वरूपाचा अडथळा निर्माण करणारी असल्याचे संशोधकांनी म्हटले. औषधांना न जुमानणारे परोपजीवी आशियातून आफ्रिका उपखंडात पसरले किंवा आफ्रिकेत नव्याने निर्माण झाले (असे यापूर्वी अनेक वेळा घडले आहे) तर लक्षावधी लोकांचे जीवित धोक्यात येऊ शकते,असे हे शास्त्रज्ञ म्हणत आहेत.म्यानमारमध्ये मलेरियावरील उपचारांच्या ५५ केंद्रांवरील परोपजीवींचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. काही विशिष्ट भागातील केल्च जीनचे (के-१३) नमुने घेऊन तेथील जीवनपद्धतीत काही बदल झाला आहे का याचा तपास संशोधक करणार आहेत. केल्च जीन हे औषधांना प्रतिकार करणारे म्हणून ओळखले जातात. भारतीय सीमेपासून २५ किलोमीटरवरील होमालीन, सगार्इंग भागात औषधाला प्रतिकार करणारे परोपजीवी असल्याला संशोधकांच्या तुकडीने दुजोरा दिला आहे. वुर्मवूड या झुडुपापासून निघणाऱ्या मलेरियाविरोधी औषधासाठी म्यानमार आघाडीवर असल्याचे समजले जाते व जगात मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठीही म्यानमारची महत्त्वाची भूमिका समजली जाते, असे थायलंडमधील माहिडोल-आॅक्सफर्ड ट्रॉपिकल मेडिसीन रिसर्च केंद्राचे व आॅक्स्फर्ड युनिव्हर्सिटीतील या विषयावरील वरिष्ठ अभ्यासक डॉ. चार्लस् वुड्रो यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)संशोधकांनी ९४० डीएएनएचा केला अभ्याससीमेवरील भागात सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे हे चांगले समजले म्हणजे नेमके काय उपाय राबवायचे यासाठी आपल्याला तयार राहता येईल,असे डॉ. वुड्रो म्हणाले. संशोधकांच्या तुकडीने म्यानमारमधून तसेच म्यानमारच्या सीमेवरील थायलंड व बांगलादेशातून २०१३ व २०१४ मध्ये मलेरियाची बाधा झालेल्या ९४० नमुन्यांच्या डीएनएचे सिक्वेन्सेस गोळा केले आहेत.दक्षिण-पूर्व आशियातच मलेरियाचा धोका का निर्माण झाला तर तेथे मलेरियाला नैसर्गिकरीत्या तोंड देण्याची पातळी खूप खाली आहे. सीमेवरील भागात मलेरियाला तोंड देण्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. वुड्रो म्हणाले. आज तरी मलेरियाचा फैलाव भारतात होण्याची मोठी भीती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.