शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषणामुळे भारतीयांचा अकाली मृत्यू

By admin | Updated: February 22, 2015 00:03 IST

वायू प्रदूषणामुळे भारतीय जनजीवनावर होणाऱ्या भयावह दुष्परिणामावर शिकागो, हार्वर्ड आणि येल विद्यापीठाने प्रकाश टाकत वेळीच उपाययोजना न केल्यास अनेकांना अकाली मृत्यूला कवटाळावे लागेल,

शिकागो : वायू प्रदूषणामुळे भारतीय जनजीवनावर होणाऱ्या भयावह दुष्परिणामावर शिकागो, हार्वर्ड आणि येल विद्यापीठाने प्रकाश टाकत वेळीच उपाययोजना न केल्यास अनेकांना अकाली मृत्यूला कवटाळावे लागेल, असा गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर भारताला सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या देशांच्या यादीत टाकले आहे. या विद्यापीठांनी सखोल अभ्यासाअंती काढलेल्या निष्कर्षानुसार वायू प्रदूषणामुळे भारतीय लोक तीन वर्षे आधीच मरण पावतात.‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली’च्या ताज्या अंकात अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. सुरक्षित मापदंडापेक्षाही अधिक प्रमाणात सूक्ष्म कण पदार्थांचे प्रदूषण असलेल्या भागात भारतातील ६६ कोटी लोकसंख्या राहते. मापदंडाचे पालन करून वायू प्रदूषण भारताने आटोक्यात राखल्यास भारतीयांचे आयुष्य आणखी तीन वर्षांनी वाढू शकते. एवढेच नाही तर २.१ अब्ज जीवन वर्षे वाचतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.ही मोठी किंमत...वायू प्रदूषणामुळे दोन अब्जाहून अधिक जीवन वर्षांचे नुकसान होणे म्हणजे वायू प्रदूषणामुळे मोजावी लागणारी मोठी किंमत आहे, असे मत हार्वर्ड केनेडी स्कूलच्या अ‍ॅव्हिडेन्स फॉर पॉलिसी डिझाईनच्या संचालक रोहिणी पांडे यांनी म्हटले आहे. भारत किफायतशीर मार्गाने ही स्थिती बदलू शकतो. या अहवालात येल विद्यापीठाचे निकोलस रेयान, हार्वर्डच्या जान्हवी नीलकेणी, अनिश सुगाथन आणि शिकागो विद्यापीठाचे अनंत सुदर्शन यांचे लेख आहेत. भारत सरकारने वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत. तथापि, आणखी उपाय करणे जरूरी आहे.(वृत्तसंस्था)४भारताने आर्थिक वृद्धीवर अधिक लक्ष द्यायला हवे; परंतु वृद्धीच्या पारंपरिक व्याख्येमुळे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांकडे दुर्लक्ष झाले. वायू प्रदूषण भारतीयांच्या अकाली मृत्यूचे कारण बनले असून आर्थिक वृद्धीही धीमी होत आहे. ४वायू प्रदूषणामुळे उत्पादन घटते, आजारपण वाढते. परिणामी आरोग्यावरील खर्चाचा बोजाही वाढत जातो, असे युनिव्हर्सिटी आॅफ शिकागोतील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटचे संचालक मायकल ग्रीनस्टोन यांनी म्हटले आहे.४जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरातील सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या २० शहरांपैकी भारतातील १३ शहरे असून यापैकी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. श्वसनाशी संबंधित आजारामुळे भारतात होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.