शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

वायू प्रदूषणामुळे भारतीयांचा अकाली मृत्यू

By admin | Updated: February 22, 2015 00:03 IST

वायू प्रदूषणामुळे भारतीय जनजीवनावर होणाऱ्या भयावह दुष्परिणामावर शिकागो, हार्वर्ड आणि येल विद्यापीठाने प्रकाश टाकत वेळीच उपाययोजना न केल्यास अनेकांना अकाली मृत्यूला कवटाळावे लागेल,

शिकागो : वायू प्रदूषणामुळे भारतीय जनजीवनावर होणाऱ्या भयावह दुष्परिणामावर शिकागो, हार्वर्ड आणि येल विद्यापीठाने प्रकाश टाकत वेळीच उपाययोजना न केल्यास अनेकांना अकाली मृत्यूला कवटाळावे लागेल, असा गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर भारताला सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या देशांच्या यादीत टाकले आहे. या विद्यापीठांनी सखोल अभ्यासाअंती काढलेल्या निष्कर्षानुसार वायू प्रदूषणामुळे भारतीय लोक तीन वर्षे आधीच मरण पावतात.‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली’च्या ताज्या अंकात अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. सुरक्षित मापदंडापेक्षाही अधिक प्रमाणात सूक्ष्म कण पदार्थांचे प्रदूषण असलेल्या भागात भारतातील ६६ कोटी लोकसंख्या राहते. मापदंडाचे पालन करून वायू प्रदूषण भारताने आटोक्यात राखल्यास भारतीयांचे आयुष्य आणखी तीन वर्षांनी वाढू शकते. एवढेच नाही तर २.१ अब्ज जीवन वर्षे वाचतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.ही मोठी किंमत...वायू प्रदूषणामुळे दोन अब्जाहून अधिक जीवन वर्षांचे नुकसान होणे म्हणजे वायू प्रदूषणामुळे मोजावी लागणारी मोठी किंमत आहे, असे मत हार्वर्ड केनेडी स्कूलच्या अ‍ॅव्हिडेन्स फॉर पॉलिसी डिझाईनच्या संचालक रोहिणी पांडे यांनी म्हटले आहे. भारत किफायतशीर मार्गाने ही स्थिती बदलू शकतो. या अहवालात येल विद्यापीठाचे निकोलस रेयान, हार्वर्डच्या जान्हवी नीलकेणी, अनिश सुगाथन आणि शिकागो विद्यापीठाचे अनंत सुदर्शन यांचे लेख आहेत. भारत सरकारने वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत. तथापि, आणखी उपाय करणे जरूरी आहे.(वृत्तसंस्था)४भारताने आर्थिक वृद्धीवर अधिक लक्ष द्यायला हवे; परंतु वृद्धीच्या पारंपरिक व्याख्येमुळे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांकडे दुर्लक्ष झाले. वायू प्रदूषण भारतीयांच्या अकाली मृत्यूचे कारण बनले असून आर्थिक वृद्धीही धीमी होत आहे. ४वायू प्रदूषणामुळे उत्पादन घटते, आजारपण वाढते. परिणामी आरोग्यावरील खर्चाचा बोजाही वाढत जातो, असे युनिव्हर्सिटी आॅफ शिकागोतील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटचे संचालक मायकल ग्रीनस्टोन यांनी म्हटले आहे.४जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरातील सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या २० शहरांपैकी भारतातील १३ शहरे असून यापैकी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. श्वसनाशी संबंधित आजारामुळे भारतात होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.