शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

दख्खन ज्वालामुखीने डायनोसॉर्सचा अंत

By admin | Updated: July 7, 2016 04:10 IST

सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी बाह्य अवकाशातील एक विशाल अशनी अथवा लघुग्रह (अ‍ॅस्ट्रॉईड) येऊन आदळल्याने झालेला विनाश हेच पृथ्वीवर त्यावेळी असलेली डायनोसॉरसह बव्हंशी सजीवसृष्टी

पॅरिस: सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी बाह्य अवकाशातील एक विशाल अशनी अथवा लघुग्रह (अ‍ॅस्ट्रॉईड) येऊन आदळल्याने झालेला विनाश हेच पृथ्वीवर त्यावेळी असलेली डायनोसॉरसह बव्हंशी सजीवसृष्टी नष्ट होण्याचे एकमेव कारण नव्हते. भूगर्भशास्त्रात ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व आज भारतात असलेल्या भूप्रदेशात झालेला ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक हेही त्याचे एक तेवढेच महत्वाचे कारण होते, असा दावा अमेरिकेतील वैज्ञानिकांनी नव्या संशोधनाच्या आधारे केला आहे.आजच्या मेक्सिकोमध्ये असलेल्या चिक्सुलब नावाच्या ठिकाणी झालेल्या अशनीच्या आघाताने डायनोसोर युगाचा अंत झाला, असे मानले जात होते. मात्र हे वैज्ञानिक म्हणतात की, अशनीचा आघात व ‘डेक्कन ट्रॅप्स’मध्ये झालेला ज्वालामुखीचा उद्रेक या कालमापनाच्या दृष्टीने काही शे वर्षांच्या अंतराने घडलेल्या दोन घटनांचा एकत्रित परिणाम डायनोसोरचे कर्दनकाळ ठरले. या दोन्ही घटनांमुळे वातावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर धूर, वाफ व धूळ पसरली की प्रदीर्घ काळ पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहोचणेही मुश्किल झाले. परिणामी या दोन्ही घटनांच्या अलीकडे-पलीकडे सुमारे एक हजार वर्षांचा तीव्र जागतिक हवामान बदलाचा कालखंड निर्माण झाला व त्याच्याशी जुळवून घेणे न जमल्याने डायनोसॉर विनष्ट झाले. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील तीन वैज्ञानिकांच्या चमुने हे नवे संशोघन केले असून त्यांचा त्यावरील शोधनिबंध ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. (वृत्तसंस्था)काय व कसे केले संशोधन?आज सदैव बर्फाच्छादित असलेल्या अंटार्क्टिक खंडावर लाखो वर्षांपूर्वी जलवनस्पतींची जंगले होती. या द्विपकल्पाच्या उत्तरेकडील टोकावरील त्रिभूज प्रदेशाशेजारी असलेल्या उथल पाण्याच्या किनारी भागात जिवाश्म रूपात सापडलेल्या २९ शिंपल्यांचा अभ्यास करून या वैज्ञानिकांनी ३५ लाख वर्षांच्या कालखंडतील तापमानाचा आलेख तयार केला. जिवाश्म रूपाने सापडलेले हे शिंपले ज्या काळात डायनोसॉरस विनष्ट झाले, साधारणपणे त्याच काळातील आहेत.तापमानाच्या या आलेखावरून वैज्ञानिकांना असे आढळले की, हजारो वर्षे सुरू राहिलेला ‘डेक्कन ट्रॅप्स’मधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर पृथ्वीवरील सागरांचे तापमान ७.८ अंश सेल्सियसने वाढले. त्यानंतर सुमारे दीड लाख वर्षांनी अशनीचा आघात झाला, तेव्हा पुन्हा एकदा सागरी तापमानात १.१ अंश सेल्सियसची वाढ झाली. या दोन्ही घटनांमुळे पृथ्वीच्या वातावरणात वाढ करणारे आज जे ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ म्हणून ओळखले जातात, त्या वायूंसह प्रचंड प्रमाणावर धूर, वाफ व धूळ वातावरणात पसरली. यामुळे ‘हवामान बदला’चा कालखंड सुरू झाला.काय आहे ‘डेक्कन ट्रॅप्स’? : ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश भारतीय उपखंडाच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात सुमारे दोन लाख चौ. किमी भागावर पसरलेला आहे. सह्याद्रीच्या रांगामधील महाबळेश्वर आणि त्या परिसरात दिसणारे संपूर्ण अखंड पाषाणाचे डोंगरही त्यातच मोडतात. ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकाने सुमारे १२,२७५ घनमैल एवढा लाव्हा भूगर्भातून बाहेर येऊन त्याचा ६,५०० फूटांचा थर जमिनीवर पसरला गेला. हा लाव्हा थंड झाल्यावर जो भूप्रदेश तयार झाला तो ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखला जातो.