शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

दख्खन ज्वालामुखीने डायनोसॉर्सचा अंत

By admin | Updated: July 7, 2016 04:10 IST

सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी बाह्य अवकाशातील एक विशाल अशनी अथवा लघुग्रह (अ‍ॅस्ट्रॉईड) येऊन आदळल्याने झालेला विनाश हेच पृथ्वीवर त्यावेळी असलेली डायनोसॉरसह बव्हंशी सजीवसृष्टी

पॅरिस: सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी बाह्य अवकाशातील एक विशाल अशनी अथवा लघुग्रह (अ‍ॅस्ट्रॉईड) येऊन आदळल्याने झालेला विनाश हेच पृथ्वीवर त्यावेळी असलेली डायनोसॉरसह बव्हंशी सजीवसृष्टी नष्ट होण्याचे एकमेव कारण नव्हते. भूगर्भशास्त्रात ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व आज भारतात असलेल्या भूप्रदेशात झालेला ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक हेही त्याचे एक तेवढेच महत्वाचे कारण होते, असा दावा अमेरिकेतील वैज्ञानिकांनी नव्या संशोधनाच्या आधारे केला आहे.आजच्या मेक्सिकोमध्ये असलेल्या चिक्सुलब नावाच्या ठिकाणी झालेल्या अशनीच्या आघाताने डायनोसोर युगाचा अंत झाला, असे मानले जात होते. मात्र हे वैज्ञानिक म्हणतात की, अशनीचा आघात व ‘डेक्कन ट्रॅप्स’मध्ये झालेला ज्वालामुखीचा उद्रेक या कालमापनाच्या दृष्टीने काही शे वर्षांच्या अंतराने घडलेल्या दोन घटनांचा एकत्रित परिणाम डायनोसोरचे कर्दनकाळ ठरले. या दोन्ही घटनांमुळे वातावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर धूर, वाफ व धूळ पसरली की प्रदीर्घ काळ पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहोचणेही मुश्किल झाले. परिणामी या दोन्ही घटनांच्या अलीकडे-पलीकडे सुमारे एक हजार वर्षांचा तीव्र जागतिक हवामान बदलाचा कालखंड निर्माण झाला व त्याच्याशी जुळवून घेणे न जमल्याने डायनोसॉर विनष्ट झाले. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील तीन वैज्ञानिकांच्या चमुने हे नवे संशोघन केले असून त्यांचा त्यावरील शोधनिबंध ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. (वृत्तसंस्था)काय व कसे केले संशोधन?आज सदैव बर्फाच्छादित असलेल्या अंटार्क्टिक खंडावर लाखो वर्षांपूर्वी जलवनस्पतींची जंगले होती. या द्विपकल्पाच्या उत्तरेकडील टोकावरील त्रिभूज प्रदेशाशेजारी असलेल्या उथल पाण्याच्या किनारी भागात जिवाश्म रूपात सापडलेल्या २९ शिंपल्यांचा अभ्यास करून या वैज्ञानिकांनी ३५ लाख वर्षांच्या कालखंडतील तापमानाचा आलेख तयार केला. जिवाश्म रूपाने सापडलेले हे शिंपले ज्या काळात डायनोसॉरस विनष्ट झाले, साधारणपणे त्याच काळातील आहेत.तापमानाच्या या आलेखावरून वैज्ञानिकांना असे आढळले की, हजारो वर्षे सुरू राहिलेला ‘डेक्कन ट्रॅप्स’मधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर पृथ्वीवरील सागरांचे तापमान ७.८ अंश सेल्सियसने वाढले. त्यानंतर सुमारे दीड लाख वर्षांनी अशनीचा आघात झाला, तेव्हा पुन्हा एकदा सागरी तापमानात १.१ अंश सेल्सियसची वाढ झाली. या दोन्ही घटनांमुळे पृथ्वीच्या वातावरणात वाढ करणारे आज जे ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ म्हणून ओळखले जातात, त्या वायूंसह प्रचंड प्रमाणावर धूर, वाफ व धूळ वातावरणात पसरली. यामुळे ‘हवामान बदला’चा कालखंड सुरू झाला.काय आहे ‘डेक्कन ट्रॅप्स’? : ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश भारतीय उपखंडाच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात सुमारे दोन लाख चौ. किमी भागावर पसरलेला आहे. सह्याद्रीच्या रांगामधील महाबळेश्वर आणि त्या परिसरात दिसणारे संपूर्ण अखंड पाषाणाचे डोंगरही त्यातच मोडतात. ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकाने सुमारे १२,२७५ घनमैल एवढा लाव्हा भूगर्भातून बाहेर येऊन त्याचा ६,५०० फूटांचा थर जमिनीवर पसरला गेला. हा लाव्हा थंड झाल्यावर जो भूप्रदेश तयार झाला तो ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखला जातो.