शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

चिनी वस्तुंवरील बहिष्कारामुळे बीजिंग संतप्त

By admin | Updated: October 30, 2016 02:19 IST

भारतात काही संघटना थेट आणि सोशल मीडियावरून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा जोरदार प्रचार करीत असून, त्यामुळे काही व्यापारी आणि ग्राहकांनी त्यावर बहिष्कारही

बीजिंग : भारतात काही संघटना थेट आणि सोशल मीडियावरून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा जोरदार प्रचार करीत असून, त्यामुळे काही व्यापारी आणि ग्राहकांनी त्यावर बहिष्कारही घातला आहे. त्याचा चिनी वस्तुंच्या बाजारपेठेवर फार मोठा परिणाम झाला नसला तरी या प्रकाराची दखल घेत, भारताने आमच्या वस्तुंवर बहिष्कार घातल्यास दोन्ही देशांतील संबंध बिघडतील, असा इशारा चीनने दिला आहे.चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घातल्यास भारतामध्ये चीनकडून होत असलेल्या गुंतवणुकीवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. ते टाळण्यासाठी दोन्ही देशांत सहकार्य गरजेचे आहे. मात्र दोन्ही देशांतील लोकांकडून तसा समजुतदारपणा पाहायला मिळत नाही आहे, असे चीनचे भारतातील दुतावास शी लियान म्हणाले. दक्षिण आशियात भारत हा चीनचा सर्वात मोठा भागीदार आहे. तसेच जगातील वस्तू निर्यात करणारा सर्वात मोठा नववा देश आहे. भारतातील अनेक व्यापाऱ्यांनी चीनमध्ये बनवलेल्या फटाक्यांसह अनेक वस्तुंवर बहिष्कार टाकला आहे. पाकिस्तानला चीन मदत करीत असल्याच्या आरोपामुळे त्यात भर पडली आहे. चीन-पाकिस्तान यांच्यातील जवळिकीमुळेच भारतात चिनी वस्तूंबाबत नकारात्मक प्रचार होतो आहे. मात्र हा बहिष्काराला कोणताही कायदेशीर आधार नाही. दिवाळीशी संबंधित वस्तुंवरच बहिष्कार मर्यादित नसून, अन्य वस्तुंच्या खरेदीवरही परिणाम होत असल्याचे असे शी लियान यांनी बोलून दाखवले.भारत व चीनमध्ये २0१५ साली द्विपक्षीय व्यापार ७१.६ अब्ज डॉलरच्या घरात होता. तो आता 50 अब्ज डॉलर इतका खाली आला आहे. चीन फक्त भारतात २ टक्केच निर्यात करत असल्याचेही शी लियान यांनी सांगितले.आयात थांबवायला हवीलोकांनी त्यावर बहिष्कार घालावा, असे आवाहन काही संघटना व राजकीय पक्ष करताना दिसतात. पण जोपर्यंत त्यांच्या आयातीवर बंदी येत नाही, तोपर्यंत बहिष्काराने प्रश्न सुटणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे चायनीज वस्तुंवर बंदी घातली तरच त्याला काही अर्थ आहे, असे व्यापाऱ्यांनी बोलून दाखवले.स्वस्त आणि मस्त : दिवाळीच्या काळात विविध प्रकारच्या फटाक्यांपासून पणत्या, आकाश कंदील, दिव्यांच्या माळा भारतीय बाजारात येतात. भारतीय वस्तुंच्या तुलनेत या चिनी वस्तू खूपच स्वस्त असल्याने त्या घेण्याकडे ग्राहकांचा ओढा असतो. काही चिनी फटाक्यांवर भारतात १९९२ सालपासून बंदी असूनही, त्यांचे स्मगलिंग होत असल्याचेही आढळून आले आहे. गणेशोत्सवाच्या काळातही आरास व सजावट करण्यासाठी लागणाऱ्या वस्तुंपासून गणेशमूर्तीपर्यंत सारेच चायनीज येत असल्याचे दिसत आहे.