शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

महामार्गावर मधाच्या पोळ्यांची विक्री बनली तरुणांंचा रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:31 IST

रमेश कदम आखाडा बाळापूर : नदी, नाल्याच्या काठाकाठाने निसर्गाचा आस्वाद घेत थकेपर्यंत भटकंती करत दिवस घालणाऱ्या तरुणाला आपल्या आवडीपायी ...

रमेश कदम

आखाडा बाळापूर : नदी, नाल्याच्या काठाकाठाने निसर्गाचा आस्वाद घेत थकेपर्यंत भटकंती करत दिवस घालणाऱ्या तरुणाला आपल्या आवडीपायी रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. नदीकाठच्या झाडांवरील मधमाश्यांच्या पोळ्यांची विक्री करून रोजगाराची नवी पायवाट त्याने शोधली आहे. भटकंतीची आवड आणि रोजंदारीची किंमत या दोन्ही गोष्टी त्याला मिळत आहेत. नांदेड-हिंगोली रोडवरील त्याच्या हातातील मधमाश्यांच्या 'पोळ्यांचे झुंबर' प्रवास करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करत आहे.

नांदेड-हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर आखाडा बाळापूर ते कुर्तडी पाटी यादरम्यान कुठेतरी एक तरुण मधमाश्यांच्या पोळ्यांचे झुंबर घेऊन रस्त्यावर उभा ठाकलेला दिसतो. सद्य:स्थितीत शुद्ध, गावरान वस्तू मिळणे दुर्मीळ झाले आहे. त्यात मधाचंं पोळं आणि मधाचा रस शुद्ध स्वरूपात मिळणे, हे तर अवघडंच. कारण, व्यापारपेठेत मिळणाऱ्या मधाच्या बाटल्यांमध्ये शुद्ध स्वरूपात मध मिळत नाही. या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या तरुणाच्या मधमाश्यांच्या पोळ्यांचे झुंबर आकर्षित करते. प्रवासी थांबतात आणि त्यांच्याकडून मधाच्या पोळ्यांची खरेदी करतात. कुणी मधाचे पोळे जशास तसे खरेदी करून घेऊन जातो, तर काही जण त्यातला मध काढून घेऊन जातात. या रस्त्यावरील हा मध विकणारा तरुण प्रवाशांसाठी सवयीचा झालाय आणि आकर्षणाचा केंद्रही झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील कुंभारवाडी येथील नरेंद्र रामजी बुरकुले हा तरुण या रस्त्यावर मधमाश्यांच्या पोळीविक्रीचा व्यवसाय करतो. प्रवाशांना शुद्ध स्वरूपातला गोड मध १०० ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देतो. मधाचे पोळं जमा करायचे आणि रस्त्यावर उभे ठाकले की, काही क्षणांतच त्याची विक्री होत असल्याने त्याच्या रोजगाराची नवी पायवाट त्याला सापडली आहे. आता तो दररोज कयाधू नदीच्या काठाने फिरतो. परिसरातील नाल्यांच्या काठावरील विविध झाडांवरील मधमाश्यांचे पोळे गोळा करतो आणि रस्त्यावर उभे राहून त्याची विक्री करतो.

मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी माशा मरू नयेत व निसर्गचक्र सुरळीत व्हावे, याचीही काळजी नरेंद्र घेत असतो. मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी धुराचा वापर केला जातो. त्यात नारळाच्या शेंड्या, वाळलेली पाने, कापूस, कडुनिंब असे पर्यावरणपूरक साहित्य जाळून मधमाश्यांना पोळ्यापासून दूर केले जाते. या धुराचा मधमाश्यांना त्रास होत नाही. पोळे काढतानाही अगदी हळुवारपणे काढले जाते. या माश्या जिवंत राहिल्याने इतरत्र जाऊन नवीन पोळे तयार करतात. एकंदरीत, निसर्गचक्र सुरळीत ठेवून आपला रोजगार शोधणाऱ्या या तरुणाला निसर्गातूनच सापडलेला हा "स्टार्टअप" इतरांनाही प्रेरणा देणारा आहे.