शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक भूक भागेना!

By admin | Updated: December 22, 2014 15:05 IST

एकेकाळी /राज्यभरात लौकिकास पात्र ठरलेली हिंगोलीची नाट्यचळवळ नाट्यगृहाअभावी थंडावली आहे.

भास्कर लांडे ल्ल /हिंगोली एकेकाळी /राज्यभरात लौकिकास पात्र ठरलेली हिंगोलीची नाट्यचळवळ नाट्यगृहाअभावी थंडावली आहे. तरीही १९९५ पासून २0१0 पर्यंत तीन-चारवेळा बेंडे एकांकिका स्पध्रेने चळवळीला जगवण्याचा प्रयत्न केला; परंतु अभिनय जरी उघड्यावर करता येत असला तरी तांत्रिक बाबींशिवाय नाटक होवू शकत नाही. त्यातून बेंडे एकांकिकेचा उपक्रम बंद पडला. हळूहळू सांस्कृतिक चळवळीला अवकळा आल्याने हिंगोलीतील सांस्कृतिक चळवळथंडावली आहे. हिंगोलीत १९६८ मध्ये सुरू झालेल्या कै. o्रीपाद नृसिंह बेंडे एकांकिकेने चार दशके गाजवली. त्याने महाराष्ट्रात सर्वदूर लौकिक मिळवला. त्यातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. जागेअभावी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ताटवे लावून ही स्पर्धा घ्यावी लागली. नंतर महावीर भवनचा आधार मिळाला; परंतु इंदिरा खुले नाट्यगृहाचा कधीच वापर झाला नाही. आर्केस्ट्रा, संगीत रजनी आदी व्यावसायिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाचा वापर झाला. बरेच छोटेखानी कार्यक्रमही झाले. मोठे सभागृह नसण्यापेक्षा या खुल्या नाट्यगृहाच्या असण्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना चिंता नव्हती. लहानसहान संगीतसभा, बालक-महिलांचे कार्यक्रमही झाले. त्यातून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. मात्र हिंगोलीचे वैभव असणार्‍या बेंडे एकांकिकेस हे नाट्यगृह अपुरे पडू लागले. लहान आकारामुळे अपूर्ण जागा, आसन व्यवस्थेचा अभाव, लहान स्टेज, चेंजिंग रूमही नव्हत्या. त्यातच गृहास छत नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न होता. महिला आणि लहान मुलांची चिंता होती. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे जागा अपुरी पडत होती. त्यातून नाट्यगृह उभारणीचा विषय पुढे आला. कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. काम सुरू झाले. ५0 टक्के काम पूर्णही झाले. अचानक ते बंद पडले. त्याला आज सात वर्षे उलटले. नाट्यगृहासोबत नाट्यचळवळीस अवकळा आली नसून सांस्कृतिक कार्यक्रमांना घरघर लागली. मुळात नाट्यगृह नियोजनपूर्वक बांधलेच नव्हते. स्टेजची अर्धवट उभारणी झाली होत. स्टेज उभारणीस उशिराने सुरूवात करण्यात आली होती. पिलरही टाकण्यात आले होते. तेव्हापासून काम बंद पडले. त्याच्या निधीची विल्हेवाट लावण्यात आली. नंतर कोणी विषयही काढला नाही. अर्धवट नाट्यगृहाचा उपयोग होणारच नव्हता. तिथे योग्य प्रकाशयोजना, नेपथ्य, पडदा, स्टेज उभारणी करता येत नाही म्हणून व्यावसायिक नाटकांचा विषय संपला. दुसरीकडे संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठाणे कार्यक्रमांसाठी इच्छुक असले तरी उपलब्ध जागा नाही. मिळलेल्या जागेचे भाडेही परवडत नाही. नाट्यगृहाच्या नव्याने बांधकामास सुरूवात करावी, असे कोणाला वाटत नाही. लोकप्रतिनिधींना सांस्कृतिक चळवळीशीही काही देणोघेणे नाही. आजही गावागावात नाटक पाहणारे असले तरी त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. नव्या पिढीच्या जन्मापूर्वीच सांस्कृतिक चळवळीने शेवटची घटका मोजली. उथळपणा वाढून नवतंत्रज्ञानाच्या ते अधीन झाले. मुळात सांस्कृतिक संस्काराअभावी त्यांच्यात प्रगल्भता आली नाही.

-------------

हिंगोलीतील रामलीला मैदानालगत इंदिरा खुले नाट्यगृहाच्या जागी नव्याने नाट्यगृह उभारणी सुरू केली होती. अचानक ते बांधकाम बंद पडले. त्याला ७ वर्ष लोटले तरी आजही ते अर्धवट अवस्थेत आहे.

■ अगदी स्वस्तात जरी हे नाट्यगृह मिळत असले तरी फायदा नव्हताच. नाईलाजाने बेंडे एकांकिकेसाठी खाजगी सभागृह घेण्याकरिता पुष्कळ पैसे मोजावे लागायचे. संपूर्ण एकांकिकेच्या खर्चाएवढेच जागेचे भाडे लागत होते. तेव्हा खुले नाट्यगृह असूनही त्याचा फायदा होत नसल्याचा विचार आला. खर्चाअभावी ११९५ ला एकांकिका बंद पडली. पुढे ११९८ ला कशीतरी सुरू केलेली एकांकिका पुन्हा २00८ मध्ये गुंडाळावी लागली.

■ नाट्यगृह उभारणीच्या चळवळीसाठी कलाकार कमी पडले. रसिकांचा आवाजही उठत नाही. त्यातच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जन्मत: कलेचे गुण असले तरी त्याच्या सुप्त गुणांना वाव नसल्याची प्रतिक्रिया नाट्यकलावंत सुनील पाटील यांनी दिली.