शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक भूक भागेना!

By admin | Updated: December 22, 2014 15:05 IST

एकेकाळी /राज्यभरात लौकिकास पात्र ठरलेली हिंगोलीची नाट्यचळवळ नाट्यगृहाअभावी थंडावली आहे.

भास्कर लांडे ल्ल /हिंगोली एकेकाळी /राज्यभरात लौकिकास पात्र ठरलेली हिंगोलीची नाट्यचळवळ नाट्यगृहाअभावी थंडावली आहे. तरीही १९९५ पासून २0१0 पर्यंत तीन-चारवेळा बेंडे एकांकिका स्पध्रेने चळवळीला जगवण्याचा प्रयत्न केला; परंतु अभिनय जरी उघड्यावर करता येत असला तरी तांत्रिक बाबींशिवाय नाटक होवू शकत नाही. त्यातून बेंडे एकांकिकेचा उपक्रम बंद पडला. हळूहळू सांस्कृतिक चळवळीला अवकळा आल्याने हिंगोलीतील सांस्कृतिक चळवळथंडावली आहे. हिंगोलीत १९६८ मध्ये सुरू झालेल्या कै. o्रीपाद नृसिंह बेंडे एकांकिकेने चार दशके गाजवली. त्याने महाराष्ट्रात सर्वदूर लौकिक मिळवला. त्यातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. जागेअभावी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ताटवे लावून ही स्पर्धा घ्यावी लागली. नंतर महावीर भवनचा आधार मिळाला; परंतु इंदिरा खुले नाट्यगृहाचा कधीच वापर झाला नाही. आर्केस्ट्रा, संगीत रजनी आदी व्यावसायिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाचा वापर झाला. बरेच छोटेखानी कार्यक्रमही झाले. मोठे सभागृह नसण्यापेक्षा या खुल्या नाट्यगृहाच्या असण्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना चिंता नव्हती. लहानसहान संगीतसभा, बालक-महिलांचे कार्यक्रमही झाले. त्यातून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. मात्र हिंगोलीचे वैभव असणार्‍या बेंडे एकांकिकेस हे नाट्यगृह अपुरे पडू लागले. लहान आकारामुळे अपूर्ण जागा, आसन व्यवस्थेचा अभाव, लहान स्टेज, चेंजिंग रूमही नव्हत्या. त्यातच गृहास छत नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न होता. महिला आणि लहान मुलांची चिंता होती. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे जागा अपुरी पडत होती. त्यातून नाट्यगृह उभारणीचा विषय पुढे आला. कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. काम सुरू झाले. ५0 टक्के काम पूर्णही झाले. अचानक ते बंद पडले. त्याला आज सात वर्षे उलटले. नाट्यगृहासोबत नाट्यचळवळीस अवकळा आली नसून सांस्कृतिक कार्यक्रमांना घरघर लागली. मुळात नाट्यगृह नियोजनपूर्वक बांधलेच नव्हते. स्टेजची अर्धवट उभारणी झाली होत. स्टेज उभारणीस उशिराने सुरूवात करण्यात आली होती. पिलरही टाकण्यात आले होते. तेव्हापासून काम बंद पडले. त्याच्या निधीची विल्हेवाट लावण्यात आली. नंतर कोणी विषयही काढला नाही. अर्धवट नाट्यगृहाचा उपयोग होणारच नव्हता. तिथे योग्य प्रकाशयोजना, नेपथ्य, पडदा, स्टेज उभारणी करता येत नाही म्हणून व्यावसायिक नाटकांचा विषय संपला. दुसरीकडे संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठाणे कार्यक्रमांसाठी इच्छुक असले तरी उपलब्ध जागा नाही. मिळलेल्या जागेचे भाडेही परवडत नाही. नाट्यगृहाच्या नव्याने बांधकामास सुरूवात करावी, असे कोणाला वाटत नाही. लोकप्रतिनिधींना सांस्कृतिक चळवळीशीही काही देणोघेणे नाही. आजही गावागावात नाटक पाहणारे असले तरी त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. नव्या पिढीच्या जन्मापूर्वीच सांस्कृतिक चळवळीने शेवटची घटका मोजली. उथळपणा वाढून नवतंत्रज्ञानाच्या ते अधीन झाले. मुळात सांस्कृतिक संस्काराअभावी त्यांच्यात प्रगल्भता आली नाही.

-------------

हिंगोलीतील रामलीला मैदानालगत इंदिरा खुले नाट्यगृहाच्या जागी नव्याने नाट्यगृह उभारणी सुरू केली होती. अचानक ते बांधकाम बंद पडले. त्याला ७ वर्ष लोटले तरी आजही ते अर्धवट अवस्थेत आहे.

■ अगदी स्वस्तात जरी हे नाट्यगृह मिळत असले तरी फायदा नव्हताच. नाईलाजाने बेंडे एकांकिकेसाठी खाजगी सभागृह घेण्याकरिता पुष्कळ पैसे मोजावे लागायचे. संपूर्ण एकांकिकेच्या खर्चाएवढेच जागेचे भाडे लागत होते. तेव्हा खुले नाट्यगृह असूनही त्याचा फायदा होत नसल्याचा विचार आला. खर्चाअभावी ११९५ ला एकांकिका बंद पडली. पुढे ११९८ ला कशीतरी सुरू केलेली एकांकिका पुन्हा २00८ मध्ये गुंडाळावी लागली.

■ नाट्यगृह उभारणीच्या चळवळीसाठी कलाकार कमी पडले. रसिकांचा आवाजही उठत नाही. त्यातच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जन्मत: कलेचे गुण असले तरी त्याच्या सुप्त गुणांना वाव नसल्याची प्रतिक्रिया नाट्यकलावंत सुनील पाटील यांनी दिली.