शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक भूक भागेना!

By admin | Updated: December 22, 2014 15:05 IST

एकेकाळी /राज्यभरात लौकिकास पात्र ठरलेली हिंगोलीची नाट्यचळवळ नाट्यगृहाअभावी थंडावली आहे.

भास्कर लांडे ल्ल /हिंगोली एकेकाळी /राज्यभरात लौकिकास पात्र ठरलेली हिंगोलीची नाट्यचळवळ नाट्यगृहाअभावी थंडावली आहे. तरीही १९९५ पासून २0१0 पर्यंत तीन-चारवेळा बेंडे एकांकिका स्पध्रेने चळवळीला जगवण्याचा प्रयत्न केला; परंतु अभिनय जरी उघड्यावर करता येत असला तरी तांत्रिक बाबींशिवाय नाटक होवू शकत नाही. त्यातून बेंडे एकांकिकेचा उपक्रम बंद पडला. हळूहळू सांस्कृतिक चळवळीला अवकळा आल्याने हिंगोलीतील सांस्कृतिक चळवळथंडावली आहे. हिंगोलीत १९६८ मध्ये सुरू झालेल्या कै. o्रीपाद नृसिंह बेंडे एकांकिकेने चार दशके गाजवली. त्याने महाराष्ट्रात सर्वदूर लौकिक मिळवला. त्यातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. जागेअभावी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ताटवे लावून ही स्पर्धा घ्यावी लागली. नंतर महावीर भवनचा आधार मिळाला; परंतु इंदिरा खुले नाट्यगृहाचा कधीच वापर झाला नाही. आर्केस्ट्रा, संगीत रजनी आदी व्यावसायिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाचा वापर झाला. बरेच छोटेखानी कार्यक्रमही झाले. मोठे सभागृह नसण्यापेक्षा या खुल्या नाट्यगृहाच्या असण्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना चिंता नव्हती. लहानसहान संगीतसभा, बालक-महिलांचे कार्यक्रमही झाले. त्यातून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. मात्र हिंगोलीचे वैभव असणार्‍या बेंडे एकांकिकेस हे नाट्यगृह अपुरे पडू लागले. लहान आकारामुळे अपूर्ण जागा, आसन व्यवस्थेचा अभाव, लहान स्टेज, चेंजिंग रूमही नव्हत्या. त्यातच गृहास छत नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न होता. महिला आणि लहान मुलांची चिंता होती. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे जागा अपुरी पडत होती. त्यातून नाट्यगृह उभारणीचा विषय पुढे आला. कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. काम सुरू झाले. ५0 टक्के काम पूर्णही झाले. अचानक ते बंद पडले. त्याला आज सात वर्षे उलटले. नाट्यगृहासोबत नाट्यचळवळीस अवकळा आली नसून सांस्कृतिक कार्यक्रमांना घरघर लागली. मुळात नाट्यगृह नियोजनपूर्वक बांधलेच नव्हते. स्टेजची अर्धवट उभारणी झाली होत. स्टेज उभारणीस उशिराने सुरूवात करण्यात आली होती. पिलरही टाकण्यात आले होते. तेव्हापासून काम बंद पडले. त्याच्या निधीची विल्हेवाट लावण्यात आली. नंतर कोणी विषयही काढला नाही. अर्धवट नाट्यगृहाचा उपयोग होणारच नव्हता. तिथे योग्य प्रकाशयोजना, नेपथ्य, पडदा, स्टेज उभारणी करता येत नाही म्हणून व्यावसायिक नाटकांचा विषय संपला. दुसरीकडे संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठाणे कार्यक्रमांसाठी इच्छुक असले तरी उपलब्ध जागा नाही. मिळलेल्या जागेचे भाडेही परवडत नाही. नाट्यगृहाच्या नव्याने बांधकामास सुरूवात करावी, असे कोणाला वाटत नाही. लोकप्रतिनिधींना सांस्कृतिक चळवळीशीही काही देणोघेणे नाही. आजही गावागावात नाटक पाहणारे असले तरी त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. नव्या पिढीच्या जन्मापूर्वीच सांस्कृतिक चळवळीने शेवटची घटका मोजली. उथळपणा वाढून नवतंत्रज्ञानाच्या ते अधीन झाले. मुळात सांस्कृतिक संस्काराअभावी त्यांच्यात प्रगल्भता आली नाही.

-------------

हिंगोलीतील रामलीला मैदानालगत इंदिरा खुले नाट्यगृहाच्या जागी नव्याने नाट्यगृह उभारणी सुरू केली होती. अचानक ते बांधकाम बंद पडले. त्याला ७ वर्ष लोटले तरी आजही ते अर्धवट अवस्थेत आहे.

■ अगदी स्वस्तात जरी हे नाट्यगृह मिळत असले तरी फायदा नव्हताच. नाईलाजाने बेंडे एकांकिकेसाठी खाजगी सभागृह घेण्याकरिता पुष्कळ पैसे मोजावे लागायचे. संपूर्ण एकांकिकेच्या खर्चाएवढेच जागेचे भाडे लागत होते. तेव्हा खुले नाट्यगृह असूनही त्याचा फायदा होत नसल्याचा विचार आला. खर्चाअभावी ११९५ ला एकांकिका बंद पडली. पुढे ११९८ ला कशीतरी सुरू केलेली एकांकिका पुन्हा २00८ मध्ये गुंडाळावी लागली.

■ नाट्यगृह उभारणीच्या चळवळीसाठी कलाकार कमी पडले. रसिकांचा आवाजही उठत नाही. त्यातच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जन्मत: कलेचे गुण असले तरी त्याच्या सुप्त गुणांना वाव नसल्याची प्रतिक्रिया नाट्यकलावंत सुनील पाटील यांनी दिली.