शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक भूक भागेना!

By admin | Updated: December 22, 2014 15:05 IST

एकेकाळी /राज्यभरात लौकिकास पात्र ठरलेली हिंगोलीची नाट्यचळवळ नाट्यगृहाअभावी थंडावली आहे.

भास्कर लांडे ल्ल /हिंगोली एकेकाळी /राज्यभरात लौकिकास पात्र ठरलेली हिंगोलीची नाट्यचळवळ नाट्यगृहाअभावी थंडावली आहे. तरीही १९९५ पासून २0१0 पर्यंत तीन-चारवेळा बेंडे एकांकिका स्पध्रेने चळवळीला जगवण्याचा प्रयत्न केला; परंतु अभिनय जरी उघड्यावर करता येत असला तरी तांत्रिक बाबींशिवाय नाटक होवू शकत नाही. त्यातून बेंडे एकांकिकेचा उपक्रम बंद पडला. हळूहळू सांस्कृतिक चळवळीला अवकळा आल्याने हिंगोलीतील सांस्कृतिक चळवळथंडावली आहे. हिंगोलीत १९६८ मध्ये सुरू झालेल्या कै. o्रीपाद नृसिंह बेंडे एकांकिकेने चार दशके गाजवली. त्याने महाराष्ट्रात सर्वदूर लौकिक मिळवला. त्यातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. जागेअभावी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ताटवे लावून ही स्पर्धा घ्यावी लागली. नंतर महावीर भवनचा आधार मिळाला; परंतु इंदिरा खुले नाट्यगृहाचा कधीच वापर झाला नाही. आर्केस्ट्रा, संगीत रजनी आदी व्यावसायिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाचा वापर झाला. बरेच छोटेखानी कार्यक्रमही झाले. मोठे सभागृह नसण्यापेक्षा या खुल्या नाट्यगृहाच्या असण्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना चिंता नव्हती. लहानसहान संगीतसभा, बालक-महिलांचे कार्यक्रमही झाले. त्यातून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. मात्र हिंगोलीचे वैभव असणार्‍या बेंडे एकांकिकेस हे नाट्यगृह अपुरे पडू लागले. लहान आकारामुळे अपूर्ण जागा, आसन व्यवस्थेचा अभाव, लहान स्टेज, चेंजिंग रूमही नव्हत्या. त्यातच गृहास छत नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न होता. महिला आणि लहान मुलांची चिंता होती. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे जागा अपुरी पडत होती. त्यातून नाट्यगृह उभारणीचा विषय पुढे आला. कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. काम सुरू झाले. ५0 टक्के काम पूर्णही झाले. अचानक ते बंद पडले. त्याला आज सात वर्षे उलटले. नाट्यगृहासोबत नाट्यचळवळीस अवकळा आली नसून सांस्कृतिक कार्यक्रमांना घरघर लागली. मुळात नाट्यगृह नियोजनपूर्वक बांधलेच नव्हते. स्टेजची अर्धवट उभारणी झाली होत. स्टेज उभारणीस उशिराने सुरूवात करण्यात आली होती. पिलरही टाकण्यात आले होते. तेव्हापासून काम बंद पडले. त्याच्या निधीची विल्हेवाट लावण्यात आली. नंतर कोणी विषयही काढला नाही. अर्धवट नाट्यगृहाचा उपयोग होणारच नव्हता. तिथे योग्य प्रकाशयोजना, नेपथ्य, पडदा, स्टेज उभारणी करता येत नाही म्हणून व्यावसायिक नाटकांचा विषय संपला. दुसरीकडे संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठाणे कार्यक्रमांसाठी इच्छुक असले तरी उपलब्ध जागा नाही. मिळलेल्या जागेचे भाडेही परवडत नाही. नाट्यगृहाच्या नव्याने बांधकामास सुरूवात करावी, असे कोणाला वाटत नाही. लोकप्रतिनिधींना सांस्कृतिक चळवळीशीही काही देणोघेणे नाही. आजही गावागावात नाटक पाहणारे असले तरी त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. नव्या पिढीच्या जन्मापूर्वीच सांस्कृतिक चळवळीने शेवटची घटका मोजली. उथळपणा वाढून नवतंत्रज्ञानाच्या ते अधीन झाले. मुळात सांस्कृतिक संस्काराअभावी त्यांच्यात प्रगल्भता आली नाही.

-------------

हिंगोलीतील रामलीला मैदानालगत इंदिरा खुले नाट्यगृहाच्या जागी नव्याने नाट्यगृह उभारणी सुरू केली होती. अचानक ते बांधकाम बंद पडले. त्याला ७ वर्ष लोटले तरी आजही ते अर्धवट अवस्थेत आहे.

■ अगदी स्वस्तात जरी हे नाट्यगृह मिळत असले तरी फायदा नव्हताच. नाईलाजाने बेंडे एकांकिकेसाठी खाजगी सभागृह घेण्याकरिता पुष्कळ पैसे मोजावे लागायचे. संपूर्ण एकांकिकेच्या खर्चाएवढेच जागेचे भाडे लागत होते. तेव्हा खुले नाट्यगृह असूनही त्याचा फायदा होत नसल्याचा विचार आला. खर्चाअभावी ११९५ ला एकांकिका बंद पडली. पुढे ११९८ ला कशीतरी सुरू केलेली एकांकिका पुन्हा २00८ मध्ये गुंडाळावी लागली.

■ नाट्यगृह उभारणीच्या चळवळीसाठी कलाकार कमी पडले. रसिकांचा आवाजही उठत नाही. त्यातच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जन्मत: कलेचे गुण असले तरी त्याच्या सुप्त गुणांना वाव नसल्याची प्रतिक्रिया नाट्यकलावंत सुनील पाटील यांनी दिली.