शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वार्धक्याच्या खुणा मिटवण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 17:08 IST

वास्तवातल्या वयापेक्षा तुम्ही नक्कीच दिसाल तरुण..

ठळक मुद्देहवा, पाणी आणि अन्नातील दुषित घटक आपल्या आरोग्याची आणि त्यातही आपल्या त्वचेची वाट लावत असतात. त्यापासून आपण वाचायला हवं.थोड्या पाण्यात लिंबू पिळून त्यानं आपली त्वचा स्वच्छ केल्यास अनेक दुषित घटक त्वचेपासून मुक्त होतात आणि त्वचेला टवटवी येते.आपल्या शरीरात हेल्दी फॅट्स जाताहेत की नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी.आपली त्वचाही टेन्शनमुळे खराब होते. म्हातारी होते. त्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे टेन्शनफ्री जगण्याकडे लक्ष द्या.

- मयूर पठाडेम्हतारं व्हायला, म्हातारपणाची लक्षण चेहºयावर, शरीरावर दिसायला लागली की सारेच जण अस्वस्थ होतात. ही लक्षणंं लपवण्यासाठी मग तयांची धडपड सुरू होते. काही जण हे वार्धक्य लपवण्यात यशस्वी होतातही, पण ते वार्धक्य फक्त पडद्याआड आपण लपवलेलं असतं, त्याचं खरं स्वरुप फक्त आपल्यालाच माहीत असतं.वार्धक्य लपवण्याचा हा आटोकाट प्रयत्न वयाच्या एका टप्प्यानंतर किंवा खूप उशिरा सुरू होतो. वार्धक्य प्रत्येकाला अटळ आहे, हे निश्चित, पण ते आपण दूर निश्चितच ढकलू शकतो. आपण ज्या वयाचे आहोत, त्यापेक्षा तरुण खात्रीनं दिसू शकतो. त्यासाठी काही गोष्टी मात्र कराव्या लागतील.वार्धक्याला पळवण्यासाठी काय कराल?१- कुठल्या ना कुठल्या कारणानं बाह्य गोष्टींशी आपला संपर्क येत असतो. कधी हा संपर्क हवेमुळे असेल, कधी पाण्यामुळे, तर कधी अन्नामुळे. पण त्यात असलेले दुषित घटक आपल्या आरोग्याची आणि त्यातही आपल्या त्वचेची वाट लावत असतात. त्यापासून आपण वाचायला हवं आणि दुषित घटकांपासून आपल्याला जितकं लांब राहाता येईल तितकं लांब राहायला हवं.२- आपलं शरीर रोज स्वच्छ करताना, त्यावरील दुषित घटकही निघून गेले की नाहीत, याची खात्री करायला हवी. त्यासाठी रासायनिक घटक असलेल्या पदार्थांचा वापर मात्र शरीरावर अजिबात नको. थोड्या पाण्यात लिंबू पिळून त्यानं आपली त्वचा स्वच्छ केल्यास अनेक दुषित घटक आपल्या त्वचेपासून मुक्त होतात आणि त्वचेला टवटवी येते.३- आपल्या शरीरात हेल्दी फॅट्स जाताहेत की नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी. हे फॅट्स आपल्या त्वचेचीही काळजी घेईल. फॅटी अ‍ॅसिड, मांसाहार करणाºयांनी मासे, आॅलिव्ह आॅइल.. यासारखे पदार्थ आपल्या शरीरात जाताहेत की नाहीत याची काळजी घ्यायला हवी.४- आपल्याला असलेल्या रोजच्या टेन्शन्समुळे आपल्या मनावरच फक्त त्याचा विपरित परिणाम होतो, असं नाही. आपली त्वचाही टेन्शनमुळे खराब होते. म्हातारी होते. त्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे टेन्शनफ्री जगण्याकडे लक्ष द्या. योगा, ध्यानधारणा, हास्यविनोद, मित्रमंडळीत मन रमवणं या गोष्टी केल्या, तर आपलाच नाही, आपल्या त्वचेचाही उत्साह वाढेल.५- त्वचा निरोगी राहाण्यासाठी योग्य आणि पुरेशी झोपही अत्यावश्यक आहे. रात्रीची झोप केव्हाही चांगली. झोपेचा कोटा पूर्ण करण्यासाठी मुद्दाम दुपारी झोपण्यापेक्षा शक्यतो रात्रीच पुरेशी झोप घ्यावी.६- व्यायाम हा प्रत्येकाच्या आरोग्याचा मूलमंत्र आहे. व्यायामामुळे केवळ तुमच्या मनाची, शरीराचीच नव्हे, तुमच्या त्वचेचीही शक्ती नक्कीच वाढेल.