शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

स्त्रियांनी मानसिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने सक्षम व्हावे

By admin | Updated: March 30, 2015 01:17 IST

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय

गोंदिया : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्त वतीने श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात आयोजित गोंदिया ग्रंथोत्सव-२०१५ अंतर्गत ‘२१ वे शतक आणि महिला सबलीकरण’ या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली होती. महाचर्चेमध्ये एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. राजश्री धामोरीकर आणि प्रा. कविता राजाभोज, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. सविता बेदरकर, एम.बी.पटेल महाविद्यालय देवरीच्या प्रा. डॉ. वर्षा गंगणे आणि एन.एम.डी. महाविद्यालयाचे प्रा. बबन मेश्राम यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. राजश्री धामोरीकर यांनी, चांगल्या संस्कारांनी आयुष्याला दिशा मिळण्यास मदत होते. स्त्री-पुरूष समानतेच्या युगात आई-वडिलांनी देखील मुलगा-मुलगी हा भेद करू नये. काळ बदलला तशी स्त्रीची भूमिकाही बदलली. ग्रंथालयातील विदूषी स्त्रिया आजही एक व्यक्ती म्हणून जगू शकत नाही. स्त्रियांनी त्यांच्या स्वसंरक्षणासाठीही सबल होणे महत्वाचे आहे, असे मत मांडले.प्रा. सविता बेदरकर यांनी, स्त्रीने आर्थिक, सामाजिक व बौध्दिकदृष्ट्या सबल होण्याबरोबरच शारीरिकदृष्ट्या सबल होणे महत्वाचे आहे. आजही ठिकठिकाणी अपमानास्पद वागणूक व समाज कंटकांच्या विभत्स वर्तनाला सामोरे जावे लागते. २१ व्या शतकात जो समाज छाती ठोकून स्त्रीरक्षणाच्या गोष्टी सांगतो तो समाज प्रसंगी तिचे भक्षणही करतो. म्हणून शतक कुठलेही असो स्त्रीने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे आवश्यक आहे. स्त्रीरक्षणाचे कायदे स्त्रियांच्या पाठीशी आहेत. पण त्या कायद्याचा उपयोग करणे किंवा मनगटातील ताकद दाखविणे यापेक्षा आपल्या व्यवहारातून समाजाला संधी देवू नये असे मत मांडले.प्रा. डॉ. वर्षा गंगणे यांनी, कुटुंब संस्था व समाज या एकमेकांना पुरक संस्था आहेत. चूल व मूल या संकल्पनेतून आजची स्त्री बाहेर पडली आहे. समाजातील सर्व घटकातील स्त्री अविभाज्य अंग आहे. समाजाने स्त्री विषयक विचार बदलविणे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्त्रियांना योग्य ते स्थान देणे होय. यावेळी त्यांनी स्त्रीरक्षणावर भर दिला व विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्त्रिया सुरक्षित नसल्याचे सांगितले. प्रा. कविता राजाभोज यांनी, निसर्गाने स्त्रीला प्रजननक्षमता प्रदान करून वेगळेपण दिले आहे. यावेळी त्यांनी ऋषी वाल्मिकी व सेंट पॉलचे स्त्रीविषयक विचार मांडले. काळाच्या ओघात स्त्रीने स्वत:ला देहस्विनी, समाजाने कुटूंबिनी बनविले. स्त्रीने दोन्ही भूमिका यशस्वीपणे निभावल्या. २१ व्या शतकातील स्त्री सबल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. बबन मेश्राम यांनी आपल्या वक्तव्यातून सक्षमीकरण व सबलीकरण यातील भेद व्यक्त केला. स्त्रियांचे सबलीकरण होण्याकरिता स्त्रियांचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्त्री कुटूंबाची, समाजाची जबाबदारी व कर्तव्य कधीच नाकारली नाही. पण पुरूषांनी नेहमीच स्त्रियांचे स्थान दुय्यम मानले आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मांडले. संचालन रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले. आभार माहिती सहायक पल्लवी धारव यांनी मानले. कार्यक्रमाला महिला, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)