शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

जिल्ह्यातील जलस्रोत रितेच

By admin | Updated: August 5, 2015 01:51 IST

रविवारपासून बरसत असलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. हा रिमझिम पाऊस शेतीसाठी जरी फायदेशीर असला तरीही सिंचनाच्या दृष्टीने जलसंचय होण्यासाठी त्याचा फायदा दिसून येत नाही.

गोंदिया : रविवारपासून बरसत असलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. हा रिमझिम पाऊस शेतीसाठी जरी फायदेशीर असला तरीही सिंचनाच्या दृष्टीने जलसंचय होण्यासाठी त्याचा फायदा दिसून येत नाही. दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक रितेच असल्याची माहिती मिळाली आहे. १ जून ते ४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५४८.४ मिमी पाऊस पडला असून याची टक्केवारी ७३.६ एवढी आहे. सध्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात एकूण ५१.४ मिमी पाऊस पडत असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. रिमझिम पावसामुळे थोड्या प्रमाणात पिकांना लाभ मिळणार असला तरी जिल्ह्यातील जलाशयांमध्ये मात्र पुरेशा प्रमाणात जलसाठा झालेला नाही.इटियाडोह जलाशयात केवळ १४.३६ टक्के पाणी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेत तेथे ४६.८४ टक्के जलसाठा होता. सिरपूर जलाशयात १६.२१ टक्के जलसाठा आहे. तर मागील वर्षी ५८.८२ टक्के जलसाठा होता. विशेष म्हणजे सिरपूर जलाशयातून मागील चार दिवसांपासून सतत पूजारीटोला जलाशयासाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पूजारीटोला धरणाच्या जलसाठ्यात वाढ होवून ४३.१६ टक्के झाले आहे. मागील वर्षी तेथे ५१.९६ टक्के जलसाठा होता. उल्लेखनिय म्हणजे पूजारीटोला जलाशयासाठी जेवढे पाणी सिरपूरमधून सोडण्यात आले तेवढ्या प्रमाणात पाणी तेथे पोहचले नसून जवळील नाल्यांमध्येही पर्याप्त पाणीसाठा झालेला आहे. कालीसरार जलाशयात आतासुद्धा १५.३० टक्के जलसाठ्याची स्थिती आहे. मागील वर्षी येथे ५६ टक्के जलसाठा झाला होता.याशिवाय जिल्ह्यातील एकूण ६८ जलाशयांत (तलाव) केवळ २३.६७ टक्केच जलसाठा आहे. मागील वर्षी ३ आॅगस्टपर्यंत ६७.७१ टक्के जलसंग्रह त्यांत झाला होता. यंदा पावसाळ्याचा अर्ध्याधिक काळ आता लोटला आहे. असे असतानाही दमदार पावसाअभावी बोपाबोडी, भिवखिडकी, चान्नाबाक्टी, धाबेटेकडी, कोसबीबाकी व पळसगाव (सौंदड) येथील जुन्या मालगुजारी तलावांची स्थिती आताही अत्यंत दयनिय आहे. या तलावांचा जलस्तर आतासुद्धा लघुत्तम पाणीस्तराच्या खालीच आहे. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, आतापर्यंत या तलावांत एक टक्केसुद्धा पाण्याचा संग्रह झालेला नाही. प्राचीन काळात मालगुजारी तलाव सिंचनासाठी एक उत्तम साधन होते. (प्रतिनिधी)मध्यम प्रकल्पांत २५.६७ टक्के पाणीजिल्ह्यात मध्यम प्रकल्पाचे १० जलाशय आहेत. सर्वांमध्ये २५.६७ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेत या जलाशयांत ७६.८० टक्के जलसाठा होता. लघु प्रकल्पाच्या २० तलावांमध्ये १९.२६ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ३ आॅगस्ट पर्यंत यांत ५७.५९ टक्के जलसाठा होता. माजी मालगुजारी तलावांची स्थितीसुद्धा अशीच आहे. एकूण ३८ तलावांमध्ये २७.३७ टक्के जलसाठा झालेला आहे. मागील वर्षी या तलावांमध्ये याच तारखेला ५६.२६ टक्के जल संग्रह झालेला होता.