शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील जलस्रोत रितेच

By admin | Updated: August 5, 2015 01:51 IST

रविवारपासून बरसत असलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. हा रिमझिम पाऊस शेतीसाठी जरी फायदेशीर असला तरीही सिंचनाच्या दृष्टीने जलसंचय होण्यासाठी त्याचा फायदा दिसून येत नाही.

गोंदिया : रविवारपासून बरसत असलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. हा रिमझिम पाऊस शेतीसाठी जरी फायदेशीर असला तरीही सिंचनाच्या दृष्टीने जलसंचय होण्यासाठी त्याचा फायदा दिसून येत नाही. दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक रितेच असल्याची माहिती मिळाली आहे. १ जून ते ४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५४८.४ मिमी पाऊस पडला असून याची टक्केवारी ७३.६ एवढी आहे. सध्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात एकूण ५१.४ मिमी पाऊस पडत असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. रिमझिम पावसामुळे थोड्या प्रमाणात पिकांना लाभ मिळणार असला तरी जिल्ह्यातील जलाशयांमध्ये मात्र पुरेशा प्रमाणात जलसाठा झालेला नाही.इटियाडोह जलाशयात केवळ १४.३६ टक्के पाणी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेत तेथे ४६.८४ टक्के जलसाठा होता. सिरपूर जलाशयात १६.२१ टक्के जलसाठा आहे. तर मागील वर्षी ५८.८२ टक्के जलसाठा होता. विशेष म्हणजे सिरपूर जलाशयातून मागील चार दिवसांपासून सतत पूजारीटोला जलाशयासाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पूजारीटोला धरणाच्या जलसाठ्यात वाढ होवून ४३.१६ टक्के झाले आहे. मागील वर्षी तेथे ५१.९६ टक्के जलसाठा होता. उल्लेखनिय म्हणजे पूजारीटोला जलाशयासाठी जेवढे पाणी सिरपूरमधून सोडण्यात आले तेवढ्या प्रमाणात पाणी तेथे पोहचले नसून जवळील नाल्यांमध्येही पर्याप्त पाणीसाठा झालेला आहे. कालीसरार जलाशयात आतासुद्धा १५.३० टक्के जलसाठ्याची स्थिती आहे. मागील वर्षी येथे ५६ टक्के जलसाठा झाला होता.याशिवाय जिल्ह्यातील एकूण ६८ जलाशयांत (तलाव) केवळ २३.६७ टक्केच जलसाठा आहे. मागील वर्षी ३ आॅगस्टपर्यंत ६७.७१ टक्के जलसंग्रह त्यांत झाला होता. यंदा पावसाळ्याचा अर्ध्याधिक काळ आता लोटला आहे. असे असतानाही दमदार पावसाअभावी बोपाबोडी, भिवखिडकी, चान्नाबाक्टी, धाबेटेकडी, कोसबीबाकी व पळसगाव (सौंदड) येथील जुन्या मालगुजारी तलावांची स्थिती आताही अत्यंत दयनिय आहे. या तलावांचा जलस्तर आतासुद्धा लघुत्तम पाणीस्तराच्या खालीच आहे. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, आतापर्यंत या तलावांत एक टक्केसुद्धा पाण्याचा संग्रह झालेला नाही. प्राचीन काळात मालगुजारी तलाव सिंचनासाठी एक उत्तम साधन होते. (प्रतिनिधी)मध्यम प्रकल्पांत २५.६७ टक्के पाणीजिल्ह्यात मध्यम प्रकल्पाचे १० जलाशय आहेत. सर्वांमध्ये २५.६७ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेत या जलाशयांत ७६.८० टक्के जलसाठा होता. लघु प्रकल्पाच्या २० तलावांमध्ये १९.२६ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ३ आॅगस्ट पर्यंत यांत ५७.५९ टक्के जलसाठा होता. माजी मालगुजारी तलावांची स्थितीसुद्धा अशीच आहे. एकूण ३८ तलावांमध्ये २७.३७ टक्के जलसाठा झालेला आहे. मागील वर्षी या तलावांमध्ये याच तारखेला ५६.२६ टक्के जल संग्रह झालेला होता.