शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
3
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
4
ट्रेन सुटली तरीही वेस्ट जत नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
5
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
6
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
7
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
8
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
9
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
10
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
11
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
12
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
13
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
14
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
15
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
16
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
17
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
18
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
19
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
20
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!

जिल्ह्यातील जलस्रोत रितेच

By admin | Updated: August 5, 2015 01:51 IST

रविवारपासून बरसत असलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. हा रिमझिम पाऊस शेतीसाठी जरी फायदेशीर असला तरीही सिंचनाच्या दृष्टीने जलसंचय होण्यासाठी त्याचा फायदा दिसून येत नाही.

गोंदिया : रविवारपासून बरसत असलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. हा रिमझिम पाऊस शेतीसाठी जरी फायदेशीर असला तरीही सिंचनाच्या दृष्टीने जलसंचय होण्यासाठी त्याचा फायदा दिसून येत नाही. दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक रितेच असल्याची माहिती मिळाली आहे. १ जून ते ४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५४८.४ मिमी पाऊस पडला असून याची टक्केवारी ७३.६ एवढी आहे. सध्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात एकूण ५१.४ मिमी पाऊस पडत असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. रिमझिम पावसामुळे थोड्या प्रमाणात पिकांना लाभ मिळणार असला तरी जिल्ह्यातील जलाशयांमध्ये मात्र पुरेशा प्रमाणात जलसाठा झालेला नाही.इटियाडोह जलाशयात केवळ १४.३६ टक्के पाणी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेत तेथे ४६.८४ टक्के जलसाठा होता. सिरपूर जलाशयात १६.२१ टक्के जलसाठा आहे. तर मागील वर्षी ५८.८२ टक्के जलसाठा होता. विशेष म्हणजे सिरपूर जलाशयातून मागील चार दिवसांपासून सतत पूजारीटोला जलाशयासाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पूजारीटोला धरणाच्या जलसाठ्यात वाढ होवून ४३.१६ टक्के झाले आहे. मागील वर्षी तेथे ५१.९६ टक्के जलसाठा होता. उल्लेखनिय म्हणजे पूजारीटोला जलाशयासाठी जेवढे पाणी सिरपूरमधून सोडण्यात आले तेवढ्या प्रमाणात पाणी तेथे पोहचले नसून जवळील नाल्यांमध्येही पर्याप्त पाणीसाठा झालेला आहे. कालीसरार जलाशयात आतासुद्धा १५.३० टक्के जलसाठ्याची स्थिती आहे. मागील वर्षी येथे ५६ टक्के जलसाठा झाला होता.याशिवाय जिल्ह्यातील एकूण ६८ जलाशयांत (तलाव) केवळ २३.६७ टक्केच जलसाठा आहे. मागील वर्षी ३ आॅगस्टपर्यंत ६७.७१ टक्के जलसंग्रह त्यांत झाला होता. यंदा पावसाळ्याचा अर्ध्याधिक काळ आता लोटला आहे. असे असतानाही दमदार पावसाअभावी बोपाबोडी, भिवखिडकी, चान्नाबाक्टी, धाबेटेकडी, कोसबीबाकी व पळसगाव (सौंदड) येथील जुन्या मालगुजारी तलावांची स्थिती आताही अत्यंत दयनिय आहे. या तलावांचा जलस्तर आतासुद्धा लघुत्तम पाणीस्तराच्या खालीच आहे. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, आतापर्यंत या तलावांत एक टक्केसुद्धा पाण्याचा संग्रह झालेला नाही. प्राचीन काळात मालगुजारी तलाव सिंचनासाठी एक उत्तम साधन होते. (प्रतिनिधी)मध्यम प्रकल्पांत २५.६७ टक्के पाणीजिल्ह्यात मध्यम प्रकल्पाचे १० जलाशय आहेत. सर्वांमध्ये २५.६७ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेत या जलाशयांत ७६.८० टक्के जलसाठा होता. लघु प्रकल्पाच्या २० तलावांमध्ये १९.२६ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ३ आॅगस्ट पर्यंत यांत ५७.५९ टक्के जलसाठा होता. माजी मालगुजारी तलावांची स्थितीसुद्धा अशीच आहे. एकूण ३८ तलावांमध्ये २७.३७ टक्के जलसाठा झालेला आहे. मागील वर्षी या तलावांमध्ये याच तारखेला ५६.२६ टक्के जल संग्रह झालेला होता.