शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गंगाबाईच्या रक्तपेढीला रक्त विलगीकरण केंद्राची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2015 01:52 IST

येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्तविघटीकरण होत नसल्याने वर्षाला हजारो रुग्णांना रक्तघटकांसाठी खासगी रुग्णालयात किंवा नागपूरला जावे लागते.

गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्तविघटीकरण होत नसल्याने वर्षाला हजारो रुग्णांना रक्तघटकांसाठी खासगी रुग्णालयात किंवा नागपूरला जावे लागते. रक्तविलगीकरणाच्या केंद्राला दोन वर्षापूर्वी मंजुरी मिळाली. मात्र ही मजुरीच कुठे विरघळली ते कळायला मार्ग नाही.वैज्ञानिक प्रगती साध्य केली असली तरी कृत्रिम रक्त तयार करण्यात माणूस उपयशी ठरला आहे. रक्तदानाला अधिक महत्त्व आहे. अनेकदा रुग्णांना व्होल ब्लडसह रक्तघटकांची गरज भासते. मात्र या ठिकाणी रक्तघटक मिळत नसल्याने गरीब रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. विलगीकरण प्रक्रिया राहिल्यास एक रक्तपिशवी चार रुग्णांचा जीव वाचविते. गोंदिया जिल्हा शासकीय रक्तपेढीचे मासिक रक्तसंकलन ६०० ते ७०० रक्त युनिट इतके आहे. वर्षाला ८५०० ते ९००० रक्तयुनिट येथे जमा होते. जिल्ह्यासह मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील रुग्णांची गरजदेखील हीच रक्तपेढी पूर्ण करते. परंतु अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या अभावाने येथे रक्तविलगीकरण होत नसल्याने रक्तघटकांची पूर्तता होत नाही. ही गंभीर समस्या हजारो रुग्णांच्या जीवावर बेतते. सर्वसामान्य रुग्णांना व्होलब्लड तर मृत्यूशी झूंज देणाऱ्यांना अनेकदा रक्तघटक प्लेटलेटची गरज असते. जिल्ह्यात सिकलसेल व थॅलेसिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. अशा रुग्णांना व्होल ब्लडसह पॅकसेल हे रक्तघटक गरजेचे असतात. जळीत रुग्णांना प्लाझमा नावाचा रक्तघटक लागतो. अतिरिक्तस्त्राव होणाऱ्या रुग्णांना प्लेटलेटची गरज असते. सर्पदंश व आयसीयूमध्ये असणाऱ्या रुग्णांना अनेकदा स्पेशल कंपोनंट किंवा फ्रोजन प्लाजमाची गरज भासते. जिल्ह्यातील १४ लाभ लोकांची जीवनदायिनी म्हणून ज्या रक्तपेढीकडे पाहिले जाते. त्या रक्तपेढीत ही यंत्रणाच नाही. केवळ व्होलब्लड पुरविण्याची क्षमताच या रक्तपेढीत आहे. दोन वर्षापुर्वी रक्त विलगीकरण केंद्राला मंजुरी मिळाली. मात्र, मंजुरीचे घोडे कुठे अडले ते कुणालाच ठाऊक? रक्त विलगीकरण व रक्तघटक वेगळे करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री व प्रशिक्षितांची गरज आहे. रक्तविघटन केंद्र आल्यावर जिल्ह्यातच प्लाजमा, प्लेटलेट, रक्तकणिका अशा विविध रक्तघटकांची पुर्तता होणार आहे. विघटनाच्या प्रक्रियेअभावी ८ ते ९ हजार रक्तपिशव्या रुग्णांना कमी पडतात. रक्तविलगीकरण केंद्र सुरु झाल्यास रक्तपिशव्यांची कमतरता भासणार नाही. त्यामुळे शासकीय रक्तपेढीला मंजूर झालेले रक्त विलगीकरण केंद्र सुरु करण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)