शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

गंगाबाईच्या रक्तपेढीला रक्त विलगीकरण केंद्राची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2015 01:52 IST

येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्तविघटीकरण होत नसल्याने वर्षाला हजारो रुग्णांना रक्तघटकांसाठी खासगी रुग्णालयात किंवा नागपूरला जावे लागते.

गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्तविघटीकरण होत नसल्याने वर्षाला हजारो रुग्णांना रक्तघटकांसाठी खासगी रुग्णालयात किंवा नागपूरला जावे लागते. रक्तविलगीकरणाच्या केंद्राला दोन वर्षापूर्वी मंजुरी मिळाली. मात्र ही मजुरीच कुठे विरघळली ते कळायला मार्ग नाही.वैज्ञानिक प्रगती साध्य केली असली तरी कृत्रिम रक्त तयार करण्यात माणूस उपयशी ठरला आहे. रक्तदानाला अधिक महत्त्व आहे. अनेकदा रुग्णांना व्होल ब्लडसह रक्तघटकांची गरज भासते. मात्र या ठिकाणी रक्तघटक मिळत नसल्याने गरीब रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. विलगीकरण प्रक्रिया राहिल्यास एक रक्तपिशवी चार रुग्णांचा जीव वाचविते. गोंदिया जिल्हा शासकीय रक्तपेढीचे मासिक रक्तसंकलन ६०० ते ७०० रक्त युनिट इतके आहे. वर्षाला ८५०० ते ९००० रक्तयुनिट येथे जमा होते. जिल्ह्यासह मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील रुग्णांची गरजदेखील हीच रक्तपेढी पूर्ण करते. परंतु अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या अभावाने येथे रक्तविलगीकरण होत नसल्याने रक्तघटकांची पूर्तता होत नाही. ही गंभीर समस्या हजारो रुग्णांच्या जीवावर बेतते. सर्वसामान्य रुग्णांना व्होलब्लड तर मृत्यूशी झूंज देणाऱ्यांना अनेकदा रक्तघटक प्लेटलेटची गरज असते. जिल्ह्यात सिकलसेल व थॅलेसिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. अशा रुग्णांना व्होल ब्लडसह पॅकसेल हे रक्तघटक गरजेचे असतात. जळीत रुग्णांना प्लाझमा नावाचा रक्तघटक लागतो. अतिरिक्तस्त्राव होणाऱ्या रुग्णांना प्लेटलेटची गरज असते. सर्पदंश व आयसीयूमध्ये असणाऱ्या रुग्णांना अनेकदा स्पेशल कंपोनंट किंवा फ्रोजन प्लाजमाची गरज भासते. जिल्ह्यातील १४ लाभ लोकांची जीवनदायिनी म्हणून ज्या रक्तपेढीकडे पाहिले जाते. त्या रक्तपेढीत ही यंत्रणाच नाही. केवळ व्होलब्लड पुरविण्याची क्षमताच या रक्तपेढीत आहे. दोन वर्षापुर्वी रक्त विलगीकरण केंद्राला मंजुरी मिळाली. मात्र, मंजुरीचे घोडे कुठे अडले ते कुणालाच ठाऊक? रक्त विलगीकरण व रक्तघटक वेगळे करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री व प्रशिक्षितांची गरज आहे. रक्तविघटन केंद्र आल्यावर जिल्ह्यातच प्लाजमा, प्लेटलेट, रक्तकणिका अशा विविध रक्तघटकांची पुर्तता होणार आहे. विघटनाच्या प्रक्रियेअभावी ८ ते ९ हजार रक्तपिशव्या रुग्णांना कमी पडतात. रक्तविलगीकरण केंद्र सुरु झाल्यास रक्तपिशव्यांची कमतरता भासणार नाही. त्यामुळे शासकीय रक्तपेढीला मंजूर झालेले रक्त विलगीकरण केंद्र सुरु करण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)