शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

अघोषित भारनियमनाने जिल्हावासी त्रस्त

By admin | Updated: February 12, 2015 01:21 IST

राज्यात सतत होणारे भारनियम मुक्त करून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून शेतीमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या ...

गोंदिया : राज्यात सतत होणारे भारनियम मुक्त करून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून शेतीमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या शासनाने मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले. त्यातही महावितरणकडून अघोषित भारनियमन सतत होत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिके लावली आहेत त्यांनाही मोठा फटका या भारनियमनाचा बसत आहे.भारनियमनमुक्त राज्याची घोषणाच आता फुसका बार ठरत असल्याचे जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे या मुख्य समस्येला घेऊन एकाही पक्षाने आवाज उचलला नसून उन्हाळ्याची चाहूल काही काळानंतर सुरू होणार असल्याने आतापासूनच महावितरणने भारनियमन करण्याला सुरूवात केली काय, असा सवालही आता उपस्थित झाला आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातील भारनियमनात कपात करण्यात आली होती. तर ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सहा तास खंडित करण्यात येत होता. पण आता ५-६ दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात अघोषित भारनियमन करण्यात येत असल्याने नागरिकांची चांगलीच कोंडी होत आहे. खरीपातील पिकांची मळणी आटोपल्यानंतर शेतकरी रबी हंगामाच्या पीक लागवडीकडे वळला आहे. त्यासाठी हजारो शेतकरी कृषी पंपाचा वापर करीत आहेत. मात्र भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)