शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय

By admin | Updated: December 18, 2014 22:57 IST

तालुक्यात जवळपास सतरा ते अठरा विविध शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीयकृत बँक कार्यरत आहेत. या कार्यालयांत नोकरी करणारे, शेतकरी व व्यापारी यांची विविध कामे असतात.

आमगाव : तालुक्यात जवळपास सतरा ते अठरा विविध शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीयकृत बँक कार्यरत आहेत. या कार्यालयांत नोकरी करणारे, शेतकरी व व्यापारी यांची विविध कामे असतात. मात्र या संपूर्ण कार्यालयात कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाही. ते गोंदिया व नागपूर येथे राहून ये-जा करतात. त्यांच्यावरील वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित विभागाची कारवाई गुलदस्त्यात आहे. सदर कर्मचारी सकाळी ९.३० वाजता येणाऱ्या इंटरसिटी रेल्वे गाडीने येतात, अशी अवस्था येथील कार्यरत कर्मचाऱ्यांची आहे. इंटरसिटीच्या नावावर कर्मचाऱ्यांचे चांगले चांगभल होत आहे. एकंदरीत ही गाडी व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य आहे. आमगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर कर्मचारी जेव्हा उतरतात, तेव्हा जत्रेचे स्वरुप येते. या स्टेशनवर आमगाव, सालेकसा, देवरी या तीन तालुक्यातील कार्यरत कर्मचारी उतरतात. विशेष म्हणजे सालेकसा व देवरी तालुक्यात जाण्याकरिता काळीपिवळी गाड्या येऊन त्यांना घेऊन जातात. हा ठरलेला कार्यक्रम आहे. यात कोणताही बदल नाही. आमगाव येथे डाक कार्यालय, टेलिफोन, लघुपाटबंधारे विभाग, जि.प. बांधकाम विभाग, बाघ इटियाडोह, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कृषी विभाग, स्टेटबँक, अर्बनबँक, बँक आॅफ इंडिया, पंचायत समिती, भूमापन कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण बँक असे अनेक कार्यालय आहेत. तेथील अधिकारी व कर्मचारी यांचा वेळापत्रक ठरलेलाच आहे. परतीच्या मार्गाला घड्याळीचे चार वाजले की ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाकडे लक्ष कमी व घड्याळाकडे जास्त असते. पहिली रिंग झाली की बरोबर त्यांच्या मोबाईलवर निरोप येतो. तेव्हा कामाचा लगबगीने सारवासारव करुन कर्मचारी कार्यालये सोडतात. काही कर्मचारी गोंदियाचे काम सांगून सरळ स्टेशन गाठून रेल्वेने निघून जातात. तसेच कधी येणारी इंटरसिटी मिळाली नाही तर कार्यालयात उशिरा येतात. तेव्हा स्वत:ला वाचविण्याकरिता कोणते तरी निमित्त सांगून कामाला लागतात. त्यावेळी एखाद्या व्यक्ती काम घेऊन गेला तर खुर्चीखाली काम थंडबस्त्यात असतो. अशी ही दयनीय अवस्था येथील सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांची आहे.दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे मुख्यालयी राहतो, असे घरमालकांकडून पत्र किंवा भाडे रसिद दाखवून ‘तो मी नव्हेच’ अशा आवेशामध्ये कर्मचारी काम करतात. खरोखर जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यपालन अधिकारी यांना प्रशासनात पारदर्शकता अणावयाची असेल तर वरिष्ठ सर्व कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तेव्हा ‘दूध का दूध’ व ‘पाणी का पाणी’ सिद्ध होवू शकेल.(तालुका प्रतिनिधी)