शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

कष्टकरी शेतकऱ्यांचे समस्याग्रस्त जीवन

By admin | Updated: December 3, 2014 22:53 IST

गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीकरिता प्रसिध्द आहेत. या जिल्ह्यांत प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे.

मुंडीकोटा : गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीकरिता प्रसिध्द आहेत. या जिल्ह्यांत प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे. अनेक शेतकरी शेतीच्या धंद्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतीवरच उदरनिर्वाह करणे, मुला-मुलींना शिक्षण देणे, त्यांचे लग्न करणे अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. सद्यस्थितीत शेती हा व्यवसाय परवडण्यासारखा राहिला नाही, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. पण वडिलांची परंपरा सुरू ठेवावी लागते. त्यातही वेळोवेळी निसर्ग साथ देत नाही. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ नेहमीच शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावेळी मजुरांचे दरसुद्धा गगणाला भिडले आहेत. तसेच रासायनिक खते, किटकनाशक औषधे यांच्याही भावात मोठीच वाढ झाली आहे. सर्वत्र शेतकरी ट्रॅक्टरचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे त्यांचेसुद्धा भाव वाढले आहेत. या युगात शेतकरी बैलबंडीचा उपयोग करीत नाहीत. रोवणीत ट्रॅक्टर भाड्याने केला जातो. महिलांना रोजच १५० ते १६० रूपये मजुरी द्यावी लागते. पुन्हा एक महिन्यानंतर शेतकऱ्यांना शेतातील निंदन करावे लागते. नंतर रासायनिक खते व औषधांची फवारणी करावी लागते. दिवाळीत हलके धान निघतात. त्यामुळे धान कापणे, ते मजुरांच्या हस्ते एका बांधीत जमा करणे ही कामे केली जातात. त्यांची मजुरी यावेळी शेतकऱ्यांना २०० रूपययेप्रमाणे द्यावी लागते. यानंतर ट्रॅक्टर लावून त्यांची मळणी केली जाते. ऐवढा मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो, पण हातात एकही रूपया मिळत नाही. याचे कारण म्हणजे भयंकर वाढलेली महागाई. दिवाळी झालयनंतरच हलक्या धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येते. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याकरिता ते आपले धान व्यापाऱ्यांना विकत असतात. व्यापारी पडल्याभागात त्या धानाची खरेदी करून शेतकऱ्यांना लुबाडतात. पण गरजवंताना अक्कल नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली दिसत आहे. पण आवश्यक खर्चाकरिता धान विकणे गरजेचे असते. यावेळी धान खरेदी केंद्र सुरू झाले असून धान खरेदी केंद्रावर माल ठेवण्याकरिता जागा नाहीत. अनेक शेतकऱ्यांचा माल बाहेर पडून आहे. बरेच दिवस धानाचा काटा होत नाही. माल बाहेर ठेवल्यावरही धान खरेदी केंद्रावर रात्रीच्या वेळी चौकीदार नाहीत. त्यामुळे बाहेरील पडलेले धानाची पोती चोरीस गेले तर जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. धान खरेदी केंद्रावर धान दिले तर त्यांचा चुकारा एक ते दोन महिन्यापर्यंत मिळत नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली दिसत आहे. ‘पिकेल तर विकेल’ पण काय? अनेक संकटाला तोंड देवून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसत आहे. शेतकऱ्यांकरिता जो दिवस उगवतो तो सारखाच दिसत असतो. नेतेमंडळी येतात आम्ही हे, ते करू, पण करत काहीच नाही. फक्त शेतकऱ्यांना आशेवर जगवत असतात. दिवसभर काबाळकष्ट करून आपले जीवन शेतकरी जगतात, पण शेवटी मिळते काय? हलाकीचे, दरिद्रतेचे केवळ कष्टमय जीवन. (वार्ताहर)