शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

कष्टकरी शेतकऱ्यांचे समस्याग्रस्त जीवन

By admin | Updated: December 3, 2014 22:53 IST

गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीकरिता प्रसिध्द आहेत. या जिल्ह्यांत प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे.

मुंडीकोटा : गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीकरिता प्रसिध्द आहेत. या जिल्ह्यांत प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे. अनेक शेतकरी शेतीच्या धंद्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतीवरच उदरनिर्वाह करणे, मुला-मुलींना शिक्षण देणे, त्यांचे लग्न करणे अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. सद्यस्थितीत शेती हा व्यवसाय परवडण्यासारखा राहिला नाही, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. पण वडिलांची परंपरा सुरू ठेवावी लागते. त्यातही वेळोवेळी निसर्ग साथ देत नाही. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ नेहमीच शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावेळी मजुरांचे दरसुद्धा गगणाला भिडले आहेत. तसेच रासायनिक खते, किटकनाशक औषधे यांच्याही भावात मोठीच वाढ झाली आहे. सर्वत्र शेतकरी ट्रॅक्टरचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे त्यांचेसुद्धा भाव वाढले आहेत. या युगात शेतकरी बैलबंडीचा उपयोग करीत नाहीत. रोवणीत ट्रॅक्टर भाड्याने केला जातो. महिलांना रोजच १५० ते १६० रूपये मजुरी द्यावी लागते. पुन्हा एक महिन्यानंतर शेतकऱ्यांना शेतातील निंदन करावे लागते. नंतर रासायनिक खते व औषधांची फवारणी करावी लागते. दिवाळीत हलके धान निघतात. त्यामुळे धान कापणे, ते मजुरांच्या हस्ते एका बांधीत जमा करणे ही कामे केली जातात. त्यांची मजुरी यावेळी शेतकऱ्यांना २०० रूपययेप्रमाणे द्यावी लागते. यानंतर ट्रॅक्टर लावून त्यांची मळणी केली जाते. ऐवढा मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो, पण हातात एकही रूपया मिळत नाही. याचे कारण म्हणजे भयंकर वाढलेली महागाई. दिवाळी झालयनंतरच हलक्या धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येते. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याकरिता ते आपले धान व्यापाऱ्यांना विकत असतात. व्यापारी पडल्याभागात त्या धानाची खरेदी करून शेतकऱ्यांना लुबाडतात. पण गरजवंताना अक्कल नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली दिसत आहे. पण आवश्यक खर्चाकरिता धान विकणे गरजेचे असते. यावेळी धान खरेदी केंद्र सुरू झाले असून धान खरेदी केंद्रावर माल ठेवण्याकरिता जागा नाहीत. अनेक शेतकऱ्यांचा माल बाहेर पडून आहे. बरेच दिवस धानाचा काटा होत नाही. माल बाहेर ठेवल्यावरही धान खरेदी केंद्रावर रात्रीच्या वेळी चौकीदार नाहीत. त्यामुळे बाहेरील पडलेले धानाची पोती चोरीस गेले तर जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. धान खरेदी केंद्रावर धान दिले तर त्यांचा चुकारा एक ते दोन महिन्यापर्यंत मिळत नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली दिसत आहे. ‘पिकेल तर विकेल’ पण काय? अनेक संकटाला तोंड देवून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसत आहे. शेतकऱ्यांकरिता जो दिवस उगवतो तो सारखाच दिसत असतो. नेतेमंडळी येतात आम्ही हे, ते करू, पण करत काहीच नाही. फक्त शेतकऱ्यांना आशेवर जगवत असतात. दिवसभर काबाळकष्ट करून आपले जीवन शेतकरी जगतात, पण शेवटी मिळते काय? हलाकीचे, दरिद्रतेचे केवळ कष्टमय जीवन. (वार्ताहर)