शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी शेतकऱ्यांचे समस्याग्रस्त जीवन

By admin | Updated: December 3, 2014 22:53 IST

गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीकरिता प्रसिध्द आहेत. या जिल्ह्यांत प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे.

मुंडीकोटा : गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीकरिता प्रसिध्द आहेत. या जिल्ह्यांत प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे. अनेक शेतकरी शेतीच्या धंद्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतीवरच उदरनिर्वाह करणे, मुला-मुलींना शिक्षण देणे, त्यांचे लग्न करणे अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. सद्यस्थितीत शेती हा व्यवसाय परवडण्यासारखा राहिला नाही, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. पण वडिलांची परंपरा सुरू ठेवावी लागते. त्यातही वेळोवेळी निसर्ग साथ देत नाही. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ नेहमीच शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावेळी मजुरांचे दरसुद्धा गगणाला भिडले आहेत. तसेच रासायनिक खते, किटकनाशक औषधे यांच्याही भावात मोठीच वाढ झाली आहे. सर्वत्र शेतकरी ट्रॅक्टरचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे त्यांचेसुद्धा भाव वाढले आहेत. या युगात शेतकरी बैलबंडीचा उपयोग करीत नाहीत. रोवणीत ट्रॅक्टर भाड्याने केला जातो. महिलांना रोजच १५० ते १६० रूपये मजुरी द्यावी लागते. पुन्हा एक महिन्यानंतर शेतकऱ्यांना शेतातील निंदन करावे लागते. नंतर रासायनिक खते व औषधांची फवारणी करावी लागते. दिवाळीत हलके धान निघतात. त्यामुळे धान कापणे, ते मजुरांच्या हस्ते एका बांधीत जमा करणे ही कामे केली जातात. त्यांची मजुरी यावेळी शेतकऱ्यांना २०० रूपययेप्रमाणे द्यावी लागते. यानंतर ट्रॅक्टर लावून त्यांची मळणी केली जाते. ऐवढा मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो, पण हातात एकही रूपया मिळत नाही. याचे कारण म्हणजे भयंकर वाढलेली महागाई. दिवाळी झालयनंतरच हलक्या धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येते. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याकरिता ते आपले धान व्यापाऱ्यांना विकत असतात. व्यापारी पडल्याभागात त्या धानाची खरेदी करून शेतकऱ्यांना लुबाडतात. पण गरजवंताना अक्कल नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली दिसत आहे. पण आवश्यक खर्चाकरिता धान विकणे गरजेचे असते. यावेळी धान खरेदी केंद्र सुरू झाले असून धान खरेदी केंद्रावर माल ठेवण्याकरिता जागा नाहीत. अनेक शेतकऱ्यांचा माल बाहेर पडून आहे. बरेच दिवस धानाचा काटा होत नाही. माल बाहेर ठेवल्यावरही धान खरेदी केंद्रावर रात्रीच्या वेळी चौकीदार नाहीत. त्यामुळे बाहेरील पडलेले धानाची पोती चोरीस गेले तर जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. धान खरेदी केंद्रावर धान दिले तर त्यांचा चुकारा एक ते दोन महिन्यापर्यंत मिळत नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली दिसत आहे. ‘पिकेल तर विकेल’ पण काय? अनेक संकटाला तोंड देवून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसत आहे. शेतकऱ्यांकरिता जो दिवस उगवतो तो सारखाच दिसत असतो. नेतेमंडळी येतात आम्ही हे, ते करू, पण करत काहीच नाही. फक्त शेतकऱ्यांना आशेवर जगवत असतात. दिवसभर काबाळकष्ट करून आपले जीवन शेतकरी जगतात, पण शेवटी मिळते काय? हलाकीचे, दरिद्रतेचे केवळ कष्टमय जीवन. (वार्ताहर)