शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

बालकांसह युवकांनाही देणार जंतनाशक डोज

By admin | Updated: August 21, 2016 23:57 IST

बालकांमध्ये कृमीची समस्या वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी २ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिवसा पाळला जात आहे.

कृमीची समस्या : जिल्ह्यात ३.२४ लाख मुलांना देण्याचे उद्दिष्ट गोंदिया : बालकांमध्ये कृमीची समस्या वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी २ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिवसा पाळला जात आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावर जंतनाशक अभियानाचे आयोजन करण्यात आले असून यात जिल्ह्यातील १ ते १९ वर्षापर्यंतच्या ३ लाख २३ हजार ९७० मुलांना जंतनाशक डोज देण्याचे उद्धीष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत अंगणवाडीच्या बालकांना जीवनसत्व अ दिले जात होते. पण पहिल्यांदा १ ते १९ वर्षाच्या मुलांनाही जंतनाशक डोज दिला जाणार आहे. राज्याच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला सोडून उर्वरीत ३२ जिल्ह्यात या जंतनाशक अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २५२६ शासकीय, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, मनपा शाळा, खासगी अनुदानित शाळा व आश्रमशाळेच्या २ लाख १४ हजार ३०७ तर जिल्ह्यातील १६७९ अंगणवाडी-मिनी अंगणवाडीच्या एक लाख ९ हजार ६६३ बालकांना जंतनाशकाचा डोज दिला जाणार आहे. अभियानात शाळाबाह्य मुला-मुलींचा समावेश आहे. १ ते २ वर्षातील बालकांना एल्बेंडाजोल ४०० एमजीची अर्धी टॅबलेट, तर यापेक्षा मोठ्या बालकांना एक टॅबलेट देण्यात येणार आहेत. अभियानासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी (आयसीडीएस), गटशिक्षणाधिकारी, शहर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग व आदिवासी विभागाचे या अभियानाला सहकार्य लाभणार आहे.एनएफएचएस ४ च्या सर्वेक्षणानुसार राज्यात ५ वर्षातील ३४.४ टक्के बालकांचा विकास कुपोषणामुळे थांबला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एजेंसीद्वारे करण्यात आलेल्या सर्वेनुसार मातीपासून हागाणाऱ्या कृमी दोषाची टक्केवारी महाराष्ट्रात २७.५५ टक्के आहे. यामुळे शासनाने राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिवस वर्षातून दोन वेळा आयोजित करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)मारबतीच्या दिवशी कसे राबविणार अभियान?येत्या २ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिवसाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी तान्हा पोळा (मारबत) आहे. विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत मोठ्या उत्साहात साजरी करतात. या दिवशी शाळांना सुटी असते. सोबतच राज्यात कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी संपाचे आवाहन केले आहे. यामुळे या अभियानावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. ७ सप्टेंबर रोजी मॉपअप दिवस ठेवण्यात आला आहे. या दिवशी जंतनाशक अभियानात डोज न पाजलेल्या बालकांना डोज देण्यात येणार आहे.- कुपोषण व रक्ताची कमतरताजागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात १ ते १९ वर्षापर्यंतच्या ६८ टक्के बालक व युवकांच्या शरीरात कृमी दोष आढळतात. मातीमधील जंतूपासून हा आजार होतो. जगात २८ टक्के बालकांना कृमी दोष होण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख कारण वैयक्तिक व परिसर अस्वच्छता आहे. कृमी दोष संक्रमित दूषित मातीच्या संपर्कात आल्यावर होतो. बालकांना दीर्घकाळ कृमी दोष राहीला तर बालके कमजोर होतात. रक्ताचा अभाव व कुपोषणाचेही कारण त्यामागे आहे. बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास थांबतो. भारतात ६ ते ५९ महिन्याच्या गटातील १० बालकांपैकी ७ बालकांना रक्त कमी असल्याचे लक्षात येते. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक आहे. १५ ते १९ वर्ष वयोगटातील ५६ टक्के मुलींना व ३० टक्के मुलांना रक्ताची कमतरता असते.