शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बालकांसह युवकांनाही देणार जंतनाशक डोज

By admin | Updated: August 21, 2016 23:57 IST

बालकांमध्ये कृमीची समस्या वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी २ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिवसा पाळला जात आहे.

कृमीची समस्या : जिल्ह्यात ३.२४ लाख मुलांना देण्याचे उद्दिष्ट गोंदिया : बालकांमध्ये कृमीची समस्या वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी २ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिवसा पाळला जात आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावर जंतनाशक अभियानाचे आयोजन करण्यात आले असून यात जिल्ह्यातील १ ते १९ वर्षापर्यंतच्या ३ लाख २३ हजार ९७० मुलांना जंतनाशक डोज देण्याचे उद्धीष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत अंगणवाडीच्या बालकांना जीवनसत्व अ दिले जात होते. पण पहिल्यांदा १ ते १९ वर्षाच्या मुलांनाही जंतनाशक डोज दिला जाणार आहे. राज्याच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला सोडून उर्वरीत ३२ जिल्ह्यात या जंतनाशक अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २५२६ शासकीय, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, मनपा शाळा, खासगी अनुदानित शाळा व आश्रमशाळेच्या २ लाख १४ हजार ३०७ तर जिल्ह्यातील १६७९ अंगणवाडी-मिनी अंगणवाडीच्या एक लाख ९ हजार ६६३ बालकांना जंतनाशकाचा डोज दिला जाणार आहे. अभियानात शाळाबाह्य मुला-मुलींचा समावेश आहे. १ ते २ वर्षातील बालकांना एल्बेंडाजोल ४०० एमजीची अर्धी टॅबलेट, तर यापेक्षा मोठ्या बालकांना एक टॅबलेट देण्यात येणार आहेत. अभियानासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी (आयसीडीएस), गटशिक्षणाधिकारी, शहर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग व आदिवासी विभागाचे या अभियानाला सहकार्य लाभणार आहे.एनएफएचएस ४ च्या सर्वेक्षणानुसार राज्यात ५ वर्षातील ३४.४ टक्के बालकांचा विकास कुपोषणामुळे थांबला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एजेंसीद्वारे करण्यात आलेल्या सर्वेनुसार मातीपासून हागाणाऱ्या कृमी दोषाची टक्केवारी महाराष्ट्रात २७.५५ टक्के आहे. यामुळे शासनाने राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिवस वर्षातून दोन वेळा आयोजित करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)मारबतीच्या दिवशी कसे राबविणार अभियान?येत्या २ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिवसाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी तान्हा पोळा (मारबत) आहे. विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत मोठ्या उत्साहात साजरी करतात. या दिवशी शाळांना सुटी असते. सोबतच राज्यात कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी संपाचे आवाहन केले आहे. यामुळे या अभियानावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. ७ सप्टेंबर रोजी मॉपअप दिवस ठेवण्यात आला आहे. या दिवशी जंतनाशक अभियानात डोज न पाजलेल्या बालकांना डोज देण्यात येणार आहे.- कुपोषण व रक्ताची कमतरताजागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात १ ते १९ वर्षापर्यंतच्या ६८ टक्के बालक व युवकांच्या शरीरात कृमी दोष आढळतात. मातीमधील जंतूपासून हा आजार होतो. जगात २८ टक्के बालकांना कृमी दोष होण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख कारण वैयक्तिक व परिसर अस्वच्छता आहे. कृमी दोष संक्रमित दूषित मातीच्या संपर्कात आल्यावर होतो. बालकांना दीर्घकाळ कृमी दोष राहीला तर बालके कमजोर होतात. रक्ताचा अभाव व कुपोषणाचेही कारण त्यामागे आहे. बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास थांबतो. भारतात ६ ते ५९ महिन्याच्या गटातील १० बालकांपैकी ७ बालकांना रक्त कमी असल्याचे लक्षात येते. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक आहे. १५ ते १९ वर्ष वयोगटातील ५६ टक्के मुलींना व ३० टक्के मुलांना रक्ताची कमतरता असते.