शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

घोगऱ्यात आतापासून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य

By admin | Updated: March 18, 2015 01:04 IST

घोगरा गावात उन्हाळा लागण्यापूर्वीच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे येथील महिलांचा त्रास वाढलेला दिसत आहे.

मुंडीकोटा : घोगरा गावात उन्हाळा लागण्यापूर्वीच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे येथील महिलांचा त्रास वाढलेला दिसत आहे. या गावाशेजारी पाटीलटोला गाव असून येथे शासनाने करोडो रुपये खर्च करून प्रादेशिक नळ योजना सुरू केलेली आहे. पण ती योजना कुचकामी ठरली आहे. या योजनेचे देखभालीचे काम ग्रा.पं. घोगराकडे देण्यात आले आहे. पण सचिव व सरपंच याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गाव एक असून अर्ध्या गावाला पाणी मिळते. तर अर्धे गाव पाण्याअभावी तहानलेले दिसत आहे. या गावात काही नवीन घरांचे काम सुरू आहे. त्यामुळे काही नागरिक आपल्या घराशेजारी टाक्यांवर विद्युत पंप लावून पाणी पुरवित असतात. त्यामुळे पाण्याच्या फोर्स कमी होऊन अनेकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. गावात विहिरी आहेत, पण त्या लांब दूर अंतरावर आहेत. तसेच अनेक बोअरवेल सद्यस्थितीत बंद अवस्थेत असून धूळखात पडलेले आहेत. पण याकडे येथील सचिवांचे लक्ष जात नाही. तसेच गावातील नवीन घरे बांधण्यासाठी जे व्यक्ती नळाच्या पाण्याच्या उपयोग करतात, अशांवर कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांचा जोर वाढला आहे. या योजनेचे पाईप लाईनचे खोदकाम बरोबर नसल्याने कुणाला भरपूर पाणी मिळतो तर कुणाला पाणीच मिळत नाही. मात्र पाणी पट्टीकर हा सर्वांना सारखाच भरावा लागतो. मग ही योजना कशासाठी? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे. नळ योजनेचे पाणी अनेकांना मिळत नसल्यामुळे पिण्याकरिता पाण्याची अडचण निर्माण झालेली दिसत आहे. ही बाब सचिव व सरपंच यांना माहिती असूनही नेहमीच ते दुर्लक्ष करीत आहेत. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून तहानलेल्या गावाची समस्या दूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा येथील महिला घागर मोर्चा काढतील, असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)