शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

खबरदार; प्रवाशांनो रेल्वे प्रवासात 'अशी' घ्या काळजी, अन्यथा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 06:22 IST

तरुण मंडळी गावाकडे जाताना प्रवासादरम्यान मौजमस्ती करतात. अचानक धोका घडल्यास कुटूबीयांचे काय, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. रेल्वे कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची वेळ येते.

ठळक मुद्देघ्या खबरदारी : दिवाळीनिमित्त बाहेर गावाला जाणाऱ्यांची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या सणासुद्दीचे दिवस आहेत. दूरवरुन प्रवास करणे कुटूंबीयांच्या भेटीसाठी गावाकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असते. कुटंबातील व्यक्ती येणार असून कुटूंबीय मोठी तयारी करतात. ते भेटीसाठी आसुसलेले असतात. मात्र काही वेळा प्रवासातील बेजबाबदारी जीवावर बेतते. त्यामुळे प्रवास करताना जरा सांभाळून करणे गरजेचे आहे. आनंदाच्या दिवसांमध्ये कुटूंबीयामध्ये दु:खाचा डोंगर कोसळणार नाही याची काळजी विशेषत: तरूणार्इंने घेणे आवश्यक आहे.तरुण मंडळी गावाकडे जाताना प्रवासादरम्यान मौजमस्ती करतात. अचानक धोका घडल्यास कुटूबीयांचे काय, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. रेल्वे कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची वेळ येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून घेतलेले गुंगीचे खाद्यपदार्थ खाल्यामुळे एक दोन दिवस शुध्दीवरही येत नाहीत. हा निष्काळजीपणा अनेक प्रवाशांच्या जीवावर बेततो. अनेकदा उशीरा रेल्वेस्थानकावर पोहोचलेले प्रवासी धावत्या गाडीत चढण्याच्या प्रयत्न करुन थेट मूत्यूलाच आव्हाण देतात. अशा प्रकारच्या असंख्य घटना घडूनही प्रवासी त्याबाबत कुठलीही सावधानता बाळगतांना दिसत नाहीत. याबाबत जागृत करुनही प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.चालत्या गाडीत चढणे-उतरणे टाळाचालत्या गाडीत चढणे, उतरणे किंवा गाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा रेल्वे कायद्यानुसार गुन्हा आहे. अनेकदा रेल्वेगाडी सुटल्यानंतर प्रवासी धावत जाऊन गाडी पकडतात. अशावेळी एखाद्याप्रसंगी प्रवाशांचा पाय घसरून तो कोचखाली आल्यास त्याच्या चिंधड्या उडण्याची शक्यता राहते. प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करुन मृत्यूलाच आमंत्रण देतात. त्यामुळे रेल्वे सुटण्याच्या दहा मिनिटे आधी रेल्वेस्थानकावर पोहोचून गाडीत चढणे अत्यावश्यक आहे.खाद्यपदार्थ खाणे टाळारेल्वेगाडी खाद्यपदार्थाची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्हेंडर्सची नियुक्ती केली असते. यासाठी त्यांना रीतसर खाद्यपदार्थ विकण्याच्या परवाना आणि ओळखपत्र रेल्वेकडून देण्यात येते. परंतु अनेकदा रेल्वेत कुठलाही परवाना नसताना अनेक अवैध व्हेंडर्स खाद्यपदार्थ विकताना दिसतात. त्यांच्याकडील चटपटीत खाद्यपदार्थ दिसले की प्रवाशांच्या जिभेला पाणी सुटते. कुठलाही विचार न करता प्रवासी खाद्यपदार्थ विकत घेऊन खातात. परंतु अशाप्रकारे विकत घेतलेल्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशाने असे खाद्यपदार्थ सबंधित अधिकृत व्हेंडर्सकडून विकत घेणे गरजेचे आहे.गुंगीचे औषध देऊन लूटरेल्वे प्रवासात दररोज प्रवाशांसोबत अनेक प्रकारच्या घटना घडतात. प्रवासात प्रवाशांना लुटणारी टोळी अनेक रेल्वेत प्रवाशांच्या भोळेपणाचा फायदा घेते. त्यांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांची लूट करते. अनेकदा प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सोन्या-चांदीचे दागिणे पळविण्याचे प्रकार घडतात. रेल्वेत प्रवास करताना रेल्वे प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहे. परंतु त्या नियमाकडे डोळेझाक केल्यामुळे प्रवाशांच्या जीवीतावर बेतते. यामुळे प्रवासाला निघताना प्रवाशांनी काळजी घेऊन बचाव करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे केळी किंवा बिस्कीटाच्या माध्यमातून अनेकवेळा गुंगीचे औषध दिले जाते.बर्थच्या आमिषाला बळी पडू नकाप्रवाशांचे तिकीट अनेकदा कन्फर्म नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळत नाही. असे प्रवासी हेरुन रेल्वे स्थानकावर भामटे त्यांना हेरतात. बर्थ पाहिजे का? अशी विचारले तर प्रवाशाने होय म्हटले की, त्यांच्याकडून पैसे उकळतात, बर्थ क्रमांक घेऊन येतो म्हणून त्यांना एका ठिकाणी बसवतात. त्यानंतर त्या प्रवाशाचे तिकीट रद्द करुन आणि बर्थ मिळवून देण्याचे पैसे घेऊन पळ काढतात. अशाप्रकारे लूटल्याची अनेक उदाहरणे आहेत. रेल्वेगाडीचा चार्ट तयार झाल्यानंतर टीसीशिवाय कुणीही बर्थ मिळवून देऊ शकत नाही. परंतु ही साधी बाब प्रवाशांच्या लक्षात येत नसल्यामुळे फसवणूक होते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे