शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार; प्रवाशांनो रेल्वे प्रवासात 'अशी' घ्या काळजी, अन्यथा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 06:22 IST

तरुण मंडळी गावाकडे जाताना प्रवासादरम्यान मौजमस्ती करतात. अचानक धोका घडल्यास कुटूबीयांचे काय, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. रेल्वे कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची वेळ येते.

ठळक मुद्देघ्या खबरदारी : दिवाळीनिमित्त बाहेर गावाला जाणाऱ्यांची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या सणासुद्दीचे दिवस आहेत. दूरवरुन प्रवास करणे कुटूंबीयांच्या भेटीसाठी गावाकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असते. कुटंबातील व्यक्ती येणार असून कुटूंबीय मोठी तयारी करतात. ते भेटीसाठी आसुसलेले असतात. मात्र काही वेळा प्रवासातील बेजबाबदारी जीवावर बेतते. त्यामुळे प्रवास करताना जरा सांभाळून करणे गरजेचे आहे. आनंदाच्या दिवसांमध्ये कुटूंबीयामध्ये दु:खाचा डोंगर कोसळणार नाही याची काळजी विशेषत: तरूणार्इंने घेणे आवश्यक आहे.तरुण मंडळी गावाकडे जाताना प्रवासादरम्यान मौजमस्ती करतात. अचानक धोका घडल्यास कुटूबीयांचे काय, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. रेल्वे कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची वेळ येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून घेतलेले गुंगीचे खाद्यपदार्थ खाल्यामुळे एक दोन दिवस शुध्दीवरही येत नाहीत. हा निष्काळजीपणा अनेक प्रवाशांच्या जीवावर बेततो. अनेकदा उशीरा रेल्वेस्थानकावर पोहोचलेले प्रवासी धावत्या गाडीत चढण्याच्या प्रयत्न करुन थेट मूत्यूलाच आव्हाण देतात. अशा प्रकारच्या असंख्य घटना घडूनही प्रवासी त्याबाबत कुठलीही सावधानता बाळगतांना दिसत नाहीत. याबाबत जागृत करुनही प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.चालत्या गाडीत चढणे-उतरणे टाळाचालत्या गाडीत चढणे, उतरणे किंवा गाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा रेल्वे कायद्यानुसार गुन्हा आहे. अनेकदा रेल्वेगाडी सुटल्यानंतर प्रवासी धावत जाऊन गाडी पकडतात. अशावेळी एखाद्याप्रसंगी प्रवाशांचा पाय घसरून तो कोचखाली आल्यास त्याच्या चिंधड्या उडण्याची शक्यता राहते. प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करुन मृत्यूलाच आमंत्रण देतात. त्यामुळे रेल्वे सुटण्याच्या दहा मिनिटे आधी रेल्वेस्थानकावर पोहोचून गाडीत चढणे अत्यावश्यक आहे.खाद्यपदार्थ खाणे टाळारेल्वेगाडी खाद्यपदार्थाची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्हेंडर्सची नियुक्ती केली असते. यासाठी त्यांना रीतसर खाद्यपदार्थ विकण्याच्या परवाना आणि ओळखपत्र रेल्वेकडून देण्यात येते. परंतु अनेकदा रेल्वेत कुठलाही परवाना नसताना अनेक अवैध व्हेंडर्स खाद्यपदार्थ विकताना दिसतात. त्यांच्याकडील चटपटीत खाद्यपदार्थ दिसले की प्रवाशांच्या जिभेला पाणी सुटते. कुठलाही विचार न करता प्रवासी खाद्यपदार्थ विकत घेऊन खातात. परंतु अशाप्रकारे विकत घेतलेल्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशाने असे खाद्यपदार्थ सबंधित अधिकृत व्हेंडर्सकडून विकत घेणे गरजेचे आहे.गुंगीचे औषध देऊन लूटरेल्वे प्रवासात दररोज प्रवाशांसोबत अनेक प्रकारच्या घटना घडतात. प्रवासात प्रवाशांना लुटणारी टोळी अनेक रेल्वेत प्रवाशांच्या भोळेपणाचा फायदा घेते. त्यांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांची लूट करते. अनेकदा प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सोन्या-चांदीचे दागिणे पळविण्याचे प्रकार घडतात. रेल्वेत प्रवास करताना रेल्वे प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहे. परंतु त्या नियमाकडे डोळेझाक केल्यामुळे प्रवाशांच्या जीवीतावर बेतते. यामुळे प्रवासाला निघताना प्रवाशांनी काळजी घेऊन बचाव करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे केळी किंवा बिस्कीटाच्या माध्यमातून अनेकवेळा गुंगीचे औषध दिले जाते.बर्थच्या आमिषाला बळी पडू नकाप्रवाशांचे तिकीट अनेकदा कन्फर्म नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळत नाही. असे प्रवासी हेरुन रेल्वे स्थानकावर भामटे त्यांना हेरतात. बर्थ पाहिजे का? अशी विचारले तर प्रवाशाने होय म्हटले की, त्यांच्याकडून पैसे उकळतात, बर्थ क्रमांक घेऊन येतो म्हणून त्यांना एका ठिकाणी बसवतात. त्यानंतर त्या प्रवाशाचे तिकीट रद्द करुन आणि बर्थ मिळवून देण्याचे पैसे घेऊन पळ काढतात. अशाप्रकारे लूटल्याची अनेक उदाहरणे आहेत. रेल्वेगाडीचा चार्ट तयार झाल्यानंतर टीसीशिवाय कुणीही बर्थ मिळवून देऊ शकत नाही. परंतु ही साधी बाब प्रवाशांच्या लक्षात येत नसल्यामुळे फसवणूक होते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे