शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
2
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
3
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
4
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
5
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
6
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
8
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
9
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
10
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
11
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
12
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
13
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
14
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
15
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
16
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
17
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
18
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
19
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
20
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

यावर्षी उन्हाळी सिंचनात होणार चारपटीने वाढ

By admin | Updated: April 22, 2017 02:30 IST

गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा यावर्षीच्या उन्हाळ्यात जलसाठ्याची स्थिती बरीच चांगली आहे.

१५ मे पर्यंत आवश्यकतेनुसार सोडणार पाणी : प्रकल्पांमध्ये २५ टक्के उपयुक्त जलसाठा गोंदिया : गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा यावर्षीच्या उन्हाळ्यात जलसाठ्याची स्थिती बरीच चांगली आहे. त्यामुळे उन्हाळी धानाचे क्षेत्र वाढले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत उन्हाळी सिंचन चार पटीने वाढणार आहे. येत्या १५ मे पर्यंत आवश्यकतेनुसार मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. गेल्यावर्षी जलाशयांमधील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत खराब होती. उपयुक्त जलसाठाच नसल्यामुळे मोठ्या प्रकल्पांमधून गेल्यावर्षी अवघ्या ११८० हेक्टरला पाणी देण्याचे नियोजन केले होते. यावर्षी मात्र पावसाळ्यात योग्यवेळी पाऊस झाल्याने खरीब हंगामात पिकांसाठी पाणी सोडण्याची वेळ आली नाही. परिणामी जलाशयांमध्ये जलसाठा कायम राहिला. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांमधून यावर्षी उन्हाळी धानासाठी ४०६० हेक्टरला सिंचन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ईटियाडोह, शिरपूर, पुजारीटोला, कालीसरार, धापेवाडा आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवर या सहा मोठ्या प्रकल्पांमधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी कालीसरार वगळता इतर सर्व जलाशयांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. त्यात ईटियाडोह प्रकल्पात आता १३०.४० दलघमी (४१ टक्के) उपयुक्त जलसाठा आहे. गेल्यावर्षी यावेळी तो अवघा ५६.८४ (७.८२ टक्के) होता. शिरपूर जलाशयात ४८.९७ दलघमी (३०.६५ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी यावेळी त्या जलशयात अवघा १०.६० दलघमी (६.६४ टक्के) जलसाठा होता. पुजारीटोला धरणात २३.५६ दलघमी (५४.१२ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी जवळपास एवढाच म्हणजे २३.६८ दलघमी जलसाठा होता. कालीसरार धरणात मात्र यावर्षी कोणताही जलसाठा शिल्लक नाही. तिरोडा तालुक्यातील धापेवाडा प्रकल्पात १२.८५ दलघमी (२९.१८ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी या जलाशयात आताच्या पेक्षा जास्त म्हणजे १५.६४ दलघमी (३४ टक्के) जलसाठा होता. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून गोंदिया जिल्ह्याला पाण्याचा वाटा मिळतो. त्या जलाशयात आता १६.६४ दलघमी (४ टक्के) उपयुक्त दलसाठा आहे. गेल्यावर्षी याचवेळी २.७४ दलघमी (०.६७ टक्के) होता. (जिल्हा प्रतिनिधी) पाणी पोहोचतच नाही यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणी असूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत हे पाणी पोहोचत नाही. अनेक ठिकाणचे कालवे नादुरूस्त आहेत. त्या कालव्यांच्या दुरूस्तीसाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे पाणी सोडूनही ते कालव्यातून वाहत पुढे न जाता मध्येच झिरपते. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात ते पाणी पोहोचणे कठीण जात आहे.