शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी उन्हाळी सिंचनात होणार चारपटीने वाढ

By admin | Updated: April 22, 2017 02:30 IST

गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा यावर्षीच्या उन्हाळ्यात जलसाठ्याची स्थिती बरीच चांगली आहे.

१५ मे पर्यंत आवश्यकतेनुसार सोडणार पाणी : प्रकल्पांमध्ये २५ टक्के उपयुक्त जलसाठा गोंदिया : गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा यावर्षीच्या उन्हाळ्यात जलसाठ्याची स्थिती बरीच चांगली आहे. त्यामुळे उन्हाळी धानाचे क्षेत्र वाढले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत उन्हाळी सिंचन चार पटीने वाढणार आहे. येत्या १५ मे पर्यंत आवश्यकतेनुसार मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. गेल्यावर्षी जलाशयांमधील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत खराब होती. उपयुक्त जलसाठाच नसल्यामुळे मोठ्या प्रकल्पांमधून गेल्यावर्षी अवघ्या ११८० हेक्टरला पाणी देण्याचे नियोजन केले होते. यावर्षी मात्र पावसाळ्यात योग्यवेळी पाऊस झाल्याने खरीब हंगामात पिकांसाठी पाणी सोडण्याची वेळ आली नाही. परिणामी जलाशयांमध्ये जलसाठा कायम राहिला. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांमधून यावर्षी उन्हाळी धानासाठी ४०६० हेक्टरला सिंचन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ईटियाडोह, शिरपूर, पुजारीटोला, कालीसरार, धापेवाडा आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवर या सहा मोठ्या प्रकल्पांमधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी कालीसरार वगळता इतर सर्व जलाशयांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. त्यात ईटियाडोह प्रकल्पात आता १३०.४० दलघमी (४१ टक्के) उपयुक्त जलसाठा आहे. गेल्यावर्षी यावेळी तो अवघा ५६.८४ (७.८२ टक्के) होता. शिरपूर जलाशयात ४८.९७ दलघमी (३०.६५ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी यावेळी त्या जलशयात अवघा १०.६० दलघमी (६.६४ टक्के) जलसाठा होता. पुजारीटोला धरणात २३.५६ दलघमी (५४.१२ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी जवळपास एवढाच म्हणजे २३.६८ दलघमी जलसाठा होता. कालीसरार धरणात मात्र यावर्षी कोणताही जलसाठा शिल्लक नाही. तिरोडा तालुक्यातील धापेवाडा प्रकल्पात १२.८५ दलघमी (२९.१८ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी या जलाशयात आताच्या पेक्षा जास्त म्हणजे १५.६४ दलघमी (३४ टक्के) जलसाठा होता. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून गोंदिया जिल्ह्याला पाण्याचा वाटा मिळतो. त्या जलाशयात आता १६.६४ दलघमी (४ टक्के) उपयुक्त दलसाठा आहे. गेल्यावर्षी याचवेळी २.७४ दलघमी (०.६७ टक्के) होता. (जिल्हा प्रतिनिधी) पाणी पोहोचतच नाही यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणी असूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत हे पाणी पोहोचत नाही. अनेक ठिकाणचे कालवे नादुरूस्त आहेत. त्या कालव्यांच्या दुरूस्तीसाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे पाणी सोडूनही ते कालव्यातून वाहत पुढे न जाता मध्येच झिरपते. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात ते पाणी पोहोचणे कठीण जात आहे.