शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

‘शुभमंगल’चा लाभ मिळालाच नाही

By admin | Updated: August 5, 2015 01:54 IST

नागरिकांना आपल्या मुला-मुलींचे लग्न करताना कर्जाचा डोंगर माथ्यावर करून सोहळा पार पाडावा लागतो.

१२६ जोडपे प्रतीक्षेत : १८ लाखांची करण्यात आली मागणीगोंदिया : नागरिकांना आपल्या मुला-मुलींचे लग्न करताना कर्जाचा डोंगर माथ्यावर करून सोहळा पार पाडावा लागतो. यातून अनेक मुलींचे वडील कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात. हे होऊ नये म्हणून तसेच नागरिकांच्या पैशांची बचत व्हावी म्हणून शासनाने ‘शुभमंगल’ योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. परंतु गोंदिया जिल्ह्यातील १२६ जोडप्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही. लग्नात अवाढव्य पैसे खर्च न करता सामूहिक विवाहाची कास धरणाऱ्या जिल्ह्यातील जोडप्यांपैकी ५६ जोडप्यांना मागील वर्षीपासून या योजनेचा लाभ मिळाला नाही. यावर्षी सामूहिक विवाह सोहळ््यात लग्न करणाऱ्या ७० जोडप्यांचे प्रस्ताव महिला व बालविकास विभागाकडे आले आहे. अशा एकूण १२६ जोडप्यांना लाभ देण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाकडे १८ लाखांची मागणी केली आहे. प्रत्येक जोडप्यातील वधूच्या मातेला १० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. आई नसल्यास वडीलांच्या हातात किंवा आई-वडील दोघेही नसल्यास वधूच्या हातात ते अनुदान दिले जाते. प्रत्येक जोडप्यामागे विवाह सोहळा घडवून आणणाऱ्या संस्थेला दोन हजार रूपये दिले जातात. ‘शुभमंगल’ योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचे काम संस्थांमार्फत करण्यात येते. परंतु त्या संस्था अर्जामध्ये अनेक त्रुट्या ठेवत असल्याने लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. यावर्षी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत ७० अर्ज महिला व बालविकास विभागात दाखल करण्यात आले. परंतु निधीअभावी त्या जोडप्यांना अद्याप लाभ देण्यात आला नाही. (तालुका प्रतिनिधी)या कागदपत्रांची गरजशुभमंगल योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रात कमतरता राहत असल्यामुळे त्यांचे प्रस्ताव नाकारण्यात येतात. अर्ज दाखल करताना अर्जदारांनी वर-वधूचा जातीचा दाखला, जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, वर-वधूने सक्षम प्राधिकरणासमोर केलेले प्रतिज्ञापत्र, वधूचे आई-वडील शेतकरी शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, वधूच्या पालकांचे एक लाखाच्या आत उत्पन्न असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र, विवाह नोंदणीचा दाखला, विवाह प्रथमच असल्याचे तलाठी किंवा ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, वधूच्या आईच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, वधूची आई नसल्यास वडिलाचे खाते, ते ही नसल्यास वधूच्या बँक खात्याची झेरॉक्स असणे आवश्यक आहे. या मात्र संबंधित संस्थेकडून हे कागदपत्रे दिलेच जात नसल्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित आहेत.कार्यालय लुळेपांगळे, आमदारांचे दुर्लक्षशुभमंगल योजनेचा लाभ देणारा महिला व बालविकास विभागच लुळापांगळा झाला आहे. जुलै २०१३ पासून या कार्यालयाची धुरा प्रभारींच्या खांद्यावर आहे. नम्रता चौधरी यांच्याकडे या कार्यालयाचा कारभार आहे. या कार्यालयात परिविक्षाधिन अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत. हे कार्यालय सुरूवातीपासूनच भाड्याच्या खोलीत असून आता त्या इमारतीचीही जीर्णावस्था झाली आहे. गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल हे दरवर्षी आपल्या संस्थेमार्फत सामूहिक विवाह सोहळा घेतात. पण लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याकडे किंवा कार्यालयाच्या दुरवस्थेकडे त्यांचे लक्ष नाही.