शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

स्वयंरोजगाराकडे वाढला कल

By admin | Updated: May 20, 2016 01:30 IST

एकदाचा देव मिळणार, पण नोकरी मिळणे कठीण अशी आजची स्थिती झाल्याने जिल्ह्यातील युवा पिढी आता शासकीय नोकरीच्या मागे न धावता...

९ महिन्यांत ४७२ उद्योगांची नोंद : सुक्ष्म व्यवसायांची संख्या अधिककपिल केकत गोंदियाएकदाचा देव मिळणार, पण नोकरी मिळणे कठीण अशी आजची स्थिती झाल्याने जिल्ह्यातील युवा पिढी आता शासकीय नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाराची कास धरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्हा उद्योग केंद्राकडे या ९ महिन्यांत ४७२ उद्योगांची नोंद झाल्याचे दिसते. नोकरीची प्रतीक्षा सोडून युवक स्वत:च काहीतरी करून दाखविण्याची धडपड करीत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.उच्च शिक्षण घेतल्यानंतरही शासकीय नोकरी सहजासहजी मिळत नाही, ही आजची वास्तविकता आहे. नोकरीसाठी धडपड व मेहनत करताना वयोमर्यादा निघून जाते व नोकरीसाठीची आशा शेवटी निराशेत बदलून युवा वर्ग रोजीरोटीसाठी लहानसहान रोजगाराकडे वळतात. युवकांना पूर्वीपासूनच नोकरीची आस न बाळगता व कुणाची नोकरी न करता स्वत:साठी स्वत:चे काही करून दाखविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र एक मार्गदर्शक ठरत आहे. स्वयंरोजगाराकडे वळून स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून मार्गदर्शनही दिले जाते असून हेच केंद्राचे मुख्य उद्दीष्ट आहे. सध्या दोन महत्वाच्या योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी उद्योग केंद्र कर्जस्वरूपातून भांडवल उपलब्ध करवून देत आहे. त्यामुळे बेरोजगारांना मार्गदर्शनासह भांडवलाचीही व्यवस्था केंद्राच्या माध्यमातून होत आहे. परिणामी जिल्ह्यातील युवा वर्ग नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाराकडे वळत असल्याचे दिसत आहे. कारण सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात ४७२ उद्योगांची नोंद झाल्याची आकडेवारी मिळाली आहे. या ४७२ उद्योगांत ४३४ सूक्ष्म (मायक्रो) उद्योग असून ते ० ते २५ लाख क्षमतेत येतात. त्यानंतर ३८ उद्योग लहान (स्मॉल) उद्योग असून २५ लाख ते ५ कोटीपर्यंत येते. विशेष म्हणजे यातील एकही मध्यम (मिडीयम) उद्योग नाही. कारण त्याची क्षमता ५ ते १० कोटींच्या घरात असते.आता आॅनलाईन रजिस्ट्रेशन पूर्वी उद्योगांची नोंदणी करण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्राकडून पार्ट-१ (अस्थायी) व उद्योग सुरू झाल्यानंतर पार्ट-२ (स्थायी) असे दोन प्रमाणपत्र दिले जात होते. मात्र सप्टेंबर २०१५ पासून ही प्रक्रिया आता आॅनलाईन झाली असून केंद्राच्या संकेतस्थळावरूनच आॅनलाईन अर्ज भरावा लागत आहे. यामुळे उद्योग केंद्रासह अर्जदारांनाही हे सोयीचे ठरत आहे. रोजगार निर्मिती कार्यक्रमापासून निराशाबेरोजगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम एक महत्वाची योजना मानली जाते. महत्वाची बाब म्हणजे, याअंतर्गत जिल्ह्याला सन २०१५-१६ करिता काहीच टार्गेट देण्यात आले नव्हते. अर्थात ही योजना या वर्षात बंद होती. मात्र चालू वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला या योजनेंतर्गत टार्गेट दिले जाणार असल्याची माहिती आहे.