शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगाराकडे वाढला कल

By admin | Updated: May 20, 2016 01:30 IST

एकदाचा देव मिळणार, पण नोकरी मिळणे कठीण अशी आजची स्थिती झाल्याने जिल्ह्यातील युवा पिढी आता शासकीय नोकरीच्या मागे न धावता...

९ महिन्यांत ४७२ उद्योगांची नोंद : सुक्ष्म व्यवसायांची संख्या अधिककपिल केकत गोंदियाएकदाचा देव मिळणार, पण नोकरी मिळणे कठीण अशी आजची स्थिती झाल्याने जिल्ह्यातील युवा पिढी आता शासकीय नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाराची कास धरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्हा उद्योग केंद्राकडे या ९ महिन्यांत ४७२ उद्योगांची नोंद झाल्याचे दिसते. नोकरीची प्रतीक्षा सोडून युवक स्वत:च काहीतरी करून दाखविण्याची धडपड करीत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.उच्च शिक्षण घेतल्यानंतरही शासकीय नोकरी सहजासहजी मिळत नाही, ही आजची वास्तविकता आहे. नोकरीसाठी धडपड व मेहनत करताना वयोमर्यादा निघून जाते व नोकरीसाठीची आशा शेवटी निराशेत बदलून युवा वर्ग रोजीरोटीसाठी लहानसहान रोजगाराकडे वळतात. युवकांना पूर्वीपासूनच नोकरीची आस न बाळगता व कुणाची नोकरी न करता स्वत:साठी स्वत:चे काही करून दाखविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र एक मार्गदर्शक ठरत आहे. स्वयंरोजगाराकडे वळून स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून मार्गदर्शनही दिले जाते असून हेच केंद्राचे मुख्य उद्दीष्ट आहे. सध्या दोन महत्वाच्या योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी उद्योग केंद्र कर्जस्वरूपातून भांडवल उपलब्ध करवून देत आहे. त्यामुळे बेरोजगारांना मार्गदर्शनासह भांडवलाचीही व्यवस्था केंद्राच्या माध्यमातून होत आहे. परिणामी जिल्ह्यातील युवा वर्ग नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाराकडे वळत असल्याचे दिसत आहे. कारण सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात ४७२ उद्योगांची नोंद झाल्याची आकडेवारी मिळाली आहे. या ४७२ उद्योगांत ४३४ सूक्ष्म (मायक्रो) उद्योग असून ते ० ते २५ लाख क्षमतेत येतात. त्यानंतर ३८ उद्योग लहान (स्मॉल) उद्योग असून २५ लाख ते ५ कोटीपर्यंत येते. विशेष म्हणजे यातील एकही मध्यम (मिडीयम) उद्योग नाही. कारण त्याची क्षमता ५ ते १० कोटींच्या घरात असते.आता आॅनलाईन रजिस्ट्रेशन पूर्वी उद्योगांची नोंदणी करण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्राकडून पार्ट-१ (अस्थायी) व उद्योग सुरू झाल्यानंतर पार्ट-२ (स्थायी) असे दोन प्रमाणपत्र दिले जात होते. मात्र सप्टेंबर २०१५ पासून ही प्रक्रिया आता आॅनलाईन झाली असून केंद्राच्या संकेतस्थळावरूनच आॅनलाईन अर्ज भरावा लागत आहे. यामुळे उद्योग केंद्रासह अर्जदारांनाही हे सोयीचे ठरत आहे. रोजगार निर्मिती कार्यक्रमापासून निराशाबेरोजगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम एक महत्वाची योजना मानली जाते. महत्वाची बाब म्हणजे, याअंतर्गत जिल्ह्याला सन २०१५-१६ करिता काहीच टार्गेट देण्यात आले नव्हते. अर्थात ही योजना या वर्षात बंद होती. मात्र चालू वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला या योजनेंतर्गत टार्गेट दिले जाणार असल्याची माहिती आहे.