शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

माणसाला माणूस म्हणून बघा

By admin | Updated: February 27, 2015 00:44 IST

अनुसूचित जाती-जमाती नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याकरिता कुटुंबामध्ये आई-वडिलांकडून बालकांवर केले जाणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत.

गोंदिया : अनुसूचित जाती-जमाती नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याकरिता कुटुंबामध्ये आई-वडिलांकडून बालकांवर केले जाणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्या मुलांना जाती-पातीचे शिक्षण देवूच नये. त्यामुळे येणारी पिढी जातीबद्दल भेदभाव करूच शकणार नाही. कायद्याच्या भीतीने समाजामध्ये समानता निर्माण होत नसते तर त्याकरिता माणसाला माणूस म्हणून बघण्याचा दृष्टीकोन नागरिकांमध्ये रुजविणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. बुधवार (दि.२५) सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या (बार्टी) वतीने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अट्रासिटी कायदा) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. या वेळी डॉ. सैनी बोलत होते. कार्यशाळेला सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विभागप्रमुख तथा प्रसिध्द विचारवंत हरी नरके, विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष एस.जी. गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, समाजकल्याण उपायुक्त दिलीप राठोड, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रवीण अडगे, अ‍ॅड. बीणा वाजपेयी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी तथा कार्यशाळा समन्वयक मनोज खंडारे, बार्टीचे निबंधक तथा प्रकल्प संचालक राजेंद्र मुठे प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. अमित सैनी यांनी जिल्हास्तरीय दक्षता व नियंत्रण समितीतीत दाखल प्रकरणांबाबत निर्णय घेतांना येणाऱ्या अडचणींची प्रत्यक्ष चर्चा केली. विविध प्रकरणांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करीत असताना वैद्यकीय तपासणीमुळे प्रकरणे प्रलंबित राहतात. तसेच वैद्यकीय तपासणीस नकार दिल्यामुळे समितीला कठोर निर्णय घेणे बंधनकारक ठरते. याबाबत जागृती करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. बऱ्याच प्रकरणांमध्ये पाठपुरावा करण्याच्या प्रक्रियेत येणारे अडथळे व पाठपुरावा कसा करावा याबाबतच्या अपूर्ण माहितीमुळे कायद्यांतर्गत मिळणारा लाभ पीडित नागरिकांना मिळत नाही. तेव्हा याबाबत संभ्रम असू नये, असेही ते म्हणाले. प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही डॉ. सैनी यांनी सांगितले. कार्यशाळेमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विभाग प्रमुख हरी नरके यांनी महाराष्ट्रातील जातीप्रथा, समस्या आणि सामाजिक वास्तव या विषयावर मार्गदर्शन केले. अ‍ॅड. विनोदकुमार गजभिये यांनी कायद्यातील तरतुदी, विश्लेषण, मानवी हक्क अंमलबजावणी व प्रशासनाची भूमिका याबाबत माहिती दिली. अ‍ॅड. राजेंद्र पांडे यांनी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत माहिती दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक दिलीप राठोड यांनी, संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी तर आभार जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी मानले. कार्यशाळेला पोलीस अधिकारी, तहसीलदार, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)