शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

कक्ष तयार, मात्र करवसुली अधिकारीच नाही

By admin | Updated: March 2, 2015 01:33 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे कर वसुली अधिकारी म्हणून नायब तहसीलदार पाटील यांची नियुक्ती केली.

गोंदिया : जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे कर वसुली अधिकारी म्हणून नायब तहसीलदार पाटील यांची नियुक्ती केली. कर वसुली अधिकारी रुजू होणार यामुळे नगरपरिषद कार्यालयात असलेले पक्षनेत्यांचे कक्ष त्यांच्यासाठी सज्ज करण्यात आले. मात्र महिनाभर लोटून गेला असूनही पाटील रूजू न झाल्याने कक्ष असून त्यासाठी अधिकारीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नगरपरिषदेने कर वसुली अधिकारी मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे मागणी केली होती. कर वसुली अधिकारी मिळाल्यास नगरपरिषदेच्या डोक्यावर असलेले ११ कोटींच्या कर वसुलीचे डोंगर कमी होणार अशी नगरपरिषद प्रशासनाची अपेक्षा होती. एवढेच नव्हे तर पाटील रूजू झाल्यावर मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी ते स्वत: एक पथक घेऊन तसेच दुसरे पथक तयार करून पाटील यांच्या मार्गदर्शनात वसुली मोहीम राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी आमसभेत ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. करवसुलीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी नायब तहसीलदार निलेश पाटील यांची करवसुली अधिकारी म्हणून नियुक्ती केली. ३१ जानेवारी रोजी तसे आदेश नगरपरिषदेला मिळाले. आता करवसुली अधिकारी पाटील येणार, त्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा लागेलच. अशात नगरपरिषद कार्यालयातील पूर्वी पक्षनेत्यांसाठी असलेले कक्ष करवसुली अधिकाऱ्यांसाठी आरक्षीत करून सज्ज करण्यात आले. मात्र फेब्रुवारी महिना लोटून गेला तरिही पाटील रूजू झालेच नाहीत. अशात त्यांच्यासाठी आरक्षीत करून ठेवलेले कक्ष तसेच बंद पडून आहे. एकीकडे ज्यांना वेगळे कक्ष नाही ते वेगळे कक्ष लाभावे यासाठी धडपडत असतात. येथे मात्र उलटाच कारभार दिसून येत आहे. पाटील साहेबांसाठी कक्ष तयार असूनही ते रूजू होत नसल्याने त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले कक्ष बंद पडून आहे. तर पालिकेतील कर्मचारी पाटील कधी रूजू होणार याची वाट बघत आहेत. मात्र त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या कक्षावर करवसुली अधिकाऱ्यांचे कक्ष अशी पट्टी चिकटविण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)एकच पथक करीत आहे वसुली३१ जानेवारी रोजी पाटील यांची करवसुली अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश नगरपरिषदेला मिळाले. त्यानुसार पाटील २ फेब्रुवारी रोजी पदभार घेणार व त्यानंतर दोन कर वसुली पथक तयार करून वसुली केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी मोरे यांनी लोकमतला सांगीतले होते. मात्र पाटी अद्याप रूजू झालेले नाही. परिणामी एकच वसुली पथक शहरात कर वसुलीची मोहीम राबवित आहेत. दोन पथकांद्वारे मोहीम राबविल्यास कमी कालावधीत जास्तीत जास्त थकबाकीदारांपर्यंत पोहचता आले असता असे मुख्याधिकाऱ्यांचे नियोजन होते. मात्र पाटील न आल्याने त्यांचे हे नियोजन फिस्टकले. परिणामी एकच पथक कार्यरत आहे.