शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

कक्ष तयार, मात्र करवसुली अधिकारीच नाही

By admin | Updated: March 2, 2015 01:33 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे कर वसुली अधिकारी म्हणून नायब तहसीलदार पाटील यांची नियुक्ती केली.

गोंदिया : जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे कर वसुली अधिकारी म्हणून नायब तहसीलदार पाटील यांची नियुक्ती केली. कर वसुली अधिकारी रुजू होणार यामुळे नगरपरिषद कार्यालयात असलेले पक्षनेत्यांचे कक्ष त्यांच्यासाठी सज्ज करण्यात आले. मात्र महिनाभर लोटून गेला असूनही पाटील रूजू न झाल्याने कक्ष असून त्यासाठी अधिकारीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नगरपरिषदेने कर वसुली अधिकारी मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे मागणी केली होती. कर वसुली अधिकारी मिळाल्यास नगरपरिषदेच्या डोक्यावर असलेले ११ कोटींच्या कर वसुलीचे डोंगर कमी होणार अशी नगरपरिषद प्रशासनाची अपेक्षा होती. एवढेच नव्हे तर पाटील रूजू झाल्यावर मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी ते स्वत: एक पथक घेऊन तसेच दुसरे पथक तयार करून पाटील यांच्या मार्गदर्शनात वसुली मोहीम राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी आमसभेत ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. करवसुलीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी नायब तहसीलदार निलेश पाटील यांची करवसुली अधिकारी म्हणून नियुक्ती केली. ३१ जानेवारी रोजी तसे आदेश नगरपरिषदेला मिळाले. आता करवसुली अधिकारी पाटील येणार, त्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा लागेलच. अशात नगरपरिषद कार्यालयातील पूर्वी पक्षनेत्यांसाठी असलेले कक्ष करवसुली अधिकाऱ्यांसाठी आरक्षीत करून सज्ज करण्यात आले. मात्र फेब्रुवारी महिना लोटून गेला तरिही पाटील रूजू झालेच नाहीत. अशात त्यांच्यासाठी आरक्षीत करून ठेवलेले कक्ष तसेच बंद पडून आहे. एकीकडे ज्यांना वेगळे कक्ष नाही ते वेगळे कक्ष लाभावे यासाठी धडपडत असतात. येथे मात्र उलटाच कारभार दिसून येत आहे. पाटील साहेबांसाठी कक्ष तयार असूनही ते रूजू होत नसल्याने त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले कक्ष बंद पडून आहे. तर पालिकेतील कर्मचारी पाटील कधी रूजू होणार याची वाट बघत आहेत. मात्र त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या कक्षावर करवसुली अधिकाऱ्यांचे कक्ष अशी पट्टी चिकटविण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)एकच पथक करीत आहे वसुली३१ जानेवारी रोजी पाटील यांची करवसुली अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश नगरपरिषदेला मिळाले. त्यानुसार पाटील २ फेब्रुवारी रोजी पदभार घेणार व त्यानंतर दोन कर वसुली पथक तयार करून वसुली केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी मोरे यांनी लोकमतला सांगीतले होते. मात्र पाटी अद्याप रूजू झालेले नाही. परिणामी एकच वसुली पथक शहरात कर वसुलीची मोहीम राबवित आहेत. दोन पथकांद्वारे मोहीम राबविल्यास कमी कालावधीत जास्तीत जास्त थकबाकीदारांपर्यंत पोहचता आले असता असे मुख्याधिकाऱ्यांचे नियोजन होते. मात्र पाटील न आल्याने त्यांचे हे नियोजन फिस्टकले. परिणामी एकच पथक कार्यरत आहे.