शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जलयुक्त शिवारमुळे १ लाख १८ हजार हेक्टरला संरक्षित सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:26 IST

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात मागील तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील २३४ गावांमध्ये ६ हजार २६८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे ५९ हजार २६ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून यामुळे १ लाख १८ हजार ३६१ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे६ हजार २६८ कामे पूर्ण : ५९ हजार टीसीएम पाणीसाठा, मागील तीन वर्षातील कामे, ०.३१ मीटरने भूजल पातळीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात मागील तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील २३४ गावांमध्ये ६ हजार २६८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे ५९ हजार २६ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून यामुळे १ लाख १८ हजार ३६१ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे.जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या कामांमुळे मागील चार वर्षात पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी कमी होऊनही भूजल पातळीत ०.३१ मीटर वाढ झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १३४९.६१ मि.मी. इतके असून जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये १११६.१३ मि.मी. पर्जन्यमान झाले आहे. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत २३३.४८ मि.मी. कमी पर्जन्यमान म्हणजे १७.०१ टक्के घट झालेली आहे. मागील चार वर्षात पर्जन्यमानात साधारणत: २६ टक्के घट झालेली आहे.चालू वर्षात सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात १६५ गावांची निवड करण्यात आली. या गावात ३ हजार ८२ कामे प्रस्तावित करण्यात आली असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर २७ हजार ५१६ टिसीएम पाणीसाठा निर्माण होणे अपेक्षित आहे. यातून ५५ हजार ३३ हेक्टर संरक्षित सिंचन वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा गोंदिया जिल्ह्याची एकूण ३३ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली आहे.पाणलोट क्षेत्रातील उताऱ्यानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र ३ भागात रन आॅफ झोन, रिचार्ज, स्टोरेज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या प्रत्येक झोनमध्ये एक अशा एकूण ७९ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदर निरीक्षण विहिरींची सप्टेंबर २०१८ मध्ये भूजल पातळीची नोंद घेण्यात आली. या नोंदीत भूजल पातळीत ०.३१ मीटर वाढ झाल्याचे निर्दशनास आले आहे.पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या ७९ निरीक्षण विहिरींच्या भूजलाच्या पातळीच्या नोंदी सप्टेंबर २०१८ अखेर घेण्यात आल्या. त्यानुसार पाच वर्षाची भूजलाची सरासरी पातळी २.१७ मीटर आहे. माहे सप्टेंबर २०१८ ची सरासरी पातळी २.३५ असून ०.१८ मीटर पाणी पातळीत वाढ झालेली आहे. आमगाव, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी व तिरोडा या तालुक्यात सरासरी ० ते १ मीटर भूजल पातळीत वाढ झाली आहे.जलयुक्त शिवार योजना राबविण्यापूर्वी सन २०१४ मध्ये गोंदिया जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ही २.६६ मीटर व जलयुक्त शिवार अभियानांनंतर सप्टेंबर २०१८ मध्ये सरासरी भूजल पातळी २.३५ मीटर होती. म्हणजेच ४ वर्षे पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी कमी होऊनही भूजल पातळीत ०.३१ मीटरने वाढ झालेली आहे. आमगाव, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी व तिरोडा या तालुक्यात सरासरी ०.२० मीटरने पाणी पातळीत वाढ झालेली आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाणलोट क्षेत्रनिहाय सर्वेक्षणामध्ये काही महत्वाच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यापूर्वी पेक्षा आता ०.३१ मीटर भूजल पातळीत वाढ झालेली आहे. सलग ४ वर्षात पर्जन्यमानात घट झालेली असून भूजल पातळीत स्थिर राहण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत कामे पूर्ण झाल्यामुळे उपलब्ध झालेल्या पाणी साठयामुळे शेतकºयांना शाश्वत सिंचनासाठी भूजल उपलब्ध झाले आहे.