शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

जलयुक्त शिवारमुळे १ लाख १८ हजार हेक्टरला संरक्षित सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:26 IST

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात मागील तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील २३४ गावांमध्ये ६ हजार २६८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे ५९ हजार २६ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून यामुळे १ लाख १८ हजार ३६१ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे६ हजार २६८ कामे पूर्ण : ५९ हजार टीसीएम पाणीसाठा, मागील तीन वर्षातील कामे, ०.३१ मीटरने भूजल पातळीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात मागील तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील २३४ गावांमध्ये ६ हजार २६८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे ५९ हजार २६ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून यामुळे १ लाख १८ हजार ३६१ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे.जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या कामांमुळे मागील चार वर्षात पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी कमी होऊनही भूजल पातळीत ०.३१ मीटर वाढ झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १३४९.६१ मि.मी. इतके असून जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये १११६.१३ मि.मी. पर्जन्यमान झाले आहे. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत २३३.४८ मि.मी. कमी पर्जन्यमान म्हणजे १७.०१ टक्के घट झालेली आहे. मागील चार वर्षात पर्जन्यमानात साधारणत: २६ टक्के घट झालेली आहे.चालू वर्षात सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात १६५ गावांची निवड करण्यात आली. या गावात ३ हजार ८२ कामे प्रस्तावित करण्यात आली असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर २७ हजार ५१६ टिसीएम पाणीसाठा निर्माण होणे अपेक्षित आहे. यातून ५५ हजार ३३ हेक्टर संरक्षित सिंचन वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा गोंदिया जिल्ह्याची एकूण ३३ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली आहे.पाणलोट क्षेत्रातील उताऱ्यानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र ३ भागात रन आॅफ झोन, रिचार्ज, स्टोरेज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या प्रत्येक झोनमध्ये एक अशा एकूण ७९ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदर निरीक्षण विहिरींची सप्टेंबर २०१८ मध्ये भूजल पातळीची नोंद घेण्यात आली. या नोंदीत भूजल पातळीत ०.३१ मीटर वाढ झाल्याचे निर्दशनास आले आहे.पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या ७९ निरीक्षण विहिरींच्या भूजलाच्या पातळीच्या नोंदी सप्टेंबर २०१८ अखेर घेण्यात आल्या. त्यानुसार पाच वर्षाची भूजलाची सरासरी पातळी २.१७ मीटर आहे. माहे सप्टेंबर २०१८ ची सरासरी पातळी २.३५ असून ०.१८ मीटर पाणी पातळीत वाढ झालेली आहे. आमगाव, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी व तिरोडा या तालुक्यात सरासरी ० ते १ मीटर भूजल पातळीत वाढ झाली आहे.जलयुक्त शिवार योजना राबविण्यापूर्वी सन २०१४ मध्ये गोंदिया जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ही २.६६ मीटर व जलयुक्त शिवार अभियानांनंतर सप्टेंबर २०१८ मध्ये सरासरी भूजल पातळी २.३५ मीटर होती. म्हणजेच ४ वर्षे पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी कमी होऊनही भूजल पातळीत ०.३१ मीटरने वाढ झालेली आहे. आमगाव, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी व तिरोडा या तालुक्यात सरासरी ०.२० मीटरने पाणी पातळीत वाढ झालेली आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाणलोट क्षेत्रनिहाय सर्वेक्षणामध्ये काही महत्वाच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यापूर्वी पेक्षा आता ०.३१ मीटर भूजल पातळीत वाढ झालेली आहे. सलग ४ वर्षात पर्जन्यमानात घट झालेली असून भूजल पातळीत स्थिर राहण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत कामे पूर्ण झाल्यामुळे उपलब्ध झालेल्या पाणी साठयामुळे शेतकºयांना शाश्वत सिंचनासाठी भूजल उपलब्ध झाले आहे.