शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

तीन शाळा बंद करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: July 24, 2015 01:14 IST

मागील काही वर्षांपासून नगर परिषदेच्या शाळांच्या होणाऱ्या सततच्या उपेक्षेमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

नजर आमसभेकडे : सिव्हिल लाईन्स शाळेत केवळ चार व टाऊन शाळेत पाच विद्यार्थीगोंदिया : मागील काही वर्षांपासून नगर परिषदेच्या शाळांच्या होणाऱ्या सततच्या उपेक्षेमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांची स्थिती सातत्याने कमकुवत होत चालली आहे. मागील काही वर्षांत अनेक शाळांना बंद करावे लागले. आता आणखी काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर पोहोचल्या आहेत. कमीत कमी तीन शाळा आता तत्काल प्रभावाने बंद कराव्या लागतील. या शाळांना पुढे चालविण्यात काहीही अर्थ नाही. परंतु नगर परिषदेचे पदाधिकारी-अधिकारी राजकीय ईच्छाशक्तीच्या अभावाने पाऊल उचलण्यास हिंमत करीत नाहीत.नगर परिषदेद्वारे संचालित ज्या तीन शाळांना बंद करणे गरजेचे आहे, त्यापैकी सिव्हील लाईन्स शाळेत केवळ चार विद्यार्थी आहेत. माताटोली येथील शाळेत १० व टाऊन स्कूलमध्ये केवळ पाच विद्यार्थी आहेत. ही संख्या १ जुलैची असून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आहे. चार वर्गात जर चारच विद्यार्थी आहेत, तर त्या शाळेला चालविण्याचा काहीही औचित्य नसते. मागील वर्षी सिव्हील लाईन्सच्या शाळेत केवळ सात विद्यार्थी होते. ही संख्या आता पुन्हा कमी झाली आहे. सध्या विद्यार्थी संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, परंतु ही संख्या किती वाढेल? असा प्रश्न आहे. गोंदिया नगर परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मागील वर्षी सदर तिन्ही शाळांना बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु आमसभेत सदर प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. आता पुन्हा नवीन प्रस्ता बनविण्यात आला आहे. आमसभेची वाट बघितली जात आहे. आता नगर परिषदेला नवीन मुख्याधिकारी मिळाला आहे. शक्यतो पुढील काळात आमसभेचे आयोजन होवू शकेल. मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला, परंतु नगर परिषदेची आमसभा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीही माहिती नाही. जर या शाळांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तर त्या विद्यार्थ्यांना त्रास होईल, यात शंका नाही. (प्रतिनिधी)आणखी काही शाळा प्रतीक्षेतनगर परिषदेद्वारे संचालित प्राथमिक शाळांमध्ये व अनेक शाळांची स्थिती गंभीर आहे. मराठी माध्यमाच्या रामनगर शाळेत २४, डॉ. आंबेडकर शाळेत १९, संत गाडगेबाबा शाळेत २२, रेलटोली येथील शाळेत २९ व सावित्रीबाई फुले शाळेत १८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हिंदी माध्यमाच्या मालवीय शाळेत केवळ २० विद्यार्थी आहेत. इंग्रजी माध्यमाचे शिक्षण केव्हा?मागील वर्षी आमसभेत उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते की, सदर शाळांना बंद करण्याऐवजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यायला हवे. तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्याशी चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, नवीन शिक्षकांची भरती केली जाईल. शाळा परिसर व वातावरणात बदल केले जाईल. खासगी शाळांशी स्पर्धा करण्याचे प्रयत्न केले जातील. परंतु या दिशेने अद्याप कसलेही पाऊल उचलण्यात आले नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे शिक्षण विभागाचे उपसंचालकांकडून अनुदान व मंजुरी मिळवावी लागते. त्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आले नाही. नगर परिषदेद्वारे अनेक वर्षांपासून केवळ एकच कॉन्व्हेंट शाळा चालविली जात आहे. त्याचा संपूर्ण खर्च नगर परिषद उचलते. जर इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू झाले तर नगर परिषदेवर भार वाढेल. अशात त्या शाळांना केवळ बंद करण्याचा निर्णयच घेतला जावू शकतो. सेमी-इंग्रजीची तयारी नाहीमागील काही काळापूर्वी नगर परिषदेच्या शाळांमध्ये सेमी-इंग्रजीची तयारी करण्यास सांगण्यात आले होते. याबाबत प्रस्तावही आमंत्रित करण्यात आले होते. केवळ काही शाळांनीच प्रस्ताव दिले होते. अधिकतर शाळांनी पहिल्या वर्गापासून सेमी-इंग्रजी सुरू करण्यात आवड दाखविली नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनविणे व त्यांना उत्तम शिक्षण देऊन आपली नोकरी वाचविण्यासाठीसुद्धा कोणतेही पाऊल उचलण्यास नगर परिषदेचे शिक्षक तयार नाहीत. अशा स्थितीत नगर परिषदेची शिक्षण व्यवस्थाच नष्ट झाली तर नवल वाटू नये.