शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जीवघेण्या डेंग्यूवर मात

By admin | Updated: November 18, 2015 01:55 IST

मागील वर्षी सात जणांचा जीव घेणाऱ्या डेंग्यूला यंदा जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाने मात दिली आहे.

गोंदिया : मागील वर्षी सात जणांचा जीव घेणाऱ्या डेंग्यूला यंदा जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाने मात दिली आहे. या वर्षात डेंग्यूने एकाही रुग्णाचा जिल्ह्यात मृत्यू झाला नसल्याची नोंद या विभागाकडे आहे. जनतेकडून लाभलेल्या योग्य प्रतिसादाचे हे फलित असल्याचे या विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र मलेरियाचा कहर पूर्णपणे नियंत्रणात आलेला नसून यावर्षी ५ जणांना बळी पडावे लागले. त्यामुळे डांसाच्या प्रकोपापासून जिल्हा अद्याप मुक्त झालेला नसल्याचेही स्पष्ट होते. मागील काही वर्षात जिल्ह्यातील स्थिती बघता डेंग्यू व मलेरिया म्हणताच अंगावर थरकाप येणार अशी स्थिती होती. डासांवर नियंत्रणाअभावी डेंग्यू व मलेरिया हे डासजन्य आजार फोफावून कित्येकांना जीव गमवावा लागला. याचा परिणाम असा झाला की, डेंग्यू व मलेरिया यांची नोंद जीवघेण्या आजारात नागरिक करीत होते. पावसाळ्याच्या दिवसांत नागरिक दहशतीतच वावरत होते. पावसाळा डासांचा प्रजननाचा काळ असल्याने पावसाळ््यात डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाकडून डासनाशकाची फवारणी केली जाते. याशिवाय नागरिकांना डासांची उत्पत्ती थांबविण्याबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले जाते. सातत्याने केल्या जात असलेल्या या दोन्ही प्रयत्नांचे फलीत आज पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातही यावर्षी नागरिकांच्या सहकार्याने हिवताप नियंत्रण विभागाने डेंग्यूवर मात करण्यात यश मिळविल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षी सन २०१४ मध्ये जेथे ५६ डेंग्यूग्रस्त रुग्ण आढळून आले आणि सात जणांचा मृत्यू झाला होता, तेथेच यंदा सन २०१५ मध्ये एकही डेंग्युग्रस्त रुग्ण नसून कुणालाही जीव गमवावा लागल्याची नोंद विभागाकडे आहे. यावरून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती जिल्ह्यात उद्रेक करण्याइतपत झाली नसावी असे म्हणता येईल. (शहर प्रतिनिधी)मलेरिया ठरतोय घातक डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात जरी यश आले असल्याचे दिसून येत असले तरी यावर्षी मलेरिया डेंग्यूवर भारी ठरल्याचे दिसते. सन २०१४ मध्ये मलेरियाचे २९ रुग्ण आढळून व नऊ जणांचा मृत्यू झाला असताना यावर्षी सन २०१५ मध्ये सात ग्रस्त व पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद विभागाकडे आहे. यावरून डेंग्यू जरी नियंत्रणात असला तरी मलेरियाच्या उपाययोजनेत मात्र विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येते.नागरिकांमध्ये आली जागृतीडेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी हिवताप विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांना जनतेकडून मिळालेल्या योग्य प्रतिसादाचा सिंहाचा वाटा आहे. या विभागाकडून फवारणी व जनजागृती केली जात असताना नागरिकांनी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी या विभागाकडून दिलेल्या सूचनांचे योग्य पालन केले. त्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती झाली नाही. शिवाय निसर्गानेही साथ दिल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरणारे वातावरण निर्माण झाले नसावे असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सलील पाटील यांनी सांगितले.