शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

जीवघेण्या डेंग्यूवर मात

By admin | Updated: November 18, 2015 01:55 IST

मागील वर्षी सात जणांचा जीव घेणाऱ्या डेंग्यूला यंदा जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाने मात दिली आहे.

गोंदिया : मागील वर्षी सात जणांचा जीव घेणाऱ्या डेंग्यूला यंदा जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाने मात दिली आहे. या वर्षात डेंग्यूने एकाही रुग्णाचा जिल्ह्यात मृत्यू झाला नसल्याची नोंद या विभागाकडे आहे. जनतेकडून लाभलेल्या योग्य प्रतिसादाचे हे फलित असल्याचे या विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र मलेरियाचा कहर पूर्णपणे नियंत्रणात आलेला नसून यावर्षी ५ जणांना बळी पडावे लागले. त्यामुळे डांसाच्या प्रकोपापासून जिल्हा अद्याप मुक्त झालेला नसल्याचेही स्पष्ट होते. मागील काही वर्षात जिल्ह्यातील स्थिती बघता डेंग्यू व मलेरिया म्हणताच अंगावर थरकाप येणार अशी स्थिती होती. डासांवर नियंत्रणाअभावी डेंग्यू व मलेरिया हे डासजन्य आजार फोफावून कित्येकांना जीव गमवावा लागला. याचा परिणाम असा झाला की, डेंग्यू व मलेरिया यांची नोंद जीवघेण्या आजारात नागरिक करीत होते. पावसाळ्याच्या दिवसांत नागरिक दहशतीतच वावरत होते. पावसाळा डासांचा प्रजननाचा काळ असल्याने पावसाळ््यात डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाकडून डासनाशकाची फवारणी केली जाते. याशिवाय नागरिकांना डासांची उत्पत्ती थांबविण्याबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले जाते. सातत्याने केल्या जात असलेल्या या दोन्ही प्रयत्नांचे फलीत आज पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातही यावर्षी नागरिकांच्या सहकार्याने हिवताप नियंत्रण विभागाने डेंग्यूवर मात करण्यात यश मिळविल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षी सन २०१४ मध्ये जेथे ५६ डेंग्यूग्रस्त रुग्ण आढळून आले आणि सात जणांचा मृत्यू झाला होता, तेथेच यंदा सन २०१५ मध्ये एकही डेंग्युग्रस्त रुग्ण नसून कुणालाही जीव गमवावा लागल्याची नोंद विभागाकडे आहे. यावरून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती जिल्ह्यात उद्रेक करण्याइतपत झाली नसावी असे म्हणता येईल. (शहर प्रतिनिधी)मलेरिया ठरतोय घातक डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात जरी यश आले असल्याचे दिसून येत असले तरी यावर्षी मलेरिया डेंग्यूवर भारी ठरल्याचे दिसते. सन २०१४ मध्ये मलेरियाचे २९ रुग्ण आढळून व नऊ जणांचा मृत्यू झाला असताना यावर्षी सन २०१५ मध्ये सात ग्रस्त व पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद विभागाकडे आहे. यावरून डेंग्यू जरी नियंत्रणात असला तरी मलेरियाच्या उपाययोजनेत मात्र विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येते.नागरिकांमध्ये आली जागृतीडेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी हिवताप विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांना जनतेकडून मिळालेल्या योग्य प्रतिसादाचा सिंहाचा वाटा आहे. या विभागाकडून फवारणी व जनजागृती केली जात असताना नागरिकांनी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी या विभागाकडून दिलेल्या सूचनांचे योग्य पालन केले. त्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती झाली नाही. शिवाय निसर्गानेही साथ दिल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरणारे वातावरण निर्माण झाले नसावे असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सलील पाटील यांनी सांगितले.