शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

हक्कांबद्दल जाणीव आवश्यक

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरी सुध्दा समाजातील अनेक लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव नाही.

संजय पुराम : मानवाधिकार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन सालेकसा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरी सुध्दा समाजातील अनेक लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव नाही. जाणीव नसल्यामुळेच कमजोर वर्गातील पिडीतांची नेहमी आर्थिक व सामाजिक पिळवणूक होत राहीली. समाजातील घटकाचा विकास घडवायचा असेल तर मानवी हक्काबद्दल प्रत्येकाला जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. ते तालुक्यातील ग्राम झालिया येथे मानवाधिकार संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, जिल्हा परिषद सदस्य विजय टेकाम, माजी पं.स.सभापती यादनलाल बनोठे, सरपंच मनोज दमाहे, उपसरपंच हेमराज सुलाखे, तंटामुक्त समिती अध्यक्ष धरमदास कुराहे, पोलीस पाटील कविता कुराहे, आयोगाचे जिल्हाध्यक्ष कुरैशी, लेखिका उषा किरण आत्राम व अन्य उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पुराम यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समान अधिकार देणारी राज्यघटना निर्माण केली. परंतु त्या राज्यघटनेत लिहीलेल्या गोष्टीपासून आजही अनेक लोक अनभिज्ञ आहेत आणि पारंपारिक गुलामगिरीत जगत आहेत. अशा लोकांमध्ये आपल्या हक्काविषय जाणीव असणे आवश्यक आहे. यासाठी काही सरकारी-गैरसरकारी संगठना मोलाची भूमिका पार पाडत असतात. यामध्ये मानवाधिकार आयोग यशाची वाटचाल करीत असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही उपस्थितांना संबोधीत केले. संचालन करून आभार सोहन दमाहे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कैलास दमाहे, कस्तुरचंद जोग, देवराम बरैया, अशोक शेंडे अदिंनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)