शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुक्यात सर्वाधिक दूषित पाणी

By admin | Updated: September 19, 2015 02:55 IST

जिल्हाभरातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासल्यानंतर त्यात तिरोडा तालुक्यातील गावांमध्ये सर्वाधिक प्रदुषित पाणी आढळले आहे.

अर्जुनी मोरगाव स्वच्छ : २३५ अस्वच्छ गावांना पिवळे कार्ड गोंदिया : जिल्हाभरातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासल्यानंतर त्यात तिरोडा तालुक्यातील गावांमध्ये सर्वाधिक प्रदुषित पाणी आढळले आहे. तर सर्वात स्वच्छ पाणी अर्जुनी मोरगाव तालुक्यात आढळले. अस्वच्छता आणि प्रदुषित पाणी असणाऱ्या जिल्हाभरातील २३५ गावांना पाणी व स्वच्छता विभागाकडून पिवळे कार्ड देण्यात आले. ज्या गावांमध्ये अस्वच्छता आढळून येते त्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे केले जाते. वर्षातून दोन वेळा पाण्याचे सर्वेक्षण केले जाते. एप्रिल व आॅक्टोबर या दोन महिन्यांत सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे लाल, हिरवा, पिवळे किंवा चंदेरी रंगाचे कार्ड दिले जाते. जिल्ह्यातील अस्वच्छता असलेल्या २३५ गावांना पिवळ्या रंगाचे कार्ड देण्यात आले आहे. त्यात गोंदिया तालुक्यातील ६३, गोरेगाव ३५, आमगांव १५, तिरोडा ९०, सालेकसा १४, देवरी १५, सडक अर्जुनी ३ अशा गावांचा समावेश आहे. हिरवे कार्ड, अर्थात चांगली स्थिती असणाऱ्या ग्रामपंचायतीत गोंदिया तालुक्यातील ४५, गोरेगाव २०, आमगाव ४९, तिरोडा ५, सालेकसा २९, देवरी ४१, सडक-अर्जुनी ६० तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वात जास्त ७१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नागरिकांना शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटना व केंद्र शासनाने पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत स्त्रोतनिहाय स्वच्छता सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वच्छता सर्वेक्षणातून पाण्याच्या स्त्रोताजवळील परिसर, पाणी पुरवठा सरंचना व व्यवस्थापनातील जे दोष आढळून येतील त्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये पाणी शुध्दीकरण अनियमित होते, पाणी स्त्रोताचा परिसर अस्वच्छ आहे, नळ गळत्या व व्हॉल्व गळत्या आहेत अशा ग्रामपंचायतींनी टीसीएल पावडरचा साठा पुरेशा उपलब्ध ठेवला नसेल, वर्षभरात जलजन्य साथ रोगांचा उद्रेक झालेला असेल, अशा ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात येते. परंतु गोंदिया जिल्ह्यात लाल कार्ड घेणारी एकही ग्रामपंचायत नाही. सदर दोष ज्या ग्रामपंचायतीमध्ये आढळून येत नाही अशा ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड दिले जाते. हिरवे कार्ड घेणाऱ्या जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायती आहेत. ज्या ग्रामपंचायतीमध्ये अस्वच्छता असते अशा ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते. ज्या ग्रामपंचायतीत सलग ५ वर्षे साथीचा उद्रेक झालेला नाही, पाच वर्षे हिरवे कार्ड मिळालेले आहे अशा ग्रामपंचायतीला चंदेरी कार्ड देण्यात येते. परंतु गोंदिया जिल्ह्यात चंदेरी कार्ड घेणारी एकही ग्रामपंचायत नाही. (तालुका प्रतिनिधी)३०५ पैकी ६५ पाणी नमुने दूषित जिल्हा प्रयोग शाळेने यंदा ग्रामीण भागातील १७२ पाण्याचे नमुने तपासले. त्यात २० नमुने दूषित तर शहरी भागातील १५९ नमुने तपासले असून ४५ नमुने दूषित आढळले आहेत. ग्रामीण व शहरी भागातील ३०५ पैकी ६५ नमुने दूषित आढळले आहेत.