शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात चढला मंडईचा ज्वर

By admin | Updated: November 16, 2015 01:45 IST

ग्रामीण भागात दिवाळी केवळ दोन दिवस साजरी केली जाते. त्यामुळे दिवाळी संपताच लगेच तिसऱ्या दिवसापासून मंडईचा ज्वर ग्रामीण भागात चढतो.

वर-वधू शोधमोहीम : नाटकांसह गोंधळ व तमाशांची मेजवानी, पाहुण्यांची रेलचेलगोंदिया : ग्रामीण भागात दिवाळी केवळ दोन दिवस साजरी केली जाते. त्यामुळे दिवाळी संपताच लगेच तिसऱ्या दिवसापासून मंडईचा ज्वर ग्रामीण भागात चढतो. सध्या जिल्हाभरातील अनेक गावांत मंडईचा ज्वर चढला असून पाहुण्यांची ये-जा सुरू आहे.सध्या रेल्वे स्थानक व एसटीच्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पाहुण्यांची वर्दळ व लोकांची गर्दी यामुळे रेल्वे व बस स्थानक फुलले आहे. ही गर्दी बघून काही व्यक्ती आपल्या स्वत:च्या मोटारसायकलचा उपयोग करीत आहेत. सध्या शाळांना तसेच अनेक कार्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे बच्चे पार्टी मामाच्या गावाला जाण्याची इच्छा आपल्या आई-वडिलांकडे व्यक्त करीत आहेत. अनेक व्यक्ती दिवाळी आपल्या घरी साजरी करून तसेच गोडधोड खावून सासरी जाण्याच्या तयारीत आहेत. बहिणींना भावाला (भाऊबीज) ओवाळणी घालण्याकरिता ओढ असल्याने भाऊबीजनिमित्त बहिणींनी आपल्या भावाचे घर गाठून मुक्काम ठोकला आहे. दिवाळी आटोपल्यानंतर लगेच ग्रामीण भागात मंडईला सुरूवात होते. मंडईत दिवसा दंडारी असतात. नाच, गाणे मंडईत सुरू असते. त्यामुळे मंडईची परंपरा नेहमीच दिवाळी झाल्यानंतर सुरू असते. युवा पिढीतील तरुण व तरूणी या मंडईचा मजा काही वेगळ्या पध्दतीने घेतात. मंडई निमित्ताने काही जुने मित्र तसेच जुन्या मैत्रीनींच्या भेटीगाठी होतात. जो व्यक्ती गाव सोडून बाहेरगावी नोकरी करीत असतो, तोसुद्धा मंडईच्या दिवशी सुट्ट्या काढून गावी परततो. अनेक पाहुणे मंडळी मंडई निमित्ताने एकमेकांकडे जातात. सर्वत्र पाहुण्यांची चाहूल दिसत असते. या वेळी गोड पदार्थ खाण्याची अधिक संधी इतरांना मिळते. मंडईतील लहान मुलांचे खेळणे म्हणजे फुगे, हे विशेष. रात्रीला प्रत्येक गावी मंडई निमित्ताने नाटक, तमाशा, धमाका, आर्केस्ट्रा व इतर कार्यक्रम मनोरंजनासाठी होतात. ही दरवर्षीची परंपरा यंदाही सुरू आहे. यातही अनेक व्यक्ती रात्रभर बसून आपला मनोरंजन करतात. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या मंडईला ज्वर चढला आहे. दिवाळीची रोषणाई संपत नाही तोच मंडईची धूम सुरू झाली. सर्वत्र मंडईच्या आयोजनाने गावकऱ्यांच्या आनंदात व उत्साहात भर पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावोगावी मंडईचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गावात मंडईच्या निमित्ताने गावकऱ्यांना मेजवानी मिळत आहे. झाडीपट्टीमध्ये मंडईला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दिवाळीचा पर्व संपला की लगेच मंडईला सुरूवात होते. या मंडईनिमित्त गावात आप्तस्वकीय नातेवाईक येतात. त्यामुळे एकमेकांच्या भेटीगाठी होऊन आनंद साजरा केला जातो. तसेच मंडईनिमित्ताने उपवर-वधूच्या शोधाचे कार्य केले जाते. येथूनच विवाह जुळविण्याच्या कार्याला प्रारंभ होतो. त्यातच इंटरनेट, टी.व्ही., कंप्युटरच्या युगात मनोरंजनाची साधने उपलब्ध असली तरी ग्रामीण भागाने आपली पारंपरिक संस्कृती जोपासण्यासाठी पूर्वीच्या काळात निखळ मनोरंजन करणाऱ्या लोककलांचे आयोजन केले जाते. ही लोककला, गोंधळ, तमाशा व नाटके आजही विरंगुळा मिळवून देत आहेत. मंडईनिमित्त नाटकांचे आयोजन करण्यात येत आहे. या नाटकांव्दारे सामाजिक प्रबोधनातून निखळ मनोरंजनाचे कार्य होत आहे. त्यातून परिसरातील लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. (प्रतिनिधी)