शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मराठीत ५० टक्क्यापेक्षा कमी गुण घेणाऱ्याला नापास समजावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:54 IST

सर्वच शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात अशी मागणी होत आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. तर ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य असलेले लखनसिंह मोहनलाल कटरे यांची थेट मुलाखत ‘लोकमत’ने घेतली.

ठळक मुद्देमुलाखत : आजच्या विद्यार्थ्याला मुळातून नॉलेज नसते, फक्त विषयाची माहिती असते

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वच शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात अशी मागणी होत आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. तर ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य असलेले लखनसिंह मोहनलाल कटरे यांची थेट मुलाखत ‘लोकमत’ने घेतली. या मुलाखतीत चर्चा करतांना ते म्हणाले, जगातला कुठलाही विषय घ्या परंतु त्यासाठी मायबोलीवर प्राविण्य असल्याशिवाय तो विषय पाहिजे तसा शिकता येत नाही. मराठी, झाडीबोली, पोवारी बोली अशा कुठल्याही भाषा शिकणे चांगलेच आहे. परंतु मायबोली असलेली मराठी प्राथमिक शिक्षणातूनच मिळायला हवी. पाया मजबूत करण्यासाठी मराठी अत्यंत आवश्यक आहे.लखनसिंह कटरे यांनी सन २००९ मध्ये ९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविले. पुन्हा २००४ मध्ये आनंदवन वरोरा येथे झालेल्या ११ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद भूषविले. महाराष्ट्रातील सर्व बोलींचे एकत्रीकरण करून स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र बोली साहित्य मंडळाचे ते संस्थापक सदस्य आहेत. कटरे १९६९ मध्ये आदर्श विद्यालयात शिकत असताना ते सेमी इंग्रजी माध्यमात शिकत होते. परंतु त्यांचा पाया मराठीचा होता. मराठी मजबूत असल्यामुळे इंग्रजी विषय कठिण वाटला नाही असे त्यांनी सांगितले. कटरे हे शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाले. जिल्हा सहकार निबंधक म्हणून काम केले. ३० वर्षाच्या सेवेत हजारो निर्णय दिले. परंतु जे निर्णय त्यांनी दिले ते निर्णय सर्व मराठीतूनच दिले. न्यायव्यवस्थेचे कामकाज इंग्रजीशिवाय चालू शकत नाही हा गैरसमज आपण दूर केल्याचे ते म्हणाले. कटरे यांनी दिलेल्या तीन निर्णयांच्या विरोधात तीन प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलीत. परंतु त्यांनी दिलेले निर्णय सर्वोच्च न्यायालयात देखील कायम ठेवण्यात आले. किमान १२ वी पर्यंत मराठी सक्तीची करावी. ५० टक्क्यांपेक्षा मराठीत कमी गुण मिळाले तर त्याला चक्क नापास समजावे असा निर्णय अंमलात आणावा. एलएलबीसाठी ५० टक्के गुणांची गरज असते तीच अट मराठी विषयासंदर्भात लागू करावी. आजचा विद्यार्थी फक्त गुण घेण्यापूरता माहिती संकलीत करतो. परंतु त्याला ज्ञान मिळत नाही. ज्ञान मिळवायचे असेल तर मूळ संकल्पना मातृभाषेतून मांडली गेली पाहिजे. एक कविता संपूर्ण एका ग्रंथाएवढा अर्थ सांगून जाते. तर कथा-कादंबऱ्यांचा अर्थ एका ओळीपुरता मर्यादीत असतो. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण मनुष्याला सर्व दृष्टीकोणातून सक्षम बनविते. विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीतच असावे. कॉन्व्हेंट संस्कृती बंद व्हायला हवी. १२ वी पर्यंत मराठी हा विषय सक्तीचा असावा. वर्ग १ ते ४ चे शिक्षण शंभर टक्के मराठीत द्यावे. पाचवीनंतर इंग्रजी द्यावी. परंतु मराठीतून त्या विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढेल याकडे शिक्षकांचा कल असायला हवा.मराठी शिकविण्याचा मुख्यमंत्र्यांनी धरलेला आग्रह हा मराठीच्या संवर्धनासाठी आहे. मराठीत कविता, कथासंग्रह, संकीर्ण संग्रह लिहीण्याकडे आपला कल आहे का यावर सांगतांना कटरे म्हणाले, वाचनाची सवय आईने लावली. त्या वाचनातून आपल्या विचारांना कागदावर उतरविण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांच्या शिक्षिका मंदाकिनी सगदेव यांनी बजाविली. आई-वडिलांनी मुलांचे प्राथमिक शिक्षण मराठीतूनच व्हावे यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा. कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे मराठीचा ऱ्हास होत आहे, याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.एक कविता एका ग्रंथाच्या बरोबरीचे ज्ञान समाजासमोर मांडते आणि एका कथासंग्रहाचा अर्थ एका वाक्यात काढला जातो. किती लिहिले आहे याला महत्त्व नाही. तर जे लिहिले आहे त्याच्यात दडलेला अर्थ किती महत्त्वाचा आहे हे महत्त्वाचे आहे. ते भरीव शब्द करण्यासाठी मातृभाषेतूनच पाया मजबूत केल्यास विद्यार्थी ज्ञानवंत होतो.