शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मॅजिक पीटकरणार जिल्ह्याला डासमुक्त

By admin | Updated: April 27, 2017 00:53 IST

गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी उन्हाळ्यात तिसऱ्या टप्यात ३३ गावे व वाड्या पाणी टंचाई ग्रस्त आढळल्या.

पहिल्या टप्यात ८० गावे : जिल्हाधिकारी नांदेड पॅटर्न राबविणार गोंदियात नरेश रहिले  गोंदिया गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी उन्हाळ्यात तिसऱ्या टप्यात ३३ गावे व वाड्या पाणी टंचाई ग्रस्त आढळल्या. पाणी टंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी डासमुक्तीची संकल्पना साकारल्यास डासमुक्त गोंदिया बरोबर पाणी टंचाईची समस्या कायमची सोडविण्याचा रामबाण उपाय गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शोधून काढला. जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेडमध्ये राबविलेल्या उपक्रमांची अंमलबजावणी प्रखरतेने गोंदिया जिल्ह्यात करण्याचा चंग बांधला. वनाच्छादित असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी शेकडो लोकांना मलेरियाचा आजार होतो. या आजारामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागते. या आजाराला कारणीभूत असलेल्या डासांचा समूळ नायनाट करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात डासमुक्तीसाठी ग्राम पंचायतींना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. मॅजीक पीटच्या माध्यामातून गाव डासमुक्त करण्याची संकल्पना पुढे आणली आहे. जो गाव हा उपक्रम राबविल त्या गावात शंभर टक्के निकाल मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रत्येक घरातील सांडपाणी पाईपद्वारे घरासमोरील टाकीत टाकून पाणी ते पाणी जमीनीत मुरविण्याची तजविज प्रत्येक कुटुंबाला व गावाला करावी लागेल. सांडपाणी साचून राहणार नाही याची काळजी ठेतल्यास गाव डासमुक्त होईल. डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. गावात एकही साचलेले पाणी राहणार नाही तर त्या गावात डासाची उत्पत्ती होणार नाही. परिणामी गाव डासमुक्त होईल. डासमुक्तीच्या संकल्पनेने पाणी टंचाईवर सहजरित्या आळा बसेल. नांदेड येथे जिल्हाधिकारी असताना डॉ, अभिमन्यू काळे यांनी ५० गावे डासमुक्त केले. त्या डासमुक्तीच्या संकल्पनेला शंभरटक्के यशस्वी करणारा गाव नांदेड जिल्ह्याच्या माहुर तालुक्यातील लांजी हे गाव आहे. दोन वर्षापूर्वी जमीनीच्या पाण्याची पातळी ६० ते ७० फुटावर होती ती पाण्याची पातळी या उपक्रमामुळे ८ फुटावर आली आहे. भर उन्हाळ्यात या गावात रोहयोच्या माध्यामातून नालीचे काम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या नालीत आठ फुटावर पाणी लागले आहे. हाच प्रयोग गोंदिया जिल्ह्यात राबविला जाणार आहे. डासांना अंडी घालण्यासाठी साचलेले पाणी लागते. त्यासाठी कुण्याही घरासमोर साचलेले पाणी राहू नये यासाठी शोषखड्डे तयार केले तर त्यातून डासमुक्त गाव होईल. तसेच प्रत्येक घरातील सांडपाणी जमीनीत मुरले तर त्या गावात दीड ते दोन वर्षातच पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. या उपक्रमासाठी स्वत:हून पुढे येणाऱ्या गावांची पहिल्या टप्प्यात निवड केली जाईल. - अभिमन्यू काळे जिल्हाधिकारी, गोंदिया. एका वर्षात मिळेल रिझल्ट डासमुक्त संकल्पना राबविणाऱ्या गावात प्रत्येक घरातील सांडपाणी पाईपद्वारे घरी तयार केलेल्या टाकीत टाकणे, ते पाणी जमीनीत मुरणे हे नित्यक्रम ज्या गावातील प्रत्येक घरात करण्यात आले तर डासमुक्त गाव म्हणून ते गाव पुढे येईल. वर्षभर हा उपक्रम ज्या गावाने नियमीत राबविला तर त्या गावाला निश्चीत रिझल्ट मिळणार आहे. एका कुटुंबाला दिवसाला ५०० लीटर पाणी लागत असेल तर एक कुटुंबाला महिनाभरात १५ हजार लीटर पाणी लागते. एका गावात ३०० कुटुंब असतील तर त्या गावात महिन्याकाठी ४५ लाख लीटर पाणी लागते. हे सांडपाणी पाणी जमीनीत मुरविले तर वर्षभरात ५ कोटी ४० लाख लीटर पाणी जमीनीत मुरेल. एकाच गावाचे पाणी एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी जमीनीत मुरेल तर पाण्याची पातळी आपोआपच वाढेल. मग्रारोहयोतून होणार गावात काम घरातील सांडपाणी जमीनीत मुरविण्यासाठी तयार केलेल्या शोषखड्याला मॅजीक पीट हे नाव देण्यात आले. या खड्यामुळे दोन प्रकारचे जादू होणारे रिझल्ट समोर येत असल्याने त्याला मॅजीक पीट हे नाव देण्यात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हे शोषखड्डे तयार केले जाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर गोंदिया जिल्ह्याच्या प्रत्यके तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील ८० गावात हे काम येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. या गावातील प्रत्येक घरातील सांडपाण्यासाठी ४ बाय ४ फूटाचा चा खड्डा तयार करण्यात येणार आहे. डासमुक्तीतून जलसंवर्धन करण्याचा पायंडा या उपक्रमातून मांडला जाणार आहे.