शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

धानाने केले निराश, पपईची आस

By admin | Updated: January 22, 2015 01:26 IST

दरवर्षी धानशेती करून हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कंटाळून तिरोडा तालुक्याच्या सोनेगाव येथील डॉ. एम.डी. पटले फळबागेकडे वळले.

ँमुरलीदास गोंडाणे इंदोरा बु.दरवर्षी धानशेती करून हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कंटाळून तिरोडा तालुक्याच्या सोनेगाव येथील डॉ. एम.डी. पटले फळबागेकडे वळले. त्यांनी आपल्या साडे सहा एकर शेतजमिनीत पपईच्या झाडांची शेती फुलविली. त्यातून त्यांना १५ लाख रूपयांचे उत्पन्न होणार आहे.डॉ. पटले या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतीवर आधुनिक तंत्र पद्धतीचा अवलंब करून प्रथमच पपईची लागवड केली. धान शेती परवडत नसल्याने फळ शेती करण्याचा त्यांनी निर्धार केला. सदर प्रतिनिधीने त्यांच्या शेतात जाऊन त्यांची भेट घेतली व पपई लागवडीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, धानाच्या बांध्यांचे सपाटीकरण करून या साडे सहा एकर शेतीमध्ये एका विशिष्ट जातीच्या सहा हजार पपईच्या झाडांची लागवड केली.पपईचे रोपटे नागपूर येथून आणण्यात आले होते. कृषी अधिकारी पोटदुखे व कृषी निरीक्षक खंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली ही फळबाग लावण्यात आली. त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शनही लाभत आहे. शेतामधील बोअरवेलच्या माध्यमातून ठिंबक सिंचन पद्धतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या पपईची झाडे सहा महिन्यांचे झाले असून त्यांना फळेसुद्धा लागली आहे. ही फळे एप्रिल महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यावेळी ही फळे नागपूरच्या बाजारात पाठविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. धानाची शेती केल्याने पाहिजे तेवढे उत्पादन मिळत नव्हते. परंतु आधुनिक पद्धतीने फळ शेती केल्यास शेतकऱ्यांना लाभ निश्चित होतो, हे या पपईच्या पिकावरून दिसून येते. पटले यांच्या बागेत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने फळांची, हळद, केळी आदी पिकांची शेती करावी, असा ते सल्ला देतात.